शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यातील प्रकल्पांना दमदार पावसाची आस कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:55 IST

जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये आवश्यक तेवढा जलसाठा नसल्याने मोठी बिकट स्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या आठवड्यात रिमझिम पावसाने खरिपांच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये आवश्यक तेवढा जलसाठा नसल्याने मोठी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणजे थेट वरुण राजाची कृपा हाच आहे. जिल्ह्यातील सात पैकी एक मध्यम आणि ३७ लघु प्रकल्प हे अद्यापही कोरडेठाक आहेत.जालना जिल्ह्यात गेल्यावर्षी देखील सरासरीच्या केवळ ६० टक्केच पाऊस झाला होता. त्यामुळे दुष्काळाची दाहता गंभीर स्वरूपाची होती. त्यातच पाणी टंचाईने देखील रौद्र रूप धारण केल्याने जवळपास यंदा ७०० पेक्षा अधिक टँकरने गाव आणि वाड्यांना पाणीपुरवठा करावा लागला. यंदाही तशीच स्थिती कायम राहिली तर मोठे जल संकट निर्माण होऊ शकते. यंदाचा अर्धा पावसाळा संपला आहे. असे असतांना झालेल्या पावसाने केवळ पिकांना जीवदान मिळाले आहे. परंतु पाणीप्रश्न कायम आहे. जर चांगला पाऊस झाला नाही, तर यंदाही दुष्काळ राहू शकतो.जालना जिल्ह्यात एकूण सात मध्यम आणि ५७ लघु प्रकल्प आहेत. एक आॅगस्टला मोजलेल्या पाणी पातळीत मोठी गंभीर बाब समोर आली आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी एक तलाव कोरडा असून, चार तलावात जोत्याच्या पातळी खाली पाणीसाठा आहे.४तर लघु तलावांपैकी ३९ तलाव कोरडेठाक आहेत. मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ भोकरदन तालुक्यातील जुई आणि धामणा धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :droughtदुष्काळDamधरणwater shortageपाणीकपातRainपाऊस