शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वृध्द व्यापाऱ्याचे अपहरण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:56 IST

५० लाखाच्या खंडणीसाठी जालना येथील ७० वर्षीय वृध्द व्यापा-याचे सोमवारी रात्री अपहरण करण्यात आले होते. खेराजभाई भानुशाली (७०) असे वृध्द व्यापा-याचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास व्यापा-याची सुखरूप सुटका केली.

ठळक मुद्देअपहरणकर्त्यांनी मागितली खंडणी : पोलिसांनी मध्यरात्रीच केली नाट्यमयरित्या सुटका

जालना : ५० लाखाच्या खंडणीसाठी जालना येथील ७० वर्षीय वृध्द व्यापा-याचे सोमवारी रात्री अपहरण करण्यात आले होते. खेराजभाई भानुशाली (७०) असे वृध्द व्यापा-याचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास व्यापा-याची सुखरूप सुटका केली.जालना येथील वृद्ध व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे नवा मोंढा येथे बारदाण्याचे दुकान आहे. ते सोमवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी जात होते. घरी जात असताना अपहरणकर्त्यांनी स्कुटी थांबवून त्यांना चाकूचा धाक दाखवून कारमधून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी खेराजभाई भानुशाली यांच्या मुलाला फोन करून ५० लाखाची खंडणी मागितली. त्यांनी लगेचच पोलिसांना कळवले. त्यानंतर खंडणी देत असल्याचा बनाव करण्यात आला. तडजोडी अंती २ लाख रुपये देण्याचे ठरले. अपहरणकर्त्यांनी खंडणी घेऊन मुर्गी तलाव येथे बोलवले. त्यानंतर लगेचच सेंटमेरी स्कूल जवळ येण्यास सांगितले.त्यावेळी भानुशाली यांच्या मुलाने वडिलाना सोडण्याची मागणी केली. सोमवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास सेंटमेरी स्कूल येथे रक्कम ठेवण्यात आली. तेव्हाच पोलिसांनी अपहरणकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली. अपहरणकर्त्यांनी ५० लाखावरून थेट दोन लाखावर येण्याची तयारी दर्शविल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जालन्यातील घटना : रिक्षा, कारमधून पोहचले पोलीससायंकाळी व्यापा-याचे अपहरण झाल्यानंतर त्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे स्वत: त्यांच्या पथकातील कर्मचाºयांसह दोन रिक्षाव्दारे सेंटमेरी भागात पोहचले. तर अपहरण केलेल्या व्यापाºयाच्या मुलाला एका कारमध्ये दोन लाख रूपये घेऊन पाठविले.खंडणी खोरांनी पैसे देण्यासाठी दोन लाख रूपये प्रथम सेंटेमेरी शाळेजवळील लिंबाच्या झाडाखाली ठेवण्याची सूचना केली. परंतु नंतर पुन्हा ही बॅग सेंटमेरी शाळेजवळील गल्लीत आणून देण्याचे अपहरण कर्त्यांनी केल्याने पोलिस संभ्रमित झाले.परंतु दोन लाख घेतल्यावर अपरहण कर्त्यांनी वृध्द व्यापा-यास सोडून दिल्यावर लगेचच रिक्षात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अपहकरण कर्त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी एक आरोपी ठेच लागून पडला. त्याच्याकडून दोन लाख रूपये तसेच गुप्ती जप्त करून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात आतापर्यंत तीन संशयित ताब्यात घेतले असून, एक कार जप्त केल्याची माहिती गौर यांनी दिली.यासाठी तात्पुरत व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला होता.

टॅग्स :JalanaजालनाKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस