शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही अन् पेलणार नाही- मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: October 22, 2023 15:46 IST

प्रत्येक सर्कलमध्ये अगोदर साखळी नंतर आमरण उपोषण

अंतरवाली सराटी (जि.जालना) : शासनाने घेतलेल्या मुदतीत मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी आरक्षण द्यावे. अन्यथा २५ तारखेनंतर सुरू होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही आणि २८ ऑक्टोबरपासूनचे आंदोलन सरकारला पेलणार नाही, असा इशारा अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. शांततेचे युद्ध काय असते हे सरकारला आणि देशाला दाखवून देवू असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी शासनाला दिलेली मुदत संपली आहे. या पार्श्वभूमीवर मुदतीत आरक्षण जाहीर झाले नाही तर पुढील आंदोलनाची दिशा काय असेल याची माहिती देण्यासाठी रविवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे बोलत होते. सरकारने घेतलेल्या मुदतीत महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण जाहीर केले नाही तर २५ तारखेपासून आपण अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहोत. या कालावधीत उपचारही घेतले जाणार नाहीत. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कायद्याच्या पदावर बसलेल्या कोणत्याही राजकीय नेत्याला आमच्या गावात येवू दिले जाणार नाही. आरक्षण घेवून आले तरच गावाची शिव ओलांडू देणार आहोत.

२५ तारखेपासून महाराष्ट्रातील प्रत्येक सर्कलमधील मोठ्या गावात साखळी उपोषण सुरू होणार आहेत. २८ पासून त्याच साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार आहे. याची सर्कलनिहाय तयारी केलेली आहे. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात एकत्र येवून सरकार जागे करण्यासाठी कॅन्डल मार्च काढावा. ही दिशा आणि हे शांततेचे आंदोलन सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील हे शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही आणि दुसऱ्या टप्प्यातील आरक्षणाची दिशा २५ ऑक्टोबरला जाहीर करणार आहोत. ती दिशा सरकारला पेलणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला. महाराष्ट्रातील पाच कोटी मराठे हे आंदोलन चालविणार आहेत. त्यामुळे शासनाने २४ ऑक्टोबरच्या आत निर्णय घ्यावा, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.

उग्र आंदोलन करू नका, आत्महत्या करू नका

मराठा आरक्षणाचा मुद्दा शांततेच्या आंदोलनाने पुढे आला आहे आणि त्याच मार्गाने आपल्याला आरक्षण मिळवायचे आहे. त्यामुळे कोणीही उग्र आंदोलन करू नये.आपले त्याला समर्थन नाही. कोणीही आत्महत्या करू नये. त्याऐवजी माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही आंदोलनात सहभागी व्हावा, समाजाला न्याय द्याचा आहे. तुमच्या पाठबळाशिवाय, साथीशिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नाही, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाagitationआंदोलनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार