शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

जालना बाजारभाव समालोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:17 IST

संजय लव्हाडे जालना : जालना बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ नेहमीच्या तुलनेने कमी आहे. कृषी मंत्रालयांनी नाफेडला तुरीची सरकारी खरेदीला मान्यता ...

संजय लव्हाडे

जालना : जालना बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ नेहमीच्या तुलनेने कमी आहे. कृषी मंत्रालयांनी नाफेडला तुरीची सरकारी खरेदीला मान्यता दिल्याने तुरीत मंदी आली आहे. एकूणच, सर्व प्रकारच्या खाद्यतेलांमध्ये सटोरीयांची पकड मजबूत झाली आहे. खाद्यतेलांनी तेजीचा उच्चांक गाठला आहे. पाठोपाठ सोयाबीनच्या दरात तेजी कायम असून शेंगदानामध्ये तेजीचे सत्र सुरू असून, हरभऱ्याचे भाव मात्र हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. सर्व प्रकारचा डाळीमध्येदेखील मंदी आहे.

कृषी मंत्रालयाने नाफेडला तूर खरेदीला मान्यता दिल्याने, तुरीच्या भावात येणारी मंदी आता थांबली आहे. जालना बाजारपेठेत तुरीची दररोजची आवक सहा हजार पोती इतकी असून त्यात १५० रुपये क्विंटलमागे वाढ झाल्याने तुरीचे दर पाच हजार ८०० ते पाच हजार ४०० रुपयांवर पोहोचले आहेत.

सोयाबीनमध्येेही तेज कायम आहे. सोयाबीलना चीनमधून मोठी मागणी असल्याने हे दर वाढले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतातही तेल निर्मितीसह पशुखाद्यासाठी याची मोठी मागणी आहे. जालना बाजारपेठेत सोयाबीनची दररोजची आवक ही एक हजार पोती असल्याचे सांगण्यात आले. सोयाबीनचे दर चार हजार शंभर ते चार हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असे झाले आहेत.

सर्व प्रकारच्या खाद्यतेलांनी भावाचा उच्चांक गाठला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून खाद्यतेलांत सतत भाववाढ होत आहे. काय कारण आहेत, खाद्यतेलाचे एवढे दर वाढले असून, त्यावर सटोरीयांची पकड मजबूत असल्याने ही दरवाढ होत असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे. सोया तेलाच्या वाढलेल्या दरामागे पामतेलाचे कारण जास्त आहे.

विश्‍वात पामतेल उत्पादक देशाहून स्वस्त निर्यात करून खरेदीदार देश मोठा नफा कमावत असल्याचे दिसते. मलेशियात यावर्षी पामचे उत्पादन कमी झाल्याने पाममध्ये तेजी राहणार आहे. सध्या तेलाला मोठी मागणी नसतानाही तेलाचे एवढे दर वाढले आहेत. भारतात आयात शुल्क दहा टक्केने कमी करूनसुध्दा भावात काही फरक पडला नाही. कारण, निर्यात करणाऱ्या देशांनी निर्यात शुल्क वाढविला आहे. खाद्यतेलाच्या बाजारावर सटोरीयाची मोठी पकड आजही कायम आहे.

सर्व प्रकारच्या खाद्यतेलामध्ये ५०० पेक्षा अधिक रुपये हे प्रतिबॅरल वाढले आहे. भविष्यात आणखी तेजीची शक्यता वर्तविली जात आहे. सोयाबीन तेलाचे भाव १२ हजार २०० , सरकी तेल ११ हजार ७००, पामतेल ११ हजार ३०० रुपये असे आहेत. हरभऱ्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले असून, आणखी नवीन हरभरा बाजारात आलेला नाही. शेंगदाना तेलाच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ झाली आहे. शेंगदानाचे दर आजघडीला ८ हजार ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. जालन्यातील बाजारपेठेत गुळाची रोजची आवक वाढली असून, पुढील महिन्यात मकरसंक्रांत असल्यने गुळाला मोठी मागणी राहणार आहे. चांगला गूळ आणि तीळाचे दर हे आगामी काही दिवसांत वाढतील, अशी आशा आहे.