शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

धोकादायक वर्गखोल्यांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:41 AM

जिल्हा परिषद शाळांमधील धोकादायक, मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या आणि पाणीटंचाईचा प्रश्न स्थायी समितीच्या सभेत चांगलाच गाजला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषद शाळांमधील धोकादायक, मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या आणि पाणीटंचाईचा प्रश्न स्थायी समितीच्या सभेत चांगलाच गाजला. स्थायी समिती सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर यांनी तातडीने वर्गखोल्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. तर बंद करण्यात आलेल्या टँकरचा मुद्दाही अनेकांनी उचलून धरीत ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी केली.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी क्षिरसागर, सभापती जिजाबाई कळंबे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पंधराशे शाळा आहे. त्यापैकी ३७५ शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक झाल्या आहे. त्यातील ७०४ वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहे. अशा वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न जयमंगल जाधव यांनी उपस्थित केला.एकीकडे राज्य सरकार जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे प्रशासन शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. मागील पंधरा दिवसांपासून वर्तमान पत्रांमध्ये वर्गखोल्या संदर्भात बातम्या येत आहे. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. सध्या जिल्ह्यात १००८ वर्गखोल्यांची गरज आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी जयमंगल जाधव यांनी केली.यावर उत्तर देताना अध्यक्ष अनिरुध्द खोतकर म्हणाले, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वर्गखोल्या संदर्भात विचारले होते. त्यांनी मोडकळीस आलेल्या सर्व वर्गखोल्यांचे प्रस्ताव तयार करण्याबाबत सांगितले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने येत्या आठ दिवसांमध्ये वर्गखोल्यांचे प्रस्ताव तयार करावे, असे आदेश त्यांनी दिले. तसेच जिल्ह्यात अंगणवाड्यांची गरज आहे. यासाठी आपण अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे गेले होतो. तेव्हा त्यांनी अंगणवाड्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे सांगितल्याचे खोतकर म्हणाले. तसेच पाऊस समाधानकारक नसतानाही टँकर बंद करण्यात आले आहेत. गावा-गावातील पाणीटंचाई पाहता टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी उपस्थित सदस्यांनी यावेळी केली. या सभेला स्थायी समितीचे सदस्य, सर्व विभागाचे प्रमुख व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदSchoolशाळाwater shortageपाणीटंचाई