शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

जालन्यावरील जलसंकट मानवनिर्मित; चोरीच्या पाण्यावर पोसतेय शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 5:52 PM

शहराचा पिच्छा करणारे जलसंकट हे मानवनिर्मित असल्याचेच वारंवार समोर येतेय.

ठळक मुद्देव्हॉल्व्ह फोडून असंख्य ठिकाणी दरोडा टाकला जात आहे. जलवाहिनीजवळील ११० ते दीडशे एकर शेती पोसली जाते

- संजय देशमुख 

जालना : स्टील आणि सीड्स उद्योगाबरोबर जालन्याचा पाणीप्रश्नही नेहमीच चर्चेत असतो. शहरावासीयांची वाढलेली तहान लक्षात घेऊन २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण, शहराचा पिच्छा करणारे जलसंकट हे मानवनिर्मित असल्याचेच वारंवार समोर येतेय. जालन्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी आणण्यात आले. मात्र, पैठण ते  जालनादरम्यान  अंथरलेल्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह फोडून असंख्य ठिकाणी दरोडा टाकला जात आहे. याच चोरीच्या पाण्यावर जलवाहिनीजवळील ११० ते दीडशे एकर शेती पोसली जात असल्याचे भयावह वास्तव पालिकेच्या पथकाने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. 

जालना शहराला पाणीपुरवठा करणारा निजामकालीन घाणेवाडी तलाव हा वाढत्या लोकसंख्येपुढे अपुरा पडल्यामुळे १९८८ मध्ये जालना पालिकेने शहरागड येथे गोदावरीच्या पात्रात बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यात पुढे पैठण येथील जायकवाडी धरणातून दर महिन्याला काही ठरावीक रक्कम भरून गोदावरीत पाणी सोडण्यात  येते. हे पाणी शहागडला येईपर्यंत भरपूर नासाडी होत होती. तेथून शहागड ते जालना अशी जवळपास ५० किलोमीटरची पाइपलाईन अंथरली. 

शहागड येथील पंपहाऊसद्वारे ते जालन्यापर्यंत आणले जायचे. परंतु या पाइपलाईनलाही परिसरातील शेतकऱ्यांनी भगदाड पाडून शेती फुलवली. तिच गत आता पैठण ते जालना या नव्याने  अंथरण्यात आलेल्या जलवाहिनीचीही झाली आहे. जालना पालिकेने केलेल्या पाहणीत हादरवून टाकणाऱ्या बाबी  समोर आल्या. १८ शेतकऱ्यांनी पाईलाईनवर डल्ला मारत शेती आणि फळबाग फुलवल्या आहेत. सगळीकडे पाण्याचे दुर्भिक्ष असताना पैठण ते पाचोड मार्गावरील शेती मात्र, हिरवीगार आहे. त्याचा शोध घेतल्यानंतर  जलवाहिनीला भगदाड पाडून पाण्याच्या चोरीचा गोरखधंदा उजेडात आला. 

शेतकऱ्यांवर गुन्हे जलवाहिनीचे व्हॉल्व फोडून पाणी चोरी करणाऱ्या सर्व  शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासाठी नगराध्यक्षा  संगीता गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. 

निवडणुकीच्या तयारीत समस्यांकडे दुर्लक्षलोकसभा निवडणुका दारावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे जालना शहर राजकीय हालचालींचे केंद्र बनले आहे. आठ दिवसांच्या अंतराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालन्यात येतात. परंतु पाणी, रस्ते तसेच दुष्काळावर ‘ब्र’ न काढता केवळ राजकीय समीकरणे जुळविताना दिसत आहेत. पुढाऱ्यांच्या ‘चलता है’ वृत्तीमुळे सर्वसामान्यांना जार आणि खासगी टँकर विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. एकूणच जालन्यात केवळ राजकीय फड रंगत असून, त्या फडापासून नागरी समस्या कोसोदूर आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीटंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषदJayakwadi Damजायकवाडी धरण