शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

१८ गावांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:06 IST

विजेची देयके थकल्याचे कारण पुढे करत वीज वितरण कंपनीने अंबड तालुक्यातील १८ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : विजेची देयके थकल्याचे कारण पुढे करत वीज वितरण कंपनीने अंबड तालुक्यातील १८ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने महिलांची मोठी अडचण होत आहे. तसेच शेतातील विहिरींमध्ये पाणी असूनही ते पिकांना देता येत नाही.या अठरा गावातील ग्रामस्थांकडे जवळपास ३३ लाख २७ हजार रुपयांचे वीजबिल थकले आहेत. त्यामुळे अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी, नालेवाडी, रेणापुरी, चंदनापुरी खुर्द व बुद्रूक, भांबेरी, रामगव्हाण, टाका, दुनगाव, एकलहेरा, शहापूर, झोडेगाव, पाथरवाला खुर्द, दोदडगाव इ. गावांना पाणीपुरवठा करणा-या विहिरींचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे.महावितरण कंपनीने वेळोवेळी ग्रामपंचायतींना थकबाकी भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, तरीही ग्रामपंचायतींनी विजेची देयके भरली नाहीत. त्यामुळे १६ जानेवारी रोजी सर्व गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीज पुरवठा खंडित होण्याबाबत पूर्वकल्पना असतांना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलण्यात आले नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामसेवकही गावात येत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.दरम्यान, भांबेरी येथील सरपंच सहदेव भारती यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ग्रामस्थांकडून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वेळेत भरली जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीनी वीज बिलासाठी निधी आणायचा कुठून, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.५० टक्के वीजबिल भरावेयासंदर्भात वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एस.एस. हरकळ यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, वरिष्ठांकडून मोठ्या प्रमाणावर वीज बिलाची वसुली करण्याच्या सूचना आहेत. ही थकबाकी भरावी म्हणून कल्पना दिली होती. ही बाब गंभीरतेने न घेतल्याने आम्हाला हा वीजपुरवठा खंडित केला. वीजपुरवठा करण्यासाठी ५० टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजbillबिलWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प