शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

गारपिटीपासून द्राक्षबागांचे संरक्षण; प्लॅस्टिक कव्हरला ५० टक्के अनुदान मिळणार, लवकर अर्ज करा

By दिपक ढोले  | Updated: August 2, 2023 16:43 IST

या अनुदानासाठी शासनाने ‘महाडीबीटी’च्या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज मागविले आहेत.

जालना : अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान होत होते. द्राक्षबागांच्या संरक्षणासाठी प्लॅस्टिक कव्हर घटकाचा शासकीय योजनेत समावेश करण्यात आला आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लॅस्टिक कव्हर ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीपासून द्राक्षबागांचे संरक्षण होण्याकरिता प्लॅस्टिक कव्हरसाठी एकरी दोन लाख ४० हजार ६७२ रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून, द्राक्षबागांचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे. औषध फवारणीचा खर्चही कमी होणार असल्याचे द्राक्ष उत्पादकांचे मत आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून प्लॅस्टिक कव्हरसाठी अनुदान मिळण्यासाठी नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली जाणार आहे. या अनुदानासाठी शासनाने ‘महाडीबीटी’च्या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज मागविले आहेत. अर्ज किती येतील, त्यावर लाभार्थींची निवड कशा पद्धतीने करायची ते धोरण कृषी विभाग ठरविणार आहे.

..असे मिळेल अनुदानया योजनेसाठी खर्चाचे मापदंड प्रतिएकर चार लाख ८१ हजार ३४४ रुपये इतका निश्चित केला आहे. प्रतिलाभार्थी २० गुंठे ते एक एकरदरम्यान लाभ देण्यात येणार आहे. मात्र, अनुदान मर्यादा खर्चाच्या ५० टक्के किंवा प्रतिएकर दोन लाख ४० हजार ६७२ रुपये असेल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

याेजनेचा उद्देशगारपीट व अवकाळी पावसापासून द्राक्षबागांचे संरक्षण करणे.शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम द्राक्ष पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक साहाय्य करणे.फळबागांकरीता आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे.ग्रामीण भागातील युवकांना कृषिक्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.

येथे करणार अर्जराज्यातील नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, धाराशिव, जालना, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. महाडीबीटी पोर्टलवर जाऊन फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करता येतो.

आवश्यक कादगपत्रेया योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा, ८ अ, आधार कार्ड, बँक खात्याची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र, विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र आणि चतु:सीमा नकाशा आदी कागदपत्र गरजेचे असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे यांनी दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र