शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

झोपेत असताना भिंत कोसळून एक ठार; चार बकऱ्यांचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 19:46 IST

बाजीराव गवळी यांना एक एकर जमीन असून, ते टेलरींग व्यवसाय व बकऱ्यांचे संगोपन करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते.

ठळक मुद्देचांधई एक्को येथील घटना

राजूर : पत्राच्या शेडवर भिंत कोसळून झोपेत असलेल्या एका इसमासह चार बकऱ्या ठार झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथे शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. बाजीराव बाबुराव गवळी (५१) असे मयताचे नाव आहे.

चांधई एक्को येथील मुरलीधर दादाराव ढाकणे यांच्या घराच्या शेजारी बाजीराव बाबुराव गवळी यांचे पत्राचे शेड आहे. शेडमध्ये ते शुक्रवारी सांयकाळी नेहमी प्रमाणे झोपले होते. सध्या राजूर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुरलीधर ढाकणे यांच्या घराची भिंत शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कोसळून पत्राच्या शेडवर पडली. यात बाजीराव गवळी यांच्यासह बकऱ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. आसपासच्या नागरिकांनी मदतकार्य करून बाजीराव गवळी यांना ढिगाऱ्याच्या बाहेर काढले. त्यानंतर राजूरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

बाजीराव गवळी यांना एक एकर जमीन असून, ते टेलरींग व्यवसाय व बकऱ्यांचे संगोपन करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते. घरातील कर्ता गेल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घटनास्थळी तलाठी पल्लवी मानकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. ई. तायडे, सरपंच अनिता तळेकर यांनी भेट देवून पंचनामा केला आहे. याप्रकरणी राजूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार शिवाजीराव देशमुख हे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूRainपाऊसJalanaजालना