शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

वडीगोद्री, राजूर येथे पावसाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:20 AM

वडीगोद्री आणि गोंदी मंडळात मंगळवारी अवकाळी पाऊस झाला.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : वडीगोद्री आणि गोंदी मंडळात मंगळवारी अवकाळी पाऊस झाला.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा फटका फळबागांनाही बसला आहे. वडीगोद्री मंडळात या अवकाळी पावसामुळे प्राथमिक पाहणी अंदाजानुसार सुमारे २०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.त्यात वडीगोद्री मंडळात ८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून गोंदी मंडळात जवळपास ११४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे प्रशासनाकडून सांगणयत आले. दरम्यान या नुकसनीचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.राजूरसह परिसरात मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-यासह बिगरमौसमी गारांचा पाऊस झाल्याने रबी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. राजूरसह परिसरातील तपोवन, तपोवन तांडा, चणेगांव, लोणगांव, थिगळखेडा, खामखेडा आदी भागात मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले.आमदार कुचे, तहसीलदारांकडून पाहणीबदनापूर : तालुक्यात झालेल्या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतक-यांना धीर देण्यासाठी आमदार नारायण कुचे व तहसीलदार छाया पवार यांनी बुधवारी आन्वी, उज्जैपुरी, वाल्हा, भराडखेडा या गावातील शिवारातील शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी अनिल कोलते, भगवान बारगाजे, भगवान घाडगे,परमेश्वर शिंदे, संजय जगदाळे आदींसह मंडळ अधिकारी, तलाठ्यांची उपस्थिती होती. मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रबी हंगामातील पिकांसह मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. या पावसाने निकळक, राळा, केळीगव्हाण, आन्वी, वाल्हा, उज्जैनपुरी, भराडखेडा, तळणी, म्हसला, लोधेवाडी ,नांदखेडा,सोमठाणा अशा अनेक गावांमधे गारपीट झाली. पावसात गहू, हरभरा,मोसंबी, डाळींब अशी विविध पिके, फळबाग व भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले.यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या नुकसानीचे वास्तव आकडे समोर येण्यासाठी तहसीलदार छाया पवार यांनी पंचनामे करण्याच्या सूचना लवकरच दिल्या जातील असे सांगितले.मापेगाव येथे गारपीटसातोना : परतूर तालुक्यातील मापेगाव खु. येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने परिसरातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. मापेगाव खु. येथील शाकेर शेख यांच्या मोसंबी, गहू, टरबूज, ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसात गारपीट असल्याने उभी पिके आडवी झाली. याच भागात बापूराव काकडे, राम बिजुळे, दत्ता तरवटे, छगन तरवटे, महंमद नासेर यांचे मोठे नुकसान झाले.फळबागांचे नुकसानवरफळ : जिल्ह्यासह विदर्भात मंगळवारी काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वरफळ परिसरातील मोसंबी, आंबा, डाळिंब, द्राक्ष बागांचे नुकसान झाले तर, गहू, हरभरा, मका पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीNatural Calamityनैसर्गिक आपत्ती