शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

पाणी न सोडण्यासाठी जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:08 IST

मंठा, परतूर, सेलू या तिन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून १५ मे पासून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु हे पाणी सोडू नये म्हणून शुक्रवारी चार युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : मंठा, परतूर, सेलू या तिन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून १५ मे पासून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु हे पाणी सोडू नये म्हणून शुक्रवारी चार युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.निम्न दुधना प्रकल्पात सध्या मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातून जर नदीपात्रातून परभणी जिल्ह्यात पाणी सोडल्यास त्याचा मोठा अपव्यय होणार आहे. तो थांबविण्यासाठी हे जलसमाधीचे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.पाणी सोडू नये म्हणून मंठा - परतूर तालुका पुनर्वसन समिती तसेच जि. प. सदस्य पंजाब बोराडे यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी सोडल्यास जलसमाधी घेऊ, असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर ९ मे रोजी काँग्रेस- राष्ट्रवादीने आंदोलन छेडले होते.या पेटलेल्या पाणीप्रश्नावर शुक्रवारी प्रशासनाची भंबेरी उडाली. आंदोलनातील जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव बोराडे, राजेश मोरे, विष्णू कवळे, संतोष कवळे, राजेभाऊ खराबे हे जलसमाधी घेण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्यात उतरले असता एकच खळबळ उडाली होती.यावेळी सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भुजंग गोरे, सभापती संदीप गोरे, नगराध्यक्ष विनोद बोराडे, गणेश खवणे भारत बोराडे, नागेश घारे, नाथा काकडे, गुलाब लाटे यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.दरम्यान पालकमंत्री बबन लोणीकर यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.या प्रकरणी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी लक्ष घालून आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.आणि पाणी सोडण्याची अफवा असल्याचे सांगितल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :WaterपाणीriverनदीagitationआंदोलनDamधरण