शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रेनकोट विसरला म्हणून शाळा दिली सोडून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:19 IST

रेनकोट सोबत नसल्याने आपण पावसात भिजू या भीतीपोटी मंठा तालुक्यातील कोकरंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने साडेतीन वाजताच शाळेला कुलूप लावून विद्यार्थ्यांना सोडून दिल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : रेनकोट सोबत नसल्याने आपण पावसात भिजू या भीतीपोटी मंठा तालुक्यातील कोकरंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने साडेतीन वाजताच शाळेला कुलूप लावून विद्यार्थ्यांना सोडून दिल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला.कोकरंबा येथे इयत्ता १ ते ५ वी पर्यंत वर्ग असून, ४१ विद्यार्थी आहेत. मुख्याध्यापक एन.व्ही. आघाव यांच्यासह दोन शिक्षकाची शाळेत नियुक्ती आहे. मुख्याध्यापक एन. व्ही आघाव हे बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथून अपडाऊन करतात.रजा न टाकताच शाळेत गैरहजर राहणे, शाळेच्या वेळेत न येणे इ. तक्रारींमुळे मुख्याध्यापकासह शिक्षक नेहमीच चर्चेत असतात. गुरूवारी दोन्ही शिक्षक तळणी येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. यामुळे मुख्याध्यापक आघाव हे एकटेच शाळेत होते. साडेतीन वाजेच्या सुमारास आभाळ दाटून आले आणि रिमझिम पाऊसही सुरु झाला. त्यामुळे लोणार येथे जाण्यास अडचण येईल. त्यातच रेनकोटही घरीच राहिल्याने मुख्याध्यापक आघाव यांनी चार वाजता सुटणारी शाळा साडेतीन वाजताच सोडून दिली.माझा रेनकोट घरी राहिल्याने पावसात घरी जाण्यास अडचण आली असती यामुळे विद्यार्थ्यांना सोडून दिले.- एन.व्ही. आघाव, मुख्याध्यापककारवाई करणारयापूर्वी सुध्दा मुख्याध्यापक एन. व्ही. आघाव हे रजा न टाकताच वैद्यकीय रजेवर गेले होते. याबाबत त्यांना नोटीस पाठविली होती. त्याचा खुलासा अद्यापही आलेला नाही. विद्यार्थ्यांना अर्धा तास आधीच शाळेतून सोडून देणे ही गंभीर बाब आहे. याची चौकशी करुन योग्य कारवाई करण्यात येईल. - एस. यू. वाघ, केंद्रप्रमुख, तळणी

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकEducationशिक्षणRainपाऊस