शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

पावसाने आठ वर्षांत चार वेळेस ओलांडली सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 00:34 IST

यंदाही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मात्र, जिल्ह्यातील ३० हून अधिक प्रकल्प जोत्याखाली आहेत.

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाच्या लहरीपणाचा गत काही वर्षांपासून जालना जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्यांना फटका बसत आहे. जिल्ह्यातील मागील आठ वर्षांचे पर्जन्यमान पाहता ‘कभी खुशी कभी गम’चे चित्र दिसते. चार वर्षे पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती. तर चार वर्षे पाऊस कमी झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. यंदाही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मात्र, जिल्ह्यातील ३० हून अधिक प्रकल्प जोत्याखाली आहेत.जिल्ह्यात दिवसेंदिवस झाडांचे प्रमाण कमी होत आहे. झाडांचे प्रमाण कमी होत असल्याने मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याला सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळामुळे पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे कोरडेठाक पडत असून, सर्वसामान्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.गतवर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे कोरडीठाक पडली होती. त्यामुळे यावर्षी जोरदार पावसाची आशा सर्वांनाच होती. परंतु, जुनच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत होता. मात्र, आक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे सततच्या दुष्काळाला सामना करणाऱ्या जिल्ह्याला यावर्षी काहीसा दिलासा मिळाला आहे.दरम्यान, जिल्ह्यात मागील आठ वर्षांत चार वेळेस वार्षिक सरासरीच्या जास्त पाऊस झाला आहे. तर चार वेळेस वार्षिक सरासरीच्या कमी पाऊस झाला.३१ आक्टोंबरपर्यंत जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मि.मी. आहे. २०१२ ला जिल्ह्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. त्या वर्षी ३२४.९८ मि.मी. पाऊस पडला होता. २०१३ ला जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यावर्षी ७८८.७५ मि.मी. पाऊस जिल्ह्यात पडला. त्यानंतर २०१४, २०१५ सलग दोन वर्षे पाऊस कमी पडल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला. २०१६ आणि २०१७ ला पुन्हा चांगला पाऊस झाला. २०१६ ला ७८३ तर २०१७ ला ६७९ मि.मी. पावसाची नोंद झाली. २०१८ ला पुन्हा तीव्र दुष्काळासामोरे जावे लागले होते. त्यावर्षी ४२४ मि.मी.च पाऊस झाला. त्यामुळे सर्वाधिक टँकरने जिल्ह्यातील गावा-गावांना पाणी पुरवठा करावा लागला. यंदाही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मात्र, सर्वत्र समसमान पाऊस न झाल्याने ३० हून अधिक प्रकल्पात मृत पाणीसाठा आहेत. तर काही प्रकल्पात अपु-या प्रमाणात पाणीसाठा आहे.भोकरदनमध्ये एक हजार मि.मी. पाऊसमागील आठ वर्षांचा विचार केला तर भोकरदन तालुक्यात २०१३ ला ७८५ मिमी पाऊस पडला होता. त्यानंतर मात्र पावसाची सरासरी ६५० मिमीच्या आसपास राहिली.यात २०१२ मध्ये २९२ मि.मी, २०१३ ला ७८५, २०१४ ला ४६७.३८, २०१५ ला ४९३.५०, २०१६ ला ६७४, २०१७ ला ६५०, २०१८ ला ३६६ तर २०१९ ला १००१.८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात यावर्षी ३१ आक्टोंबरपर्यंत १००१ मिमी पाऊस पडला आहे.

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प