शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

१८ गावांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:06 IST

विजेची देयके थकल्याचे कारण पुढे करत वीज वितरण कंपनीने अंबड तालुक्यातील १८ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : विजेची देयके थकल्याचे कारण पुढे करत वीज वितरण कंपनीने अंबड तालुक्यातील १८ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने महिलांची मोठी अडचण होत आहे. तसेच शेतातील विहिरींमध्ये पाणी असूनही ते पिकांना देता येत नाही.या अठरा गावातील ग्रामस्थांकडे जवळपास ३३ लाख २७ हजार रुपयांचे वीजबिल थकले आहेत. त्यामुळे अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी, नालेवाडी, रेणापुरी, चंदनापुरी खुर्द व बुद्रूक, भांबेरी, रामगव्हाण, टाका, दुनगाव, एकलहेरा, शहापूर, झोडेगाव, पाथरवाला खुर्द, दोदडगाव इ. गावांना पाणीपुरवठा करणा-या विहिरींचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे.महावितरण कंपनीने वेळोवेळी ग्रामपंचायतींना थकबाकी भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, तरीही ग्रामपंचायतींनी विजेची देयके भरली नाहीत. त्यामुळे १६ जानेवारी रोजी सर्व गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीज पुरवठा खंडित होण्याबाबत पूर्वकल्पना असतांना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलण्यात आले नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामसेवकही गावात येत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.दरम्यान, भांबेरी येथील सरपंच सहदेव भारती यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ग्रामस्थांकडून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वेळेत भरली जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीनी वीज बिलासाठी निधी आणायचा कुठून, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.५० टक्के वीजबिल भरावेयासंदर्भात वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एस.एस. हरकळ यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, वरिष्ठांकडून मोठ्या प्रमाणावर वीज बिलाची वसुली करण्याच्या सूचना आहेत. ही थकबाकी भरावी म्हणून कल्पना दिली होती. ही बाब गंभीरतेने न घेतल्याने आम्हाला हा वीजपुरवठा खंडित केला. वीजपुरवठा करण्यासाठी ५० टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजbillबिलWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प