शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाच्या लढाईत माणुसकीचा धर्म जपण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:55 IST

महाराजा अग्रसेन यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान अचरणात आणावेत. जगा आणि जगू द्या, हे त्यांचे ब्रीद प्रत्येक अग्रवाल कुटुंबाने प्राणपणाने जपले पाहिजे, असे मार्गदर्शन राष्ट्रसंत सुधांशू महाराज यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जीवन जगताना अनेक गोष्टी मिळविण्यासाठी प्रत्येकाला लढाई करावी लागते. परंतु, ही लढाई करीत असताना माणुसकी ही जपलीच गेली पाहिजे. महाराजा अग्रसेन यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान अचरणात आणावेत. जगा आणि जगू द्या, हे त्यांचे ब्रीद प्रत्येक अग्रवाल कुटुंबाने प्राणपणाने जपले पाहिजे, असे मार्गदर्शन राष्ट्रसंत सुधांशू महाराज यांनी केले.जालना येथे आयोजित अग्रवाल संमेलनाचा रविवारी थाटात समारोप झाला. समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या ओघावत्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी अनेक पौराणिक उदाहरणे देऊन विश्लेषण केले. आयुष्यात कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी त्याग, समर्पण आणि परिश्रम हे करावेच लागतात. या तिन्हींचा संगम झाल्यानंतर जे यश मिळते, ते चिरकाळ टिकणारे असते. अग्रवाल समाजाने नेहमीच देण्याचे काम केले आहे. परोपकार हा या समाजाचा विशेष गुण आहे. महाराजा अग्रसेन यांनी समाजाचा भक्कम पाया रचून एक मानवी तत्त्वज्ञान दिले आहे. पोट आणि पेटी भरणे याला जीवन म्हणत नाहीत. जगताना असे जगा की ज्यातून स्वत: आनंद उपभोगताना तो दुसऱ्यालाही मिळाला पाहिजे, याचा विचार करा. चांगले कर्म आणि किर्ती ही तुम्हाला तुमच्या मृत्यूपश्चातही जीवंत ठेवणार आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या अग्रवाल समाजातील मान्यवरांचा राष्ट्रसंत सुधांशुजी महाराज, शांतीलाल मुथा व इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यामध्ये रमाकांत खेतान (जीवन गौरव), अग्रश्री पुरस्कार डॉ. सुशील भारुका (जालना), रतनलाल गोयल (पुणे), कमलकिशोर झुनझुनवाला (जालना), पवनकुमार मित्तल (जळगाव), सागर रामेश्वर मोदी (खामगाव), श्रीनिवास अग्रवाल (इचलकरंजी), दीपक अग्रवाल (अमरावती), डॉ. जगदीश गिंदोडीया (धुळे) यांना सन्मानित करण्यात आले.अधिवेशनात घेण्यात आले चार ठरावया अधिवेशनात एकूण चार ठराव घेण्यात आले. यामध्ये अग्रवाल तरूणांसाठी, बेरोजगारांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना प्लेसमेंट देणे, समाजातील तरुणांना अध्यात्माशी जोडून संस्कारक्षम करणे ही काळाची गरज बनली आहे. कोणत्याही शहरात वृद्धाश्रम उघडले जाऊ नयेत, आई-वडील आणि आजी-आजोबा हा त्यांच्या कुटुंबातील महत्त्वाचा भाग आहे.हा संस्कार तरुण पिढीला देण्यात यावा, या अधिवेशनाचा तिसरा उद्देश म्हणजे मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना दत्तक घेऊन काही शेतकरी कुटुंबांच्या मुलांना सर्वतोपरी सहकार्य करणार, पर्यावरणाकडे लक्ष देऊन प्रदूषण रोखण्यावर भर देणार, प्रत्येक अग्रवाल कुटुंबाने किमान एक रोप लावावा आणि प्रयत्न करावेत. अशाप्रकारे राष्ट्रीय स्तरावरील ठराव घेण्यात आले.

टॅग्स :communityसमाजSocialसामाजिकFamilyपरिवारReligious programmeधार्मिक कार्यक्रम