शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
2
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
3
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
4
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
5
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
6
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
7
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
8
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
9
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
10
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
11
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
12
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
13
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
14
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
15
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
16
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
17
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
18
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
19
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
20
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
Daily Top 2Weekly Top 5

पाणी न सोडण्यासाठी जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:08 IST

मंठा, परतूर, सेलू या तिन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून १५ मे पासून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु हे पाणी सोडू नये म्हणून शुक्रवारी चार युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : मंठा, परतूर, सेलू या तिन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून १५ मे पासून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु हे पाणी सोडू नये म्हणून शुक्रवारी चार युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.निम्न दुधना प्रकल्पात सध्या मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातून जर नदीपात्रातून परभणी जिल्ह्यात पाणी सोडल्यास त्याचा मोठा अपव्यय होणार आहे. तो थांबविण्यासाठी हे जलसमाधीचे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.पाणी सोडू नये म्हणून मंठा - परतूर तालुका पुनर्वसन समिती तसेच जि. प. सदस्य पंजाब बोराडे यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी सोडल्यास जलसमाधी घेऊ, असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर ९ मे रोजी काँग्रेस- राष्ट्रवादीने आंदोलन छेडले होते.या पेटलेल्या पाणीप्रश्नावर शुक्रवारी प्रशासनाची भंबेरी उडाली. आंदोलनातील जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव बोराडे, राजेश मोरे, विष्णू कवळे, संतोष कवळे, राजेभाऊ खराबे हे जलसमाधी घेण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्यात उतरले असता एकच खळबळ उडाली होती.यावेळी सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भुजंग गोरे, सभापती संदीप गोरे, नगराध्यक्ष विनोद बोराडे, गणेश खवणे भारत बोराडे, नागेश घारे, नाथा काकडे, गुलाब लाटे यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.दरम्यान पालकमंत्री बबन लोणीकर यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.या प्रकरणी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी लक्ष घालून आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.आणि पाणी सोडण्याची अफवा असल्याचे सांगितल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :WaterपाणीriverनदीagitationआंदोलनDamधरण