शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

पाणी न सोडण्यासाठी जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:08 IST

मंठा, परतूर, सेलू या तिन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून १५ मे पासून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु हे पाणी सोडू नये म्हणून शुक्रवारी चार युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : मंठा, परतूर, सेलू या तिन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून १५ मे पासून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु हे पाणी सोडू नये म्हणून शुक्रवारी चार युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.निम्न दुधना प्रकल्पात सध्या मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातून जर नदीपात्रातून परभणी जिल्ह्यात पाणी सोडल्यास त्याचा मोठा अपव्यय होणार आहे. तो थांबविण्यासाठी हे जलसमाधीचे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.पाणी सोडू नये म्हणून मंठा - परतूर तालुका पुनर्वसन समिती तसेच जि. प. सदस्य पंजाब बोराडे यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी सोडल्यास जलसमाधी घेऊ, असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर ९ मे रोजी काँग्रेस- राष्ट्रवादीने आंदोलन छेडले होते.या पेटलेल्या पाणीप्रश्नावर शुक्रवारी प्रशासनाची भंबेरी उडाली. आंदोलनातील जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव बोराडे, राजेश मोरे, विष्णू कवळे, संतोष कवळे, राजेभाऊ खराबे हे जलसमाधी घेण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्यात उतरले असता एकच खळबळ उडाली होती.यावेळी सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भुजंग गोरे, सभापती संदीप गोरे, नगराध्यक्ष विनोद बोराडे, गणेश खवणे भारत बोराडे, नागेश घारे, नाथा काकडे, गुलाब लाटे यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.दरम्यान पालकमंत्री बबन लोणीकर यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.या प्रकरणी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी लक्ष घालून आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.आणि पाणी सोडण्याची अफवा असल्याचे सांगितल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :WaterपाणीriverनदीagitationआंदोलनDamधरण