शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

पावसाने आठ वर्षांत चार वेळेस ओलांडली सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 00:34 IST

यंदाही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मात्र, जिल्ह्यातील ३० हून अधिक प्रकल्प जोत्याखाली आहेत.

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाच्या लहरीपणाचा गत काही वर्षांपासून जालना जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्यांना फटका बसत आहे. जिल्ह्यातील मागील आठ वर्षांचे पर्जन्यमान पाहता ‘कभी खुशी कभी गम’चे चित्र दिसते. चार वर्षे पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती. तर चार वर्षे पाऊस कमी झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. यंदाही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मात्र, जिल्ह्यातील ३० हून अधिक प्रकल्प जोत्याखाली आहेत.जिल्ह्यात दिवसेंदिवस झाडांचे प्रमाण कमी होत आहे. झाडांचे प्रमाण कमी होत असल्याने मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याला सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळामुळे पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे कोरडेठाक पडत असून, सर्वसामान्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.गतवर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे कोरडीठाक पडली होती. त्यामुळे यावर्षी जोरदार पावसाची आशा सर्वांनाच होती. परंतु, जुनच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत होता. मात्र, आक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे सततच्या दुष्काळाला सामना करणाऱ्या जिल्ह्याला यावर्षी काहीसा दिलासा मिळाला आहे.दरम्यान, जिल्ह्यात मागील आठ वर्षांत चार वेळेस वार्षिक सरासरीच्या जास्त पाऊस झाला आहे. तर चार वेळेस वार्षिक सरासरीच्या कमी पाऊस झाला.३१ आक्टोंबरपर्यंत जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मि.मी. आहे. २०१२ ला जिल्ह्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. त्या वर्षी ३२४.९८ मि.मी. पाऊस पडला होता. २०१३ ला जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यावर्षी ७८८.७५ मि.मी. पाऊस जिल्ह्यात पडला. त्यानंतर २०१४, २०१५ सलग दोन वर्षे पाऊस कमी पडल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला. २०१६ आणि २०१७ ला पुन्हा चांगला पाऊस झाला. २०१६ ला ७८३ तर २०१७ ला ६७९ मि.मी. पावसाची नोंद झाली. २०१८ ला पुन्हा तीव्र दुष्काळासामोरे जावे लागले होते. त्यावर्षी ४२४ मि.मी.च पाऊस झाला. त्यामुळे सर्वाधिक टँकरने जिल्ह्यातील गावा-गावांना पाणी पुरवठा करावा लागला. यंदाही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मात्र, सर्वत्र समसमान पाऊस न झाल्याने ३० हून अधिक प्रकल्पात मृत पाणीसाठा आहेत. तर काही प्रकल्पात अपु-या प्रमाणात पाणीसाठा आहे.भोकरदनमध्ये एक हजार मि.मी. पाऊसमागील आठ वर्षांचा विचार केला तर भोकरदन तालुक्यात २०१३ ला ७८५ मिमी पाऊस पडला होता. त्यानंतर मात्र पावसाची सरासरी ६५० मिमीच्या आसपास राहिली.यात २०१२ मध्ये २९२ मि.मी, २०१३ ला ७८५, २०१४ ला ४६७.३८, २०१५ ला ४९३.५०, २०१६ ला ६७४, २०१७ ला ६५०, २०१८ ला ३६६ तर २०१९ ला १००१.८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात यावर्षी ३१ आक्टोंबरपर्यंत १००१ मिमी पाऊस पडला आहे.

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प