शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उन्हाचा चटका; त्यात अवकाळीचा फटका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:51 IST

जालना शहरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी विजांचे तांडव दिसून आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी विजांचे तांडव दिसून आले. मेघगर्जनेसह झालेल्या पावसा दरम्यान मंठा मार्गावरील प्रियंका रेसिडेंसी परिसरात असलेल्या चार झाडावंर साडेसहा वाजेच्या दरम्यान वीज पडून त्या झाडांना अचानक आग लागली.या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. वीज पडल्याने त्या परिसरात कानठळ्या बसविणारा आवाज होऊन ही वीज झाडांवर कोसळली.काही क्षणात मोठ्या प्रमाणावर आगीच्या ज्वाळा परिसरात दिसल्या. आग लागल्याची माहिती तातडीने वीज वितरण कंपनीला देण्यात आली. त्यावेळी वीजपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी सांगितले. या वादळी वाऱ्यांमुळे काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला होता. जोरदार वा-यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याचे सांगण्यात आले.दरम्यान संध्याकाळी झालेल्या जोरदार वा-यामुळे औद्योगिक वसाहतीतील एका स्टील कंपनीच्या उच्चदाब वीज वाहिनीची तार कमी दाबाच्या विजेच्या तारांवर पडल्याने मोठे घर्षण होऊन वीज पुरवठा खंडित झाला होता. तो रात्री अथक प्रयत्न करून वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचा-यांनी पूर्ववत केला. सोमवारी जालन्यासह जाफराबाद तालुक्यातही वादळी वा-यासह पाऊस पडला. घनसावंगी तालुक्यातही वादळी वा-यासह पाऊस झाला. यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि जोरदार वादळ आले होते. एकूणच या अवकाळी पावसाचा मोठा फटका आंब्याला बसला असून, मोठ्या प्रमाणावर वा-यामुळे कै-या गळून पडल्या आहेत. यामुळे कै-यांचे भाव कोसळले आहेत.कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वादळी वा-यासह पाऊस झाला.या मुळे उसतोड कामगारांच्या झोपडीवरील पत्रे उडून गेल्याने कामगारांच्या कुटुंबियांची धावपळ झाली होती.चार दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. सोमवारी देखील परिसात वादळी वा-यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला जोराच्या वा-यामुळे परिसरात उसतोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या झोपड्या उडून गेल्या. कामगारांची गैरसोय झाली होती. अवकाळी पावसामुळे आंब्याला आलेल्या कै-या गळून पडल्याने नुकसान झाले आहे.वीज पडून दोन बैल दगावलेजालना : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे रविवारी सायंकाळी अचानक वीज कोसळून दोन बैल दगावले तसेच एक म्हैस भाजल्याने शेतकरी गौतम किसन बोर्डे यांचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी सहाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चार दिवसापासून परिसरात नियमित ढगाळ वातावरण तयार होत आहे. तसेच वादा सायंकाळच्या वेळेला वादळही सुटत आहे. यामुळे अवकाळी पावसाच्या भीतीने फळबाग आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यावर वीज कोसळल्याने गोठ्यामध्ये बांधलेले दोन बैल जागीच दगावले तर एक म्हैस गंभीररीत्या भाजली आहे. तसेच गोठ्यातील चा-यासह इतर साहित्य जळून गेल्याने तब्बल ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच जि.प. सदस्य संतोष लोखंडे, सरपंच डॉ. रवींद्र कासोद, सभापती साहेबराव कानडजे, सभापती भाऊसाहेब जाधव, पं. स . सदस्य दगडूबा गोरे, गजानन लहाने, अनिल चौतमोल, माजी सरपंच भानुदास बोर्डे, नंदू बोर्डे, सैय्यद शब्बीर आदींनी भेट दिली.

टॅग्स :Rainपाऊसfireआगweatherहवामान