शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आता एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची यात्रा निघेल- मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 08:03 IST

शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात झालेला संवाद...

-विजय मुंडे

अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी राज्य शासनाचे शिष्टमंडळ मंगळवारी दुपारनंतर उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात झालेला हा संवाद...

गिरीश महाजन : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांशी बोलणं झाले आहे. मार्ग काढायचा आहे. सर्वजण पॉझिटिव्ह आहेत. कायदेशीर बाबी सोडविण्यासाठी एक महिन्यांचा वेळ हवा.मनोज जरांगे : तुम्हाला एक महिन्यांचा अवधी कशाला पाहिजे. यादीत ८३ क्रमांकावर मराठा आहे. मग त्याला अहवाल कशाला पाहिजे.गिरीश महाजन : समिती हैदराबादला गेली. आम्ही सगळे रेकॉर्ड आणतोय. तुम्ही सोबत चला आपण बसू चर्चा करू. आता उपोषण संपवा.मनोज जरांगे : आम्ही उपोषण नाही थांबविणार. आम्ही तुम्हाला यादी दिली. तुम्ही समजून घ्या. तुम्ही खूप मोठे निर्णय घेतले आहेत. सगळं काही होतं.अर्जुन खोतकर : तुमच्या प्रयत्नाने सर्वजण पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही समाजाला वेळ द्यावा.मनोज जरांगे : वेळ कशाला, जर ८३ क्रमांकावर मराठा आहे. द्यायला सरकारला प्रॉब्लेम नाही. त्याला चॅलेंज होऊ शकत नाही.अतुल सावे : त्याला सिस्टीममध्ये आणून करावे लागेल नामनोज जरांगे : अहो, सिस्टिममध्येच आणलेली आहे ना यादी. बाकी गेले कसे सगळे मग बिगर सिस्टिमचे. दादा तुमच्याकडे ओबीसीची यादी आहे. समितीला तिथेच बस म्हणा. काही गरज नाही त्यांना फिरवायची. विदर्भातील सर्व मराठा ओबीसीत आहे. खानदेशचा पूर्ण गेला. आम्ही काय केलं मग. तुम्ही अध्यादेश काढा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल.अर्जुन खोतकर : पाटील वेळ मिळेल कामनोज जरांगे : दिला ना वेळ. मामा, आपण बसलो त्यावेळी सीएम साहेबांनी एक महिना मागितला. मी तुम्हाला तीन महिने दिले. तुम्ही परत का वेळ मागता. आम्ही १९९० पासून विनाकारण बाहेर आहोत.संदीपान भुमरे : नाही मिळालं तर आम्ही जबाबदार राहू.मनोज जरांगे : नाही मिळालं तर, झालं ना समाजाचं वाटोळं. त्यापेक्षा मी असेच मेलेलो बरे. आता मी शेवटचे लढतोय. आता एक तर माझी अंत्ययात्रा निघेल नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची यात्रा निघेल. बाळांनो जगलो तर तुमचा. मेलो तर समाजाचा.गिरीश महाजन : एवढी टोकाची भूमिका आंदोलनात घेऊन जमत नाहीमनोज जरांगे : याला टोक नाही म्हणत साहेब, ४ फेब्रुवारीपासून लढतोय.संदीपान भुमरे : मरायची भाषा नाही करायची, लढायचंमनोज जरांगे : नाही लढतोयच. फक्त कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ही लढाई करतोय आम्ही. शांततेची. तरी यात आमचे डोके फोडलेत तुम्ही. ह्यो काय डोकं फुटलेला तुमच्या पुढे आहे.गिरीश महाजन : आम्ही अहवाल मागतोय.मनोज जरांगे : अहो, अहवाल आलाय ना... नका अंत पाहू. मी तुम्हाला आणखी चार दिवस देतो. नका ताणू साहेब, भरती आलीय जवळ.गिरीश महाजन : चला मुंबईला या. चर्चा करा.मनोज जरांगे : नाही उद्याचाला मी शिष्टमंडळ पाठवितो.संदीपान भुमरे : पाटील तुम्ही चलामनोज जरांगे : अहो मी उपोषणकर्ता आहे मी कसा येणार. तुम्ही सगळे करून घ्या.गिरीश महाजन : थोड्या अडचणी आहेत. कायदेशीर बाबी आहेत.मनोज जरांगे : अन् मला काय कळतं कायद्यातलं.गिरीश महाजन : आता तुम्ही लोकांना बोला, टोकाची भूमिका घेऊ नकामनोज जरांगे : नाही नाही. (उपस्थितांना उद्देशून) आता सरकारशी आपली चर्चा झाली. महाराष्ट्रातील समाजाच्या वतीने आपण सर्वजण चार दिवसांचा वेळ दिलाय. चार दिवसांत ते आरक्षणाचा जीआर घेऊन येतील. शांततेत आंदोलन करू. आपल्याला हे आरक्षण कायमस्वरूपी टिकवायचे आहे. त्यामुळे आणखी चार दिवसांचा वेळ देऊ. स्पष्ट सांगतो. चार दिवसानंतर अन्नपाणी सगळे बंद.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार