शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

हरभऱ्यात चार पटीने, तर गव्हाच्या पेरणीत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST

रबी हंगाम; मुबलक पाण्यामुळे ४३,५७६ वर पेरणी विष्णू वाकडे जालना : तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला. याचा ...

रबी हंगाम; मुबलक पाण्यामुळे ४३,५७६ वर पेरणी

विष्णू वाकडे

जालना : तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला. याचा फायदा रबी हंगामाला झाला असून, यंदा तब्बल ४३,५७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची १८,८९० हेक्टरवर, तर गव्हाची ८,७९६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मुबलक पाण्यामुळे यंदा सरासरीच्या तुलनेत १७ हजार हेक्टरने पेरणी क्षेत्र वाढले आहे.

तालुक्यात सरासरी २५,७६६ हेक्टवर रबीची पेरणी होते. यंदा मात्र, मुबलक पाण्यामुळे पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला. जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातही पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले व तलाव तुडुंब भरले. पावसामुळे खरीप वाया गेल्याने आता शेतकऱ्यांचे लक्ष रबी हंगामाकडे होते. शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने रबी हंगामात पिकांची पेरणी केली. त्यामुळेच यंदा रबीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तालुक्यात ८,७९६ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत गव्हाच्या पेऱ्यात दुपटीने वाढ झाली आहे. दुसरीकडे हरभऱ्याची, तर विक्रमी पेरणी झाली आहे. ४,२०६ हेक्टर हरभऱ्याची पेरणी अपेक्षित असते. यंदा तब्बल १८,८९० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. सध्या दोन्ही पिके जोमात असून, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. साळेगाव घारे येथील प्रगतिशील शेतकरी संदीप घारे यांनी सांगितले की, खरिपात काढणीच्या वेळी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. यंदा पाऊस चांगला झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी हंगामातील पिकांची पेरणी केली असून, शेतकऱ्यांना आता चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती व्यवसाय सुकर होत असला तरी खर्च वाढत असल्याचे हिवरा रोशनगाव येथील शेतकरी दादासाहेब भुतेकर यांनी सांगितले.

चौकट

यंदा रबी हंगामात गहू आणि हरभरा या पिकांची पेरणी करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर करून योग्य पाणी व्यवस्थापन करावे. पिकाची काढणी, कापणी याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. पुढच्या वर्षीसाठी लागणारे बियाणे घरच्या घरी तयार करून ठेवावे.

-संतोष गाडे, तालुका कृषी अधिकारी, जालना