शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

वडीगोद्री, राजूर येथे पावसाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 00:22 IST

वडीगोद्री आणि गोंदी मंडळात मंगळवारी अवकाळी पाऊस झाला.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : वडीगोद्री आणि गोंदी मंडळात मंगळवारी अवकाळी पाऊस झाला.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा फटका फळबागांनाही बसला आहे. वडीगोद्री मंडळात या अवकाळी पावसामुळे प्राथमिक पाहणी अंदाजानुसार सुमारे २०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.त्यात वडीगोद्री मंडळात ८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून गोंदी मंडळात जवळपास ११४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे प्रशासनाकडून सांगणयत आले. दरम्यान या नुकसनीचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.राजूरसह परिसरात मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-यासह बिगरमौसमी गारांचा पाऊस झाल्याने रबी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. राजूरसह परिसरातील तपोवन, तपोवन तांडा, चणेगांव, लोणगांव, थिगळखेडा, खामखेडा आदी भागात मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले.आमदार कुचे, तहसीलदारांकडून पाहणीबदनापूर : तालुक्यात झालेल्या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतक-यांना धीर देण्यासाठी आमदार नारायण कुचे व तहसीलदार छाया पवार यांनी बुधवारी आन्वी, उज्जैपुरी, वाल्हा, भराडखेडा या गावातील शिवारातील शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी अनिल कोलते, भगवान बारगाजे, भगवान घाडगे,परमेश्वर शिंदे, संजय जगदाळे आदींसह मंडळ अधिकारी, तलाठ्यांची उपस्थिती होती. मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रबी हंगामातील पिकांसह मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. या पावसाने निकळक, राळा, केळीगव्हाण, आन्वी, वाल्हा, उज्जैनपुरी, भराडखेडा, तळणी, म्हसला, लोधेवाडी ,नांदखेडा,सोमठाणा अशा अनेक गावांमधे गारपीट झाली. पावसात गहू, हरभरा,मोसंबी, डाळींब अशी विविध पिके, फळबाग व भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले.यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या नुकसानीचे वास्तव आकडे समोर येण्यासाठी तहसीलदार छाया पवार यांनी पंचनामे करण्याच्या सूचना लवकरच दिल्या जातील असे सांगितले.मापेगाव येथे गारपीटसातोना : परतूर तालुक्यातील मापेगाव खु. येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने परिसरातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. मापेगाव खु. येथील शाकेर शेख यांच्या मोसंबी, गहू, टरबूज, ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसात गारपीट असल्याने उभी पिके आडवी झाली. याच भागात बापूराव काकडे, राम बिजुळे, दत्ता तरवटे, छगन तरवटे, महंमद नासेर यांचे मोठे नुकसान झाले.फळबागांचे नुकसानवरफळ : जिल्ह्यासह विदर्भात मंगळवारी काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वरफळ परिसरातील मोसंबी, आंबा, डाळिंब, द्राक्ष बागांचे नुकसान झाले तर, गहू, हरभरा, मका पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीNatural Calamityनैसर्गिक आपत्ती