शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

झोपेत असताना भिंत कोसळून एक ठार; चार बकऱ्यांचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 19:46 IST

बाजीराव गवळी यांना एक एकर जमीन असून, ते टेलरींग व्यवसाय व बकऱ्यांचे संगोपन करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते.

ठळक मुद्देचांधई एक्को येथील घटना

राजूर : पत्राच्या शेडवर भिंत कोसळून झोपेत असलेल्या एका इसमासह चार बकऱ्या ठार झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथे शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. बाजीराव बाबुराव गवळी (५१) असे मयताचे नाव आहे.

चांधई एक्को येथील मुरलीधर दादाराव ढाकणे यांच्या घराच्या शेजारी बाजीराव बाबुराव गवळी यांचे पत्राचे शेड आहे. शेडमध्ये ते शुक्रवारी सांयकाळी नेहमी प्रमाणे झोपले होते. सध्या राजूर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुरलीधर ढाकणे यांच्या घराची भिंत शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कोसळून पत्राच्या शेडवर पडली. यात बाजीराव गवळी यांच्यासह बकऱ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. आसपासच्या नागरिकांनी मदतकार्य करून बाजीराव गवळी यांना ढिगाऱ्याच्या बाहेर काढले. त्यानंतर राजूरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

बाजीराव गवळी यांना एक एकर जमीन असून, ते टेलरींग व्यवसाय व बकऱ्यांचे संगोपन करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते. घरातील कर्ता गेल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घटनास्थळी तलाठी पल्लवी मानकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. ई. तायडे, सरपंच अनिता तळेकर यांनी भेट देवून पंचनामा केला आहे. याप्रकरणी राजूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार शिवाजीराव देशमुख हे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूRainपाऊसJalanaजालना