शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जालन्यात पीटलाइनसाठी शंभर एकर जागा उपलब्ध, तर औरंगाबादेत नव्याने करावी लागेल खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 13:14 IST

Railway Pitline पीटलाइनची उभारणी आणि रेल्वेची चाके निर्मितीचा प्रकल्प जालन्यातच व्हावा, अशी आग्रही मागणी रेल्वे संघर्ष समितीने केली आहे.

जालना : जालना हे पूर्वीपासून भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थानावर आहे. त्यामुळे निजाम काळापासूनच रेल्वेला मोठे महत्त्व होते. येथे रेल्वेची जवळपास शंभर एकर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे पीटलाइनची ( Railway Pitline ) उभारणी आणि रेल्वेची चाके निर्मितीचा प्रकल्प जालन्यातच व्हावा, ही आमची आग्रही मागणी आहे. औरंगाबादेत रेल्वेला शंभर एकर जागा नव्याने खरेदी करून तेथे पीटलाइन उभारावी लागणार असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीने रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात पंधरा दिवसांपूर्वी किसान रेल्वेच्या शुभारंभप्रसंगी पीटलाइन जालन्यातच होईल, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यावरून मोठा गदारोळ उठला आहे. औरंगाबाद येथील काही जण ही पीटलाइन औरंगाबादला होणार होती. मात्र, ती रेल्वे राज्यमंत्री दानवेंनी पळविली, असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यात माजी मंत्री फौजिया खान यांनीही जी प्रतिक्रिया दिली ती चुकीची असून, त्यांना या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नसल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी यांनी दिली. जालना ते खामगाव हा रेल्वेमार्ग व्हावा, ही जुनीच मागणी आहे. याचे दोन वेळा सर्वेक्षणही पूर्ण झाले; परंतु तो फिजिबल नसल्याचा अहवाल दिला आहे; परंतु वास्तव वेगळेच असून, जालना ते खामगाव हा रेल्वेमार्ग झाल्यास जालना हे थेट उत्तर भारताशी जोडले जाऊन त्याचा मोठा लाभ उद्योगवाढीसह प्रवाशांना होणार आहे. आता अंतिम सर्वेक्षणासाठी दानवे यांनी तीन कोटी ७५ लाख रुपयांचा निधी दिला आहे.

त्यामुळे या सर्वेक्षणाकडे लक्ष लागून आहे. हा सर्व्हे सकारात्मक येईल, अशी आमची आशा असल्याचेही चौधरी म्हणाले. यावेळी सोलापूर ते जळगाव या रेल्वे लाइनबद्दलही संघर्ष समितीने दहा वर्षांपासून पाठपुरावा केला. त्याचे सर्वेक्षण पूर्ण होऊन ती जालन्यातून नेल्यावर कशी आर्थिक लाभदायी आहे, हे स्पष्ट होते; परंतु ही रेल्वे औरंगाबाद येथून न्यावी, असा आग्रह केला होता. नंतर हा प्रकल्प बारगळला आहे. त्यासाठीदेखील आम्ही दानवेंकडे पाठपुरावा करू, असे फेरोज अली मैालाना यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस गेंदालाल झुंगे, डॉ. राधेश्याम जयस्वाल, डॉ. करवा, सुरेश सद्गुरे, बाबूराव सतकर, अभय यादव आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :railwayरेल्वेraosaheb danveरावसाहेब दानवेMarathwadaमराठवाडाJalanaजालनाAurangabadऔरंगाबाद