शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आता एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची यात्रा निघेल- मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 08:03 IST

शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात झालेला संवाद...

-विजय मुंडे

अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी राज्य शासनाचे शिष्टमंडळ मंगळवारी दुपारनंतर उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात झालेला हा संवाद...

गिरीश महाजन : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांशी बोलणं झाले आहे. मार्ग काढायचा आहे. सर्वजण पॉझिटिव्ह आहेत. कायदेशीर बाबी सोडविण्यासाठी एक महिन्यांचा वेळ हवा.मनोज जरांगे : तुम्हाला एक महिन्यांचा अवधी कशाला पाहिजे. यादीत ८३ क्रमांकावर मराठा आहे. मग त्याला अहवाल कशाला पाहिजे.गिरीश महाजन : समिती हैदराबादला गेली. आम्ही सगळे रेकॉर्ड आणतोय. तुम्ही सोबत चला आपण बसू चर्चा करू. आता उपोषण संपवा.मनोज जरांगे : आम्ही उपोषण नाही थांबविणार. आम्ही तुम्हाला यादी दिली. तुम्ही समजून घ्या. तुम्ही खूप मोठे निर्णय घेतले आहेत. सगळं काही होतं.अर्जुन खोतकर : तुमच्या प्रयत्नाने सर्वजण पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही समाजाला वेळ द्यावा.मनोज जरांगे : वेळ कशाला, जर ८३ क्रमांकावर मराठा आहे. द्यायला सरकारला प्रॉब्लेम नाही. त्याला चॅलेंज होऊ शकत नाही.अतुल सावे : त्याला सिस्टीममध्ये आणून करावे लागेल नामनोज जरांगे : अहो, सिस्टिममध्येच आणलेली आहे ना यादी. बाकी गेले कसे सगळे मग बिगर सिस्टिमचे. दादा तुमच्याकडे ओबीसीची यादी आहे. समितीला तिथेच बस म्हणा. काही गरज नाही त्यांना फिरवायची. विदर्भातील सर्व मराठा ओबीसीत आहे. खानदेशचा पूर्ण गेला. आम्ही काय केलं मग. तुम्ही अध्यादेश काढा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल.अर्जुन खोतकर : पाटील वेळ मिळेल कामनोज जरांगे : दिला ना वेळ. मामा, आपण बसलो त्यावेळी सीएम साहेबांनी एक महिना मागितला. मी तुम्हाला तीन महिने दिले. तुम्ही परत का वेळ मागता. आम्ही १९९० पासून विनाकारण बाहेर आहोत.संदीपान भुमरे : नाही मिळालं तर आम्ही जबाबदार राहू.मनोज जरांगे : नाही मिळालं तर, झालं ना समाजाचं वाटोळं. त्यापेक्षा मी असेच मेलेलो बरे. आता मी शेवटचे लढतोय. आता एक तर माझी अंत्ययात्रा निघेल नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची यात्रा निघेल. बाळांनो जगलो तर तुमचा. मेलो तर समाजाचा.गिरीश महाजन : एवढी टोकाची भूमिका आंदोलनात घेऊन जमत नाहीमनोज जरांगे : याला टोक नाही म्हणत साहेब, ४ फेब्रुवारीपासून लढतोय.संदीपान भुमरे : मरायची भाषा नाही करायची, लढायचंमनोज जरांगे : नाही लढतोयच. फक्त कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ही लढाई करतोय आम्ही. शांततेची. तरी यात आमचे डोके फोडलेत तुम्ही. ह्यो काय डोकं फुटलेला तुमच्या पुढे आहे.गिरीश महाजन : आम्ही अहवाल मागतोय.मनोज जरांगे : अहो, अहवाल आलाय ना... नका अंत पाहू. मी तुम्हाला आणखी चार दिवस देतो. नका ताणू साहेब, भरती आलीय जवळ.गिरीश महाजन : चला मुंबईला या. चर्चा करा.मनोज जरांगे : नाही उद्याचाला मी शिष्टमंडळ पाठवितो.संदीपान भुमरे : पाटील तुम्ही चलामनोज जरांगे : अहो मी उपोषणकर्ता आहे मी कसा येणार. तुम्ही सगळे करून घ्या.गिरीश महाजन : थोड्या अडचणी आहेत. कायदेशीर बाबी आहेत.मनोज जरांगे : अन् मला काय कळतं कायद्यातलं.गिरीश महाजन : आता तुम्ही लोकांना बोला, टोकाची भूमिका घेऊ नकामनोज जरांगे : नाही नाही. (उपस्थितांना उद्देशून) आता सरकारशी आपली चर्चा झाली. महाराष्ट्रातील समाजाच्या वतीने आपण सर्वजण चार दिवसांचा वेळ दिलाय. चार दिवसांत ते आरक्षणाचा जीआर घेऊन येतील. शांततेत आंदोलन करू. आपल्याला हे आरक्षण कायमस्वरूपी टिकवायचे आहे. त्यामुळे आणखी चार दिवसांचा वेळ देऊ. स्पष्ट सांगतो. चार दिवसानंतर अन्नपाणी सगळे बंद.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार