शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

जीवनाच्या लढाईत माणुसकीचा धर्म जपण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:55 IST

महाराजा अग्रसेन यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान अचरणात आणावेत. जगा आणि जगू द्या, हे त्यांचे ब्रीद प्रत्येक अग्रवाल कुटुंबाने प्राणपणाने जपले पाहिजे, असे मार्गदर्शन राष्ट्रसंत सुधांशू महाराज यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जीवन जगताना अनेक गोष्टी मिळविण्यासाठी प्रत्येकाला लढाई करावी लागते. परंतु, ही लढाई करीत असताना माणुसकी ही जपलीच गेली पाहिजे. महाराजा अग्रसेन यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान अचरणात आणावेत. जगा आणि जगू द्या, हे त्यांचे ब्रीद प्रत्येक अग्रवाल कुटुंबाने प्राणपणाने जपले पाहिजे, असे मार्गदर्शन राष्ट्रसंत सुधांशू महाराज यांनी केले.जालना येथे आयोजित अग्रवाल संमेलनाचा रविवारी थाटात समारोप झाला. समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या ओघावत्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी अनेक पौराणिक उदाहरणे देऊन विश्लेषण केले. आयुष्यात कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी त्याग, समर्पण आणि परिश्रम हे करावेच लागतात. या तिन्हींचा संगम झाल्यानंतर जे यश मिळते, ते चिरकाळ टिकणारे असते. अग्रवाल समाजाने नेहमीच देण्याचे काम केले आहे. परोपकार हा या समाजाचा विशेष गुण आहे. महाराजा अग्रसेन यांनी समाजाचा भक्कम पाया रचून एक मानवी तत्त्वज्ञान दिले आहे. पोट आणि पेटी भरणे याला जीवन म्हणत नाहीत. जगताना असे जगा की ज्यातून स्वत: आनंद उपभोगताना तो दुसऱ्यालाही मिळाला पाहिजे, याचा विचार करा. चांगले कर्म आणि किर्ती ही तुम्हाला तुमच्या मृत्यूपश्चातही जीवंत ठेवणार आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या अग्रवाल समाजातील मान्यवरांचा राष्ट्रसंत सुधांशुजी महाराज, शांतीलाल मुथा व इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यामध्ये रमाकांत खेतान (जीवन गौरव), अग्रश्री पुरस्कार डॉ. सुशील भारुका (जालना), रतनलाल गोयल (पुणे), कमलकिशोर झुनझुनवाला (जालना), पवनकुमार मित्तल (जळगाव), सागर रामेश्वर मोदी (खामगाव), श्रीनिवास अग्रवाल (इचलकरंजी), दीपक अग्रवाल (अमरावती), डॉ. जगदीश गिंदोडीया (धुळे) यांना सन्मानित करण्यात आले.अधिवेशनात घेण्यात आले चार ठरावया अधिवेशनात एकूण चार ठराव घेण्यात आले. यामध्ये अग्रवाल तरूणांसाठी, बेरोजगारांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना प्लेसमेंट देणे, समाजातील तरुणांना अध्यात्माशी जोडून संस्कारक्षम करणे ही काळाची गरज बनली आहे. कोणत्याही शहरात वृद्धाश्रम उघडले जाऊ नयेत, आई-वडील आणि आजी-आजोबा हा त्यांच्या कुटुंबातील महत्त्वाचा भाग आहे.हा संस्कार तरुण पिढीला देण्यात यावा, या अधिवेशनाचा तिसरा उद्देश म्हणजे मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना दत्तक घेऊन काही शेतकरी कुटुंबांच्या मुलांना सर्वतोपरी सहकार्य करणार, पर्यावरणाकडे लक्ष देऊन प्रदूषण रोखण्यावर भर देणार, प्रत्येक अग्रवाल कुटुंबाने किमान एक रोप लावावा आणि प्रयत्न करावेत. अशाप्रकारे राष्ट्रीय स्तरावरील ठराव घेण्यात आले.

टॅग्स :communityसमाजSocialसामाजिकFamilyपरिवारReligious programmeधार्मिक कार्यक्रम