शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

लाखोंचा खर्च करून अल्प उत्पन्न; दोन एकरांमधील रेशीम शेतीवर संतप्त शेतकऱ्याने फरविला जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 17:43 IST

अंतरवाली सराटी शिवारातील गट क्रमांक १४० मध्ये २ एकर क्षेत्रावर मागील दोन वर्षांपूर्वी तुतीची लागवड केली होती.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे नुकसान शासन अनुदानही नाही 

वडीगोद्री : रेशीम कोषाचे घसरलेले दर, बाजारातील अनिश्चितता, या सोबतच रेशीम शेतीसाठी शासनाचे मिळणारे अनुदानही न मिळाल्याने अत्यंत कष्टाने पिकवलेले दोन एकरांतील तुतीचे पीकही जेसीबीने उपटून टाकण्याची वेळ वडीगोद्री (ता. अंबड) येथील चंद्रकांत खमीतकर यांच्यावर आली आहे.

वडीगोद्रीतील रेशीम उत्पादक शेतकरी चंद्रकांत खमीतकर यांनी अंतरवाली सराटी शिवारातील गट क्रमांक १४० मध्ये २ एकर क्षेत्रावर मागील दोन वर्षांपूर्वी तुतीची लागवड केली होती. शेड उभारणीसाठी त्यांना दोन लाख रुपये खर्च आला. शिवाय तुती लागवड, मेहनत, मशागत व मजुरीचा असा एकूण दीड लाख रुपये खर्च झाला. पहिल्या वर्षी झाडे लहान असल्याने जेमतेमच उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी तुतीचे झाडे जोमदार व बहारदार आली असताना खमीतकर यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या बहारदार पिकास कोरोनारूपी संकटाची दृष्ट लागली. यात चंद्रकांत खमीतकर यांच्या अपेक्षांचा चक्काचूर झाल्याने त्यांनी तुतीची झाडे मोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यापूवीर्ही गावातील मुकुंद सुरासे, जगन्नाथ सुरासे व संजय गावडे या शेतकऱ्याने तुतीची शेती मोडून टाकली आहे. मागील आठ महिन्यांपासून बाजारात रेशीम कोषाचे दर घसरले आहेत. मागील वर्षी ५५० रुपये किलो दराने विकला जाणारा रेशीम कोषाचे दर या हंगामात १६० रुपये किलो नीचांकी दराने विकला जात आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नाही. यातच मागील दोन वर्षांत शासनाचे एक रुपयाचे अनुदानही न मिळाल्याने शेतकऱ्यांना तुतीची झाडे मोडून टाकावी लागत आहेत.

लॉकडाऊनमुळे नुकसान कोरोनामुळे मध्यंतरी लागलेल्या टाळेबंदीमुळे रेशीम कोष मातीमोल किमतीत विक्री करावे लागले. कडक लॉकडाऊन काळात अंडीपुंज न मिळल्याने तीन महिने तुतीचा पाला कापून शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला. रेशीम उत्पादक चंद्रकांत खमीतकर यांना वेळेवर अंडी पुंज मिळाले असते तर किमान ३ ते ४ क्विंटल रेशीम कोषाचे उत्पादन त्यांना मिळाले असते; परंतु लॉकडाऊनमुळे ही अंडी पुंज त्यांना मिळाली नसल्याने त्यांचे सुमारे १ लाख २५ हजार ते २ लाखांचे नुकसान झाले होते.

शासन अनुदानही नाही मागील वर्षी दुष्काळात व आता अतिवृष्टीतही अत्यंत कष्टाने रेशीम शेती केली होती; परंतु आता रेशीम कोषाचे दर कमी झाल्याने रेशीम शेती परवडत नाही. तसेच अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शासनाचे आजवर एक रुपयाचेही अनुदान मिळाले नाही. यातच अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. यात बळीराजा भरडला जात आहे.- चंद्रकांत खमीतकर, रेशीम उत्पादक, वडीगोद्री

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीfundsनिधी