शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

वृध्द व्यापाऱ्याचे अपहरण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:55 PM

५० लाखाच्या खंडणीसाठी जालना येथील ७० वर्षीय वृध्द व्यापा-याचे सोमवारी रात्री अपहरण करण्यात आले होते. खेराजभाई भानुशाली (७०) असे वृध्द व्यापा-याचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास व्यापा-याची सुखरूप सुटका केली.

ठळक मुद्देअपहरणकर्त्यांनी मागितली खंडणी : पोलिसांनी मध्यरात्रीच केली नाट्यमयरित्या सुटका

जालना : ५० लाखाच्या खंडणीसाठी जालना येथील ७० वर्षीय वृध्द व्यापा-याचे सोमवारी रात्री अपहरण करण्यात आले होते. खेराजभाई भानुशाली (७०) असे वृध्द व्यापा-याचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास व्यापा-याची सुखरूप सुटका केली.जालना येथील वृद्ध व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे नवा मोंढा येथे बारदाण्याचे दुकान आहे. ते सोमवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी जात होते. घरी जात असताना अपहरणकर्त्यांनी स्कुटी थांबवून त्यांना चाकूचा धाक दाखवून कारमधून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी खेराजभाई भानुशाली यांच्या मुलाला फोन करून ५० लाखाची खंडणी मागितली. त्यांनी लगेचच पोलिसांना कळवले. त्यानंतर खंडणी देत असल्याचा बनाव करण्यात आला. तडजोडी अंती २ लाख रुपये देण्याचे ठरले. अपहरणकर्त्यांनी खंडणी घेऊन मुर्गी तलाव येथे बोलवले. त्यानंतर लगेचच सेंटमेरी स्कूल जवळ येण्यास सांगितले.त्यावेळी भानुशाली यांच्या मुलाने वडिलाना सोडण्याची मागणी केली. सोमवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास सेंटमेरी स्कूल येथे रक्कम ठेवण्यात आली. तेव्हाच पोलिसांनी अपहरणकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली. अपहरणकर्त्यांनी ५० लाखावरून थेट दोन लाखावर येण्याची तयारी दर्शविल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जालन्यातील घटना : रिक्षा, कारमधून पोहचले पोलीससायंकाळी व्यापा-याचे अपहरण झाल्यानंतर त्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे स्वत: त्यांच्या पथकातील कर्मचाºयांसह दोन रिक्षाव्दारे सेंटमेरी भागात पोहचले. तर अपहरण केलेल्या व्यापाºयाच्या मुलाला एका कारमध्ये दोन लाख रूपये घेऊन पाठविले.खंडणी खोरांनी पैसे देण्यासाठी दोन लाख रूपये प्रथम सेंटेमेरी शाळेजवळील लिंबाच्या झाडाखाली ठेवण्याची सूचना केली. परंतु नंतर पुन्हा ही बॅग सेंटमेरी शाळेजवळील गल्लीत आणून देण्याचे अपहरण कर्त्यांनी केल्याने पोलिस संभ्रमित झाले.परंतु दोन लाख घेतल्यावर अपरहण कर्त्यांनी वृध्द व्यापा-यास सोडून दिल्यावर लगेचच रिक्षात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अपहकरण कर्त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी एक आरोपी ठेच लागून पडला. त्याच्याकडून दोन लाख रूपये तसेच गुप्ती जप्त करून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात आतापर्यंत तीन संशयित ताब्यात घेतले असून, एक कार जप्त केल्याची माहिती गौर यांनी दिली.यासाठी तात्पुरत व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला होता.

टॅग्स :JalanaजालनाKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस