शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

परतीच्या पावसाने भूजल पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 00:58 IST

पावसामुळे ०.७४ मीटरने भूजलपातळी वाढली आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या जनतेवर पाण्याचे दुर्भिक्ष हे नवे मोठे संकट उभे राहिले होते. परंतु, मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात परतीच्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पाण्याचे मोठे संकट टळले आहे. पावसामुळे भूजलपातळीतही वाढ झाली असून, ०.७४ मीटरने भूजलपातळी वाढली आहे, दरम्यान, जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या भूजलपातळीत सर्वाधिक २.२६ मीटरने वाढ झाली आहे, तर मंठा, जालना, बदनापूर तालुक्यांची पाणी पातळी अजूनही कमी आहे.सतत दुष्काळ पडत असल्याने वेगाने पाणीपातळीत घट होत असल्याचे भीषण वास्तव पुढे आल्याने भूगर्भ पाण्याने कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, यावर्षी भोकरदन तालुका सोडता इतर तालुक्यांमध्ये भर पावसाळ््यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. त्यामुळे विहिरी, बोअर कोरडेठाक पडले होते. परिणामी, तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने नद्या, नाल्यांना पाणी आल्याने काही प्रकल्पही तुडूंब भरले आहे.या पावसामुळे भूजल पातळीतही वाढ झाली आहे. भूजल विभागाच्यावतीने जिल्हाभरातील ११० विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. त्यापैकी २४ विहिरींच्या पाणी पातळीत घट होती. तर ८६ विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे समोर आले. दरम्यान जालना, बदनापूर, अणि मंठा तालुक्यांच्या पाणी पातळीत अजूनही घट आहे. जालना तालुक्यातील १५ विहिरीपैकी ९ विहिरीत घट तर ६ विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बदनापूर तालुक्यातील १२ विहिरींपैकी ६ मध्ये वाढ तर सहामध्ये घट आहे. मंठा तालुक्यातील १० विहिरींपैकी ५ मध्ये वाढ तर पाचमध्ये घट आहे. दरम्यान, परतूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद तालुक्यातील सर्वच विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.बदनापूर तालुक्याची पातळी सर्वात कमीभोकरदन तालुक्यात जुनच्या सुरुवातीपासूनच पाऊस पडत असल्याने भोकरदन तालुक्याच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. भोकरदन तालुक्याची पाणीपातळी २.२६ मीटरने वाढली आहे. तर जाफराबाद १.३९, परतूर १.७२, घनसावंगी तालुक्याची पाणीपातळी १.३८ ने वाढली आहे. दुसरीकडे जालना -०.८५, बदनापूर -०.१३, अंबड ०.३१, मंठा तालुक्याची पाणीपातळी - ०.१४ आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीriverनदीDamधरण