शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने भूजल पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 00:58 IST

पावसामुळे ०.७४ मीटरने भूजलपातळी वाढली आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या जनतेवर पाण्याचे दुर्भिक्ष हे नवे मोठे संकट उभे राहिले होते. परंतु, मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात परतीच्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पाण्याचे मोठे संकट टळले आहे. पावसामुळे भूजलपातळीतही वाढ झाली असून, ०.७४ मीटरने भूजलपातळी वाढली आहे, दरम्यान, जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या भूजलपातळीत सर्वाधिक २.२६ मीटरने वाढ झाली आहे, तर मंठा, जालना, बदनापूर तालुक्यांची पाणी पातळी अजूनही कमी आहे.सतत दुष्काळ पडत असल्याने वेगाने पाणीपातळीत घट होत असल्याचे भीषण वास्तव पुढे आल्याने भूगर्भ पाण्याने कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, यावर्षी भोकरदन तालुका सोडता इतर तालुक्यांमध्ये भर पावसाळ््यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. त्यामुळे विहिरी, बोअर कोरडेठाक पडले होते. परिणामी, तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने नद्या, नाल्यांना पाणी आल्याने काही प्रकल्पही तुडूंब भरले आहे.या पावसामुळे भूजल पातळीतही वाढ झाली आहे. भूजल विभागाच्यावतीने जिल्हाभरातील ११० विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. त्यापैकी २४ विहिरींच्या पाणी पातळीत घट होती. तर ८६ विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे समोर आले. दरम्यान जालना, बदनापूर, अणि मंठा तालुक्यांच्या पाणी पातळीत अजूनही घट आहे. जालना तालुक्यातील १५ विहिरीपैकी ९ विहिरीत घट तर ६ विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बदनापूर तालुक्यातील १२ विहिरींपैकी ६ मध्ये वाढ तर सहामध्ये घट आहे. मंठा तालुक्यातील १० विहिरींपैकी ५ मध्ये वाढ तर पाचमध्ये घट आहे. दरम्यान, परतूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद तालुक्यातील सर्वच विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.बदनापूर तालुक्याची पातळी सर्वात कमीभोकरदन तालुक्यात जुनच्या सुरुवातीपासूनच पाऊस पडत असल्याने भोकरदन तालुक्याच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. भोकरदन तालुक्याची पाणीपातळी २.२६ मीटरने वाढली आहे. तर जाफराबाद १.३९, परतूर १.७२, घनसावंगी तालुक्याची पाणीपातळी १.३८ ने वाढली आहे. दुसरीकडे जालना -०.८५, बदनापूर -०.१३, अंबड ०.३१, मंठा तालुक्याची पाणीपातळी - ०.१४ आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीriverनदीDamधरण