शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यातील प्रकल्पांना दमदार पावसाची आस कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:55 IST

जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये आवश्यक तेवढा जलसाठा नसल्याने मोठी बिकट स्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या आठवड्यात रिमझिम पावसाने खरिपांच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये आवश्यक तेवढा जलसाठा नसल्याने मोठी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणजे थेट वरुण राजाची कृपा हाच आहे. जिल्ह्यातील सात पैकी एक मध्यम आणि ३७ लघु प्रकल्प हे अद्यापही कोरडेठाक आहेत.जालना जिल्ह्यात गेल्यावर्षी देखील सरासरीच्या केवळ ६० टक्केच पाऊस झाला होता. त्यामुळे दुष्काळाची दाहता गंभीर स्वरूपाची होती. त्यातच पाणी टंचाईने देखील रौद्र रूप धारण केल्याने जवळपास यंदा ७०० पेक्षा अधिक टँकरने गाव आणि वाड्यांना पाणीपुरवठा करावा लागला. यंदाही तशीच स्थिती कायम राहिली तर मोठे जल संकट निर्माण होऊ शकते. यंदाचा अर्धा पावसाळा संपला आहे. असे असतांना झालेल्या पावसाने केवळ पिकांना जीवदान मिळाले आहे. परंतु पाणीप्रश्न कायम आहे. जर चांगला पाऊस झाला नाही, तर यंदाही दुष्काळ राहू शकतो.जालना जिल्ह्यात एकूण सात मध्यम आणि ५७ लघु प्रकल्प आहेत. एक आॅगस्टला मोजलेल्या पाणी पातळीत मोठी गंभीर बाब समोर आली आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी एक तलाव कोरडा असून, चार तलावात जोत्याच्या पातळी खाली पाणीसाठा आहे.४तर लघु तलावांपैकी ३९ तलाव कोरडेठाक आहेत. मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ भोकरदन तालुक्यातील जुई आणि धामणा धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :droughtदुष्काळDamधरणwater shortageपाणीकपातRainपाऊस