शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

वास्तविकतेसाठी चिकित्सा महत्त्वाची - आ.ह. साळुंके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कुठल्याही सांगीव अथवा सिद्ध न होणाऱ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता जो पर्यंत चिकित्सक पध्दतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कुठल्याही सांगीव अथवा सिद्ध न होणाऱ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता जो पर्यंत चिकित्सक पध्दतीने स्वत: अनुभव घेत नाही, तो पर्यत ती गोष्ट सत्य आहे, असे मानू नये असे हजारो वर्षापूर्वी भगवान गौतम बुध्दांनी सांगितले आहे. विज्ञानही तेच सांगते, असे प्रतिपादन प्रसिध्द विचारवंत तथा साहित्यिक डॉ. आ.ह. साळुंके यांनी केले. गुरुवारी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गौरव सोहळ्याला उत्तर देताना केले.जालना येथील आ.ह. साळुंके अमृत महोत्सवी सत्कार समितीकडून या सोहळ्याचे आयोजन मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. शंकरराव राख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद येथील प्रा. अर्जुन जाधव यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ. साळुंके म्हणाले की, जालन्याचा आणि माझा संबंध हा फार जुना आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त मी जालन्यात आलो असल्याचे ते म्हणाले. भारतीय संस्कृती, तसेच त्यातील विविधता, विविध धर्म, जातींच्या परंपरा या दोष नसून, ते एक वैभव आहे. त्यामुळेच आपण एकसंघ आहोत. या वेगवेगळ्या परंपरा म्हणजे निसर्गातील विविध रंगांची फुले असल्याचे सांगून त्यांनी याचे महत्त्व विशद केले.भगवान गौतम बुध्द, रवींद्रनाथ टोगोर, चार्वाक, महात्मा बसवेश्वर तसेच संत तुकाराम महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींच्या प्रेरणेतून गुलामगिरीला नख लावण्याचे काम झाले आहे. संत तुकारामांनी जो विद्रोह केला, त्याचा प्रचार केला जात नसून, त्यांचे चमत्कार सांगितले जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.प्रतिकूल परिस्थितीत हताश न होता, त्याकडे एक संधी म्हणून पाहण्याची गरज त्यांनी सांगितली. चिकित्सेला महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले.वेगवेगळे मतप्रवाह : वाद गुण्या-गोविंदानेच सुटू शकतातदेशात आज अनेक मुद्यांवरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत. संवाद दुरावत चालला असून, जाती-धर्माच्या नावावर विभागणी होत आहे. या बद्दल आपण १९९० मध्ये एका पुस्तकातून प्रकाश टाकला होता. आज हिंदू आणि मुस्लिमांचे जे वाद आहेत, ते गुण्या गोविंदाने एकत्रित बसूनच सुटू शकतात.कोणीच कोणाला हाकलून देऊन अथवा संहार करून हा प्रश्न न मिटणारा आहे. हल्ली संवादांपेक्षा व्देषाचे राजकारण सुरू असल्याने चिंतेत वाढच होत आहे. हे कुठे तरी थांबवण्यासाठी सर्वंनी एकत्र येऊन विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. धर्म आणि जातीच्या नावावरील तेढ न शोभणारी आहे.तरूण पिढी भरकटलेली नाहीआजची तरूण पिढी भरकटलेली आहे, असा जो समज पसरवण्यात येत आहे, ते आपल्याला मान्य नाही. आज अनेक युवक-युवती हे चांगले काम करून सत्य आणि वास्तवाची कास धरताना दिसतात. चळवळींच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या चालीरीतींवर आसूड ओढताना दिसत आहेत. त्यामुळे तरुणांना दिशा देण्यासाठी ज्येष्ठांनी पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक