शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वडीगोद्री, राजूर येथे पावसाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 00:22 IST

वडीगोद्री आणि गोंदी मंडळात मंगळवारी अवकाळी पाऊस झाला.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : वडीगोद्री आणि गोंदी मंडळात मंगळवारी अवकाळी पाऊस झाला.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा फटका फळबागांनाही बसला आहे. वडीगोद्री मंडळात या अवकाळी पावसामुळे प्राथमिक पाहणी अंदाजानुसार सुमारे २०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.त्यात वडीगोद्री मंडळात ८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून गोंदी मंडळात जवळपास ११४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे प्रशासनाकडून सांगणयत आले. दरम्यान या नुकसनीचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.राजूरसह परिसरात मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-यासह बिगरमौसमी गारांचा पाऊस झाल्याने रबी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. राजूरसह परिसरातील तपोवन, तपोवन तांडा, चणेगांव, लोणगांव, थिगळखेडा, खामखेडा आदी भागात मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले.आमदार कुचे, तहसीलदारांकडून पाहणीबदनापूर : तालुक्यात झालेल्या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतक-यांना धीर देण्यासाठी आमदार नारायण कुचे व तहसीलदार छाया पवार यांनी बुधवारी आन्वी, उज्जैपुरी, वाल्हा, भराडखेडा या गावातील शिवारातील शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी अनिल कोलते, भगवान बारगाजे, भगवान घाडगे,परमेश्वर शिंदे, संजय जगदाळे आदींसह मंडळ अधिकारी, तलाठ्यांची उपस्थिती होती. मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रबी हंगामातील पिकांसह मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. या पावसाने निकळक, राळा, केळीगव्हाण, आन्वी, वाल्हा, उज्जैनपुरी, भराडखेडा, तळणी, म्हसला, लोधेवाडी ,नांदखेडा,सोमठाणा अशा अनेक गावांमधे गारपीट झाली. पावसात गहू, हरभरा,मोसंबी, डाळींब अशी विविध पिके, फळबाग व भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले.यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या नुकसानीचे वास्तव आकडे समोर येण्यासाठी तहसीलदार छाया पवार यांनी पंचनामे करण्याच्या सूचना लवकरच दिल्या जातील असे सांगितले.मापेगाव येथे गारपीटसातोना : परतूर तालुक्यातील मापेगाव खु. येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने परिसरातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. मापेगाव खु. येथील शाकेर शेख यांच्या मोसंबी, गहू, टरबूज, ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसात गारपीट असल्याने उभी पिके आडवी झाली. याच भागात बापूराव काकडे, राम बिजुळे, दत्ता तरवटे, छगन तरवटे, महंमद नासेर यांचे मोठे नुकसान झाले.फळबागांचे नुकसानवरफळ : जिल्ह्यासह विदर्भात मंगळवारी काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वरफळ परिसरातील मोसंबी, आंबा, डाळिंब, द्राक्ष बागांचे नुकसान झाले तर, गहू, हरभरा, मका पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीNatural Calamityनैसर्गिक आपत्ती