शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

चारा छावण्या उभारण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:28 IST

प्रशासनाकडून दुष्काळग्रस्तासाठी काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप करत सोमवारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह धरणे आंदोलन करुन शासनाचा निषेध केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन तीन महिने झाले आहेत. असे असतानाही प्रशासनाकडून दुष्काळग्रस्तासाठी काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप करत सोमवारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह धरणे आंदोलन करुन शासनाचा निषेध केला.जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने प्रशासनाकडून अहवाल मागवून जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याचे सांगून प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना करण्यास कानाडोळा केला जातो. आता निवडणूक होऊन आठवडा झाला आहे. असे असताना प्रशासनाकडून जनावरांचा चारा, टँकरची व्यवस्था अद्यापही केलेली नाही. ग्रामसेवक, मंडळअधिकारी मुख्यालयी थांबतच नसल्याने कोणाकडे दाद मागावी, अशी स्थिती जिल्ह्यात झाली आहे. प्रशासनाला निवेदन देऊनही या गंभीर बाबीकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने संतप्त शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रखरखत्या उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालसमोर जनावरासह आंदोलन केले. जिल्ह्यात मागणी तेथे चारा छावण्या सुरु करण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली. निवेदनावर आप्पासाहेब कदम, दत्तात्रय कदम, शिवाजी लकडे, डॉ. भागवत काळे, अशोक आटोळे, कृष्णा पिसोरे, शिवाजी तुपे, अंकुश लकडे, मनोहर गात आदींच्या स्वाक्ष-या आहेत.सोलापूर जिल्ह्यात जालना जिल्ह्यासारखी दुष्काळी परिस्थिती नसताना येथील जिल्हाधिका-यांनी अधिकारी कर्मचा-यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश दिले आहेत. दिरंगाई केल्यास कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. जालना जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीने जनता होरपळत असताना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी याकडे लक्ष देऊन तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकाºयांसह अन्य कर्मचा-यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीagitationआंदोलन