शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

लाखोंचा खर्च करून अल्प उत्पन्न; दोन एकरांमधील रेशीम शेतीवर संतप्त शेतकऱ्याने फरविला जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 17:43 IST

अंतरवाली सराटी शिवारातील गट क्रमांक १४० मध्ये २ एकर क्षेत्रावर मागील दोन वर्षांपूर्वी तुतीची लागवड केली होती.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे नुकसान शासन अनुदानही नाही 

वडीगोद्री : रेशीम कोषाचे घसरलेले दर, बाजारातील अनिश्चितता, या सोबतच रेशीम शेतीसाठी शासनाचे मिळणारे अनुदानही न मिळाल्याने अत्यंत कष्टाने पिकवलेले दोन एकरांतील तुतीचे पीकही जेसीबीने उपटून टाकण्याची वेळ वडीगोद्री (ता. अंबड) येथील चंद्रकांत खमीतकर यांच्यावर आली आहे.

वडीगोद्रीतील रेशीम उत्पादक शेतकरी चंद्रकांत खमीतकर यांनी अंतरवाली सराटी शिवारातील गट क्रमांक १४० मध्ये २ एकर क्षेत्रावर मागील दोन वर्षांपूर्वी तुतीची लागवड केली होती. शेड उभारणीसाठी त्यांना दोन लाख रुपये खर्च आला. शिवाय तुती लागवड, मेहनत, मशागत व मजुरीचा असा एकूण दीड लाख रुपये खर्च झाला. पहिल्या वर्षी झाडे लहान असल्याने जेमतेमच उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी तुतीचे झाडे जोमदार व बहारदार आली असताना खमीतकर यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या बहारदार पिकास कोरोनारूपी संकटाची दृष्ट लागली. यात चंद्रकांत खमीतकर यांच्या अपेक्षांचा चक्काचूर झाल्याने त्यांनी तुतीची झाडे मोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यापूवीर्ही गावातील मुकुंद सुरासे, जगन्नाथ सुरासे व संजय गावडे या शेतकऱ्याने तुतीची शेती मोडून टाकली आहे. मागील आठ महिन्यांपासून बाजारात रेशीम कोषाचे दर घसरले आहेत. मागील वर्षी ५५० रुपये किलो दराने विकला जाणारा रेशीम कोषाचे दर या हंगामात १६० रुपये किलो नीचांकी दराने विकला जात आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नाही. यातच मागील दोन वर्षांत शासनाचे एक रुपयाचे अनुदानही न मिळाल्याने शेतकऱ्यांना तुतीची झाडे मोडून टाकावी लागत आहेत.

लॉकडाऊनमुळे नुकसान कोरोनामुळे मध्यंतरी लागलेल्या टाळेबंदीमुळे रेशीम कोष मातीमोल किमतीत विक्री करावे लागले. कडक लॉकडाऊन काळात अंडीपुंज न मिळल्याने तीन महिने तुतीचा पाला कापून शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला. रेशीम उत्पादक चंद्रकांत खमीतकर यांना वेळेवर अंडी पुंज मिळाले असते तर किमान ३ ते ४ क्विंटल रेशीम कोषाचे उत्पादन त्यांना मिळाले असते; परंतु लॉकडाऊनमुळे ही अंडी पुंज त्यांना मिळाली नसल्याने त्यांचे सुमारे १ लाख २५ हजार ते २ लाखांचे नुकसान झाले होते.

शासन अनुदानही नाही मागील वर्षी दुष्काळात व आता अतिवृष्टीतही अत्यंत कष्टाने रेशीम शेती केली होती; परंतु आता रेशीम कोषाचे दर कमी झाल्याने रेशीम शेती परवडत नाही. तसेच अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शासनाचे आजवर एक रुपयाचेही अनुदान मिळाले नाही. यातच अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. यात बळीराजा भरडला जात आहे.- चंद्रकांत खमीतकर, रेशीम उत्पादक, वडीगोद्री

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीfundsनिधी