शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

जालन्यातील कुपोषण रिहॅबिलिटेशन सेंटरचा राज्यात टॉप टेनमध्ये समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 1:16 AM

जालन्यातील कुपोषण निर्मूलनासाठी येथील शासकीय रुग्णालयात २०१५ मध्ये सुरू केलेले एनआरसी सेंटर अर्थात न्यूट्रीशियन रिहॅबिलिटेशन सेंटरने राज्यात अव्वल भरारी घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील कुपोषण निर्मूलनासाठी येथील शासकीय रुग्णालयात २०१५ मध्ये सुरू केलेले एनआरसी सेंटर अर्थात न्यूट्रीशियन रिहॅबिलिटेशन सेंटरने राज्यात अव्वल भरारी घेतली आहे. राज्यातील पहिल्या दहा केंद्रांमध्ये जालन्यातील या केंद्राचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर आणि त्या केंद्रातील आहारतज्ज्ञ तसे परि चारिकांचे परिश्रम यामुळेच हे शक्य झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.जालना जिल्हा हा शिक्षणा सोबतच आरोग्याबाबतही दुर्लक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे कुपोषणाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. ज्या कुपोषित बालकांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या तर त्यांचे पुढचे जगणे सुकर होईल असे अति कुपोषित मुला-मुलींचा शोध अंगणवाडी ताईकडून घेतला जातो.ज्यांचे वजन हे अत्यंत कमी असेल आणि त्यांच्या दंडाचा घेर हा ११.५ सेमी. पेक्षा कमी असेल, अशांना लगेचच जालन्यातील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले जाते. येथे अशा मुलांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष येथे २१०५ मध्ये सुरू झाला आहे. आता पर्यंत या चार वर्षात साधारपणे अतिकुपोषित जवळपास ५०० पेक्षा अधिक मुलांवर येथे यशस्वी उपचार करून त्यांना ठणठणीत करण्यात आल्याची माहिती या केंद्राचे बालरोगतज्ज्ञ सुरजित अंभुरे आणि डॉ. भारती आंधळे यांनी दिली.जालन्यातील या केंद्रात जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील कुपोषित बालकांवर उपचार केले जातात. या केंद्रात बालाकांसोबतच त्यांच्या आईला पोषण आहार देण्यात येतो. साधारणपणे किमान १५ दिवस या मुलांना त्यांच्या आईसह आरोग्यदायी आणि विविध जीवनसत्व असलेल्या आहाराचा पुरवठा करून मुलांचे वजन वाढवण्याचे प्रयत्न केले जातात. विशेष म्हणजे आईला शंभर रूपये रोज या प्रमाणे भत्ताही दिला जातो. कुपोषणाचे प्रमाण नेमके कशामुळे वाढते, या बद्दल डॉ. अंभुरे यांना विचारले असता, ज्यावेळी एखादी महिला ही गर्भवती असेल तर तिला दर्जेदार आहार मिळत नाही. तसेच घरातील गरिबी आणि रोजगाराच्या शोधात मुलांकडे होणारे दुर्लक्ष ही कारणे आहेत. तर काही मुलांमध्ये हा आजार अनुवंशिक असतो. तर काहींना अन्य आजारांमुळे वजन न वाढण्याची कारण असल्याचे डॉ. अंभुरे म्हणाले. देश आणि राज्य पातळीवर कुपोषण निर्मूलनासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे.त्यांचाच एक भाग म्हणून जालन्यात हे केंद्र सुरू केले आहे. अशा प्रकारची केंदे्र ही राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्याचा मोठा लाभ कुपोषित बालकांसाठी होत असल्याचा दावा डॉ. अंभुरे यांनी केला. या केंद्रात पी.जे भालतिलक, लता पोफळे, एस.व्ही. ढिल्पे, पूजा अग्रवाल, पुष्पा नरोडे या डॉक्टरांना मोठी मदत करतात.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नSocialसामाजिक