शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

महामार्गावर बस-दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:41 IST

भरधाव खासगी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : भरधाव खासगी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर घडली. अपघातातील मयत हे औरंगाबाद जिल्ह्यातील शेकटा येथील रहिवासी आहेत.हमीदखॉ नुरखॉ पठाण (५०) व त्यांची पत्नी ताहेराबी हमीद खॉ पठाण (३९) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. औरंगाबाद तालुक्यातील शेकटा येथील हमीदखाँ पठाण हे त्यांच्या पत्नीसमवेत रविवारी सकाळी दुचाकीवरून (क्र.एम.एच.२०- एफ.एन.६८३४) शेकटा येथून बदनापूरकडे जात होते. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर भरधाव खासगी बसने (क्र.जी.एस.०१-सी.आर.६६६६) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील हमीदखाँ नूरखाँ पठाण व त्यांची पत्नी ताहेराबी हमीद खाँ पठाण यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच सपोनि राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ग्रामीण रूग्णालयात पाठविले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी शेख शमशोद्दीन शेख लालमियाँ (रा. शेवगा ता.जि. औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बसच्या चालकाविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास भिंगाळे हे करीत आहेत. पठाण दाम्पत्याच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.दुचाकीसाठी वेगळा मार्गच नाहीजालना-औरंगाबाद महामार्ग बनविताना दुचाकीचा विचार करण्यात आलेला नाही. या महामार्गावर वाहनांची वर्दळ अधिक असून, दुचाकीस्वारांचीही संख्या अधिक आहे. परिणामी झालेल्या अपघातात अनेक दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक