शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

जालन्याच्या औद्योगिक वसाहतीत पाणीबाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:50 PM

जालना येथील उद्योगांना पाण्याची तीव्र टंचाई जाणत असून, आज सर्वात जास्त पाणी हे येथील स्टील उद्योगांना लागते. मात्र पुरसे पाणी मिळत नसल्याने अनेक उद्योजकांवर विकतचे टँकर घेऊन उद्योग चालवण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देटँकरवरच भिस्त : पिण्यापुरतेही पाणी मिळेना, सर्वात मोठा फटका स्टील उद्योगाला, एमआयडीसीने लक्ष घालावे

जालना : जालना येथील उद्योगांना पाण्याची तीव्र टंचाई जाणत असून, आज सर्वात जास्त पाणी हे येथील स्टील उद्योगांना लागते. मात्र पुरसे पाणी मिळत नसल्याने अनेक उद्योजकांवर विकतचे टँकर घेऊन उद्योग चालवण्याची वेळ आली आहे. जालना येथील एमआयडीसीसाठी शेंद्रा येथून स्वतंत्र पाईपलाईन टाकली असून, त्यातून सहा एमएलडी सोडाच परंतु एक एमएलडीही पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.जालना शहरातील सर्वात मोठा उद्योग म्हणून स्टीलकडे पाहिले जाते. अत्यंत उच्च वीज दाबावर स्टीलचे उत्पादन होते. हे झालेले उत्पादन लगेच थंड करण्यासाठी या उद्योगाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. परंतु गेल्या काही वर्षापासून या भागात पुरसे पाणी मिळत नसल्याने अनेकांनी स्वत:चे पाणी पुनर्वापर प्लांट उभारले असून, काही उद्योजकांनी शेततळे तसेच विहिरींचे अधिग्रहण केले आहे. या माध्यमातूनच सध्या उद्योग सुरू असल्याने येत्या काही दिवसात स्टील उद्योजकांवर उत्पादन कपातीची वेळ येणार आहे.जालना येथे स्टीलचे जवळपास सात मोठे प्लांट सुरू असून, त्यांना दररोज लाखो लिटर पाणी लागते. या स्टील उद्योगांचे पुरक उद्योग म्हणजे रोलिंगमिल असून, त्यांनाही तेवढेच पाणी लागत असल्याची माहिती उद्योजकांनी दिली आहे. जालना येथील एमआयडीसीकडून जालन्यातील उद्योगांना पुरेसास पाणीपुरवठा व्हावा यासाठी शेंद्रा येथून जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. मात्र, तेथून कधीच पूर्ण क्षमतेने पाणी आलेले नाही. आता उद्योगांसाठी पुन्हा एकदा नव्याने ३०० कोटी रूपये खर्च करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार असून, पैठण येथील नाथसागरातून शेंद्रा येथील एमआयडीसीत हे पाणी आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. परंतू हे नियोजन गेल्या काही वर्षापासून कासव गतीने सुरू आहे.जिल्ह्याला : ३०० टँकरद्वारे पाणीजालना जिल्ह्यात पाणी टंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. याचा परिणाम टँकरच्या फेऱ्या वाढीवर झाला असून, १५ मार्च पर्यंत जिल्ह्यात ३०१ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अद्याप आठही तालुक्यांमधील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. एकूणच यंदाच्या उन्हाळ्यामध्ये टँकरची संख्या ही पाचशेपेक्षा अधिक होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्यावर्षी संपूर्ण उन्हाळ्यामध्ये केवळ १५४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. यामुळे यंदा टँकरवर लाखो रुपयांचा खर्च होणार आहे.

टॅग्स :JalanaजालनाMIDCएमआयडीसीwater shortageपाणीटंचाई