शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

पिटलाइनमुळे जालन्यातून सुटणार नवीन रेल्वे: रावसाहेब दानवे

By विजय मुंडे  | Published: March 13, 2024 7:31 PM

जोपर्यंत पिटलाईनची सुविधा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत जालन्यातून नवीन गाड्या सोडणे शक्य नव्हते.

जालना : पायाभूत सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तोपर्यंत जिल्ह्याचा विकास होत नाही. त्यामुळे आपण रेल्वे विभागासह विद्युत, सिंचन, रस्त्यांची अधिकाधिक कामे करण्यावर भर दिला आहे. त्यातून पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढील काळ हा अमृतमहोत्सवाचा काळ असल्याचे सांगितले आहे. या काळात देशाच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यावर त्यांचा भर राहणार असून, यात आपण सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. पिटलाईन सुरू झाल्याने जालना रेल्वे स्थानकातून नवीन रेल्वे सुटणार असल्याचेही ते म्हणाले.

जालना येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात १०० कोटी रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या पिटलाईनचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी रेल्वे विभागाच्या डीआरएम नीती सरकार, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उद्योजक घनश्याम गोयल, बद्री पठाडे, सिद्धिविनायक मुळे, भास्कर दानवे, आदींची उपस्थिती होती.

जोपर्यंत पिटलाईनची सुविधा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत जालन्यातून नवीन गाड्या सोडणे शक्य नव्हते. पिटलाईनमुळे जालना येथून नवीन गाड्या सोडता येणार आहेत. जालन्यात कामाला येणाऱ्या बिहार, उत्तर प्रदेशातील कामगारांसाठी सुरू झालेली छपरा गाडी महत्त्वाची ठरणार आहे. तिरूपती, जनशताब्दी, वंदे भारतही जालन्यातून सुरू केली आहे. मनमाड, नांदेड येथून गाड्या मेन्टेनन्ससाठी येणार आहेत. त्यामुळे रोजगारही उपलब्ध होणार आहे. जालन्यासोबतच छत्रपती संभाजीनगर येथेही पिटलाईन झाल्याचेही दानवे यांनी सांगितले. संजय देठे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पदाधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती.

मैलाचा दगड रोवला गेला : चव्हाणजिल्ह्याच्या इतिहासात आज एक मैलाचा दगड रोवला गेला आहे. रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून अनेक रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. पिटलाईन महत्त्वाची ठरणार आहे. सात-आठ वर्षाच्या कालखंडात जिल्ह्याचा गतीने विकास झाला आहे. यापुढेही जिल्ह्याच्या विकासाचा आलेख वाढतच राहील, असा विश्वास माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालनाrailwayरेल्वे