शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही अन् पेलणार नाही- मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: October 22, 2023 15:46 IST

प्रत्येक सर्कलमध्ये अगोदर साखळी नंतर आमरण उपोषण

अंतरवाली सराटी (जि.जालना) : शासनाने घेतलेल्या मुदतीत मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी आरक्षण द्यावे. अन्यथा २५ तारखेनंतर सुरू होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही आणि २८ ऑक्टोबरपासूनचे आंदोलन सरकारला पेलणार नाही, असा इशारा अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. शांततेचे युद्ध काय असते हे सरकारला आणि देशाला दाखवून देवू असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी शासनाला दिलेली मुदत संपली आहे. या पार्श्वभूमीवर मुदतीत आरक्षण जाहीर झाले नाही तर पुढील आंदोलनाची दिशा काय असेल याची माहिती देण्यासाठी रविवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे बोलत होते. सरकारने घेतलेल्या मुदतीत महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण जाहीर केले नाही तर २५ तारखेपासून आपण अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहोत. या कालावधीत उपचारही घेतले जाणार नाहीत. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कायद्याच्या पदावर बसलेल्या कोणत्याही राजकीय नेत्याला आमच्या गावात येवू दिले जाणार नाही. आरक्षण घेवून आले तरच गावाची शिव ओलांडू देणार आहोत.

२५ तारखेपासून महाराष्ट्रातील प्रत्येक सर्कलमधील मोठ्या गावात साखळी उपोषण सुरू होणार आहेत. २८ पासून त्याच साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार आहे. याची सर्कलनिहाय तयारी केलेली आहे. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात एकत्र येवून सरकार जागे करण्यासाठी कॅन्डल मार्च काढावा. ही दिशा आणि हे शांततेचे आंदोलन सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील हे शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही आणि दुसऱ्या टप्प्यातील आरक्षणाची दिशा २५ ऑक्टोबरला जाहीर करणार आहोत. ती दिशा सरकारला पेलणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला. महाराष्ट्रातील पाच कोटी मराठे हे आंदोलन चालविणार आहेत. त्यामुळे शासनाने २४ ऑक्टोबरच्या आत निर्णय घ्यावा, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.

उग्र आंदोलन करू नका, आत्महत्या करू नका

मराठा आरक्षणाचा मुद्दा शांततेच्या आंदोलनाने पुढे आला आहे आणि त्याच मार्गाने आपल्याला आरक्षण मिळवायचे आहे. त्यामुळे कोणीही उग्र आंदोलन करू नये.आपले त्याला समर्थन नाही. कोणीही आत्महत्या करू नये. त्याऐवजी माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही आंदोलनात सहभागी व्हावा, समाजाला न्याय द्याचा आहे. तुमच्या पाठबळाशिवाय, साथीशिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नाही, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाagitationआंदोलनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार