शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

उन्हाचा चटका; त्यात अवकाळीचा फटका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:51 IST

जालना शहरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी विजांचे तांडव दिसून आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी विजांचे तांडव दिसून आले. मेघगर्जनेसह झालेल्या पावसा दरम्यान मंठा मार्गावरील प्रियंका रेसिडेंसी परिसरात असलेल्या चार झाडावंर साडेसहा वाजेच्या दरम्यान वीज पडून त्या झाडांना अचानक आग लागली.या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. वीज पडल्याने त्या परिसरात कानठळ्या बसविणारा आवाज होऊन ही वीज झाडांवर कोसळली.काही क्षणात मोठ्या प्रमाणावर आगीच्या ज्वाळा परिसरात दिसल्या. आग लागल्याची माहिती तातडीने वीज वितरण कंपनीला देण्यात आली. त्यावेळी वीजपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी सांगितले. या वादळी वाऱ्यांमुळे काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला होता. जोरदार वा-यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याचे सांगण्यात आले.दरम्यान संध्याकाळी झालेल्या जोरदार वा-यामुळे औद्योगिक वसाहतीतील एका स्टील कंपनीच्या उच्चदाब वीज वाहिनीची तार कमी दाबाच्या विजेच्या तारांवर पडल्याने मोठे घर्षण होऊन वीज पुरवठा खंडित झाला होता. तो रात्री अथक प्रयत्न करून वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचा-यांनी पूर्ववत केला. सोमवारी जालन्यासह जाफराबाद तालुक्यातही वादळी वा-यासह पाऊस पडला. घनसावंगी तालुक्यातही वादळी वा-यासह पाऊस झाला. यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि जोरदार वादळ आले होते. एकूणच या अवकाळी पावसाचा मोठा फटका आंब्याला बसला असून, मोठ्या प्रमाणावर वा-यामुळे कै-या गळून पडल्या आहेत. यामुळे कै-यांचे भाव कोसळले आहेत.कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वादळी वा-यासह पाऊस झाला.या मुळे उसतोड कामगारांच्या झोपडीवरील पत्रे उडून गेल्याने कामगारांच्या कुटुंबियांची धावपळ झाली होती.चार दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. सोमवारी देखील परिसात वादळी वा-यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला जोराच्या वा-यामुळे परिसरात उसतोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या झोपड्या उडून गेल्या. कामगारांची गैरसोय झाली होती. अवकाळी पावसामुळे आंब्याला आलेल्या कै-या गळून पडल्याने नुकसान झाले आहे.वीज पडून दोन बैल दगावलेजालना : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे रविवारी सायंकाळी अचानक वीज कोसळून दोन बैल दगावले तसेच एक म्हैस भाजल्याने शेतकरी गौतम किसन बोर्डे यांचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी सहाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चार दिवसापासून परिसरात नियमित ढगाळ वातावरण तयार होत आहे. तसेच वादा सायंकाळच्या वेळेला वादळही सुटत आहे. यामुळे अवकाळी पावसाच्या भीतीने फळबाग आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यावर वीज कोसळल्याने गोठ्यामध्ये बांधलेले दोन बैल जागीच दगावले तर एक म्हैस गंभीररीत्या भाजली आहे. तसेच गोठ्यातील चा-यासह इतर साहित्य जळून गेल्याने तब्बल ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच जि.प. सदस्य संतोष लोखंडे, सरपंच डॉ. रवींद्र कासोद, सभापती साहेबराव कानडजे, सभापती भाऊसाहेब जाधव, पं. स . सदस्य दगडूबा गोरे, गजानन लहाने, अनिल चौतमोल, माजी सरपंच भानुदास बोर्डे, नंदू बोर्डे, सैय्यद शब्बीर आदींनी भेट दिली.

टॅग्स :Rainपाऊसfireआगweatherहवामान