शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वास्तविकतेसाठी चिकित्सा महत्त्वाची - आ.ह. साळुंके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कुठल्याही सांगीव अथवा सिद्ध न होणाऱ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता जो पर्यंत चिकित्सक पध्दतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कुठल्याही सांगीव अथवा सिद्ध न होणाऱ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता जो पर्यंत चिकित्सक पध्दतीने स्वत: अनुभव घेत नाही, तो पर्यत ती गोष्ट सत्य आहे, असे मानू नये असे हजारो वर्षापूर्वी भगवान गौतम बुध्दांनी सांगितले आहे. विज्ञानही तेच सांगते, असे प्रतिपादन प्रसिध्द विचारवंत तथा साहित्यिक डॉ. आ.ह. साळुंके यांनी केले. गुरुवारी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गौरव सोहळ्याला उत्तर देताना केले.जालना येथील आ.ह. साळुंके अमृत महोत्सवी सत्कार समितीकडून या सोहळ्याचे आयोजन मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. शंकरराव राख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद येथील प्रा. अर्जुन जाधव यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ. साळुंके म्हणाले की, जालन्याचा आणि माझा संबंध हा फार जुना आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त मी जालन्यात आलो असल्याचे ते म्हणाले. भारतीय संस्कृती, तसेच त्यातील विविधता, विविध धर्म, जातींच्या परंपरा या दोष नसून, ते एक वैभव आहे. त्यामुळेच आपण एकसंघ आहोत. या वेगवेगळ्या परंपरा म्हणजे निसर्गातील विविध रंगांची फुले असल्याचे सांगून त्यांनी याचे महत्त्व विशद केले.भगवान गौतम बुध्द, रवींद्रनाथ टोगोर, चार्वाक, महात्मा बसवेश्वर तसेच संत तुकाराम महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींच्या प्रेरणेतून गुलामगिरीला नख लावण्याचे काम झाले आहे. संत तुकारामांनी जो विद्रोह केला, त्याचा प्रचार केला जात नसून, त्यांचे चमत्कार सांगितले जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.प्रतिकूल परिस्थितीत हताश न होता, त्याकडे एक संधी म्हणून पाहण्याची गरज त्यांनी सांगितली. चिकित्सेला महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले.वेगवेगळे मतप्रवाह : वाद गुण्या-गोविंदानेच सुटू शकतातदेशात आज अनेक मुद्यांवरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत. संवाद दुरावत चालला असून, जाती-धर्माच्या नावावर विभागणी होत आहे. या बद्दल आपण १९९० मध्ये एका पुस्तकातून प्रकाश टाकला होता. आज हिंदू आणि मुस्लिमांचे जे वाद आहेत, ते गुण्या गोविंदाने एकत्रित बसूनच सुटू शकतात.कोणीच कोणाला हाकलून देऊन अथवा संहार करून हा प्रश्न न मिटणारा आहे. हल्ली संवादांपेक्षा व्देषाचे राजकारण सुरू असल्याने चिंतेत वाढच होत आहे. हे कुठे तरी थांबवण्यासाठी सर्वंनी एकत्र येऊन विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. धर्म आणि जातीच्या नावावरील तेढ न शोभणारी आहे.तरूण पिढी भरकटलेली नाहीआजची तरूण पिढी भरकटलेली आहे, असा जो समज पसरवण्यात येत आहे, ते आपल्याला मान्य नाही. आज अनेक युवक-युवती हे चांगले काम करून सत्य आणि वास्तवाची कास धरताना दिसतात. चळवळींच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या चालीरीतींवर आसूड ओढताना दिसत आहेत. त्यामुळे तरुणांना दिशा देण्यासाठी ज्येष्ठांनी पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक