शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
6
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
7
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
8
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
9
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
10
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
11
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
12
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
14
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
15
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
16
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
17
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
18
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
19
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,

परतीच्या पावसाने भूजल पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 00:58 IST

पावसामुळे ०.७४ मीटरने भूजलपातळी वाढली आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या जनतेवर पाण्याचे दुर्भिक्ष हे नवे मोठे संकट उभे राहिले होते. परंतु, मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात परतीच्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पाण्याचे मोठे संकट टळले आहे. पावसामुळे भूजलपातळीतही वाढ झाली असून, ०.७४ मीटरने भूजलपातळी वाढली आहे, दरम्यान, जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या भूजलपातळीत सर्वाधिक २.२६ मीटरने वाढ झाली आहे, तर मंठा, जालना, बदनापूर तालुक्यांची पाणी पातळी अजूनही कमी आहे.सतत दुष्काळ पडत असल्याने वेगाने पाणीपातळीत घट होत असल्याचे भीषण वास्तव पुढे आल्याने भूगर्भ पाण्याने कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, यावर्षी भोकरदन तालुका सोडता इतर तालुक्यांमध्ये भर पावसाळ््यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. त्यामुळे विहिरी, बोअर कोरडेठाक पडले होते. परिणामी, तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने नद्या, नाल्यांना पाणी आल्याने काही प्रकल्पही तुडूंब भरले आहे.या पावसामुळे भूजल पातळीतही वाढ झाली आहे. भूजल विभागाच्यावतीने जिल्हाभरातील ११० विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. त्यापैकी २४ विहिरींच्या पाणी पातळीत घट होती. तर ८६ विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे समोर आले. दरम्यान जालना, बदनापूर, अणि मंठा तालुक्यांच्या पाणी पातळीत अजूनही घट आहे. जालना तालुक्यातील १५ विहिरीपैकी ९ विहिरीत घट तर ६ विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बदनापूर तालुक्यातील १२ विहिरींपैकी ६ मध्ये वाढ तर सहामध्ये घट आहे. मंठा तालुक्यातील १० विहिरींपैकी ५ मध्ये वाढ तर पाचमध्ये घट आहे. दरम्यान, परतूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद तालुक्यातील सर्वच विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.बदनापूर तालुक्याची पातळी सर्वात कमीभोकरदन तालुक्यात जुनच्या सुरुवातीपासूनच पाऊस पडत असल्याने भोकरदन तालुक्याच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. भोकरदन तालुक्याची पाणीपातळी २.२६ मीटरने वाढली आहे. तर जाफराबाद १.३९, परतूर १.७२, घनसावंगी तालुक्याची पाणीपातळी १.३८ ने वाढली आहे. दुसरीकडे जालना -०.८५, बदनापूर -०.१३, अंबड ०.३१, मंठा तालुक्याची पाणीपातळी - ०.१४ आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीriverनदीDamधरण