शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

स्वच्छताविषयक घोषवाक्य लेखन स्पर्धेची अंमलबजावणी करा - जिंदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST

केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत हागणदारीमुक्त कार्यक्रम अधिक सक्रिय करण्यासाठी ‘हागणदारीमुक्त’ या विषयावर ‘घोषवाक्य लेखन ...

केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत हागणदारीमुक्त कार्यक्रम अधिक सक्रिय करण्यासाठी ‘हागणदारीमुक्त’ या विषयावर ‘घोषवाक्य लेखन स्पर्धा’ १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली असून, सदर ‘घोषवाक्य लेखन स्पर्धे’चा उद्देश हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) या कार्यक्रमाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करून लोकसहभाग वाढविणे हा आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा व राज्य पातळीवर गौरविण्यात येणार आहे.

या घोषवाक्य लेखन स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी व ग्रामपंचायतींमधील सर्व गावांनी सहभाग घेणे आवश्यक आहे. ‘हागणदारीमुक्त अधिक’ (ओडीएफ प्लस) या संकल्पनेतील प्रत्येक घटकावर जसे की, शौचालयाचा नियमित वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, ओला - सुका व प्लास्टिक कचरा विलगीकरण आदींबाबत ‘घोषवाक्ये’ लिहिण्यात यावीत. हे संदेश गावातील सार्वजनिक जागा/सभागृह, सरकारी दवाखाने, बाजारपेठा, पोस्ट ऑफिस, बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी दर्शनी भागात ६ फूट बाय ४ फूट आकारात रंगविण्यात यावेत. यामध्ये मजकूर हा लोकजागृती करणारा व जास्तीतजास्त परिणामकारक असण्यासह सांस्कृतिकदृष्ट्या तसेच तांत्रिकदृष्ट्या योग्य, सर्वसमावेशक आणि आकर्षक असणे आवश्यक आहे.

n १ ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ग्रामपंचायतींनी गावातील सार्वजनिक जागा, बाजारपेठा, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा, सार्वजनिक सभागृह, इमारती आदी ठिकाणी हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) या संकल्पनेतील प्रत्येक घटकावर जास्तीतजास्त ‘घोषवाक्ये’ लिहिणे आवश्यक आहे.

n ९ ते १५ सप्टेंबरदरम्यान ग्रामपंचायतींच्या संबंधित ग्रामसेवकांनी लिहिलेल्या सर्व घोषवाक्यांची छायचित्रे एकत्रितपणे पंचायत समितींना १५ सप्टेंबरपर्यंत सादर करावीत.