शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही अन् पेलणार नाही- मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: October 22, 2023 15:46 IST

प्रत्येक सर्कलमध्ये अगोदर साखळी नंतर आमरण उपोषण

अंतरवाली सराटी (जि.जालना) : शासनाने घेतलेल्या मुदतीत मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी आरक्षण द्यावे. अन्यथा २५ तारखेनंतर सुरू होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही आणि २८ ऑक्टोबरपासूनचे आंदोलन सरकारला पेलणार नाही, असा इशारा अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. शांततेचे युद्ध काय असते हे सरकारला आणि देशाला दाखवून देवू असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी शासनाला दिलेली मुदत संपली आहे. या पार्श्वभूमीवर मुदतीत आरक्षण जाहीर झाले नाही तर पुढील आंदोलनाची दिशा काय असेल याची माहिती देण्यासाठी रविवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे बोलत होते. सरकारने घेतलेल्या मुदतीत महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण जाहीर केले नाही तर २५ तारखेपासून आपण अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहोत. या कालावधीत उपचारही घेतले जाणार नाहीत. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कायद्याच्या पदावर बसलेल्या कोणत्याही राजकीय नेत्याला आमच्या गावात येवू दिले जाणार नाही. आरक्षण घेवून आले तरच गावाची शिव ओलांडू देणार आहोत.

२५ तारखेपासून महाराष्ट्रातील प्रत्येक सर्कलमधील मोठ्या गावात साखळी उपोषण सुरू होणार आहेत. २८ पासून त्याच साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार आहे. याची सर्कलनिहाय तयारी केलेली आहे. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात एकत्र येवून सरकार जागे करण्यासाठी कॅन्डल मार्च काढावा. ही दिशा आणि हे शांततेचे आंदोलन सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील हे शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही आणि दुसऱ्या टप्प्यातील आरक्षणाची दिशा २५ ऑक्टोबरला जाहीर करणार आहोत. ती दिशा सरकारला पेलणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला. महाराष्ट्रातील पाच कोटी मराठे हे आंदोलन चालविणार आहेत. त्यामुळे शासनाने २४ ऑक्टोबरच्या आत निर्णय घ्यावा, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.

उग्र आंदोलन करू नका, आत्महत्या करू नका

मराठा आरक्षणाचा मुद्दा शांततेच्या आंदोलनाने पुढे आला आहे आणि त्याच मार्गाने आपल्याला आरक्षण मिळवायचे आहे. त्यामुळे कोणीही उग्र आंदोलन करू नये.आपले त्याला समर्थन नाही. कोणीही आत्महत्या करू नये. त्याऐवजी माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही आंदोलनात सहभागी व्हावा, समाजाला न्याय द्याचा आहे. तुमच्या पाठबळाशिवाय, साथीशिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नाही, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाagitationआंदोलनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार