शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

"मी जातीवादी नसून आरक्षणवादी"; मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त जरांगेंचा संदेश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 12:20 IST

मराठा समाज एकत्र करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण आता माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे.: मनोज जरांगे

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : ''श्रीमंत मराठापासून ते गरीब मराठा एकमेकांना सहकार्य करू लागलेत. तुम्ही एकत्र आल्यामुळे मराठा समाजाकडे अख्ख जग पाहतेय. मराठा समाज एकत्र करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण आता माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे. त्यांनी दिलेले योगदान वायाला जाऊ देणार नाही. सर्व असेच एक रहा'', असा संदेश मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त मनोज जरांगे यांनी समाजाला दिला. वर्षभरात काय मिळाले, काही बाकी आहे याबाबत चिंतन करण्यासाठी आज फक्त छोटी बैठक आहे. कोणीही काम बुडवून इकडे येऊ नका, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले. तसेच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर पुढील भूमिका मांडू, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. ते आज सकाळी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. 

मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षापूर्तीनिमित्त मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर जरांगे म्हणाले, यापूर्वी मराठा समाज एकत्र होत नाही असं बोललं जायचं. यामुळे माझ्या समाजाकडे तिरस्काराने बघितले जायचे. पण मागील वर्षीची २९ तारीख अशी उजडली, समाजाने डरकाळी फोडली.  त्याचा संबंध महाराष्ट्रभर आवाज गेला. २९ ऑगस्ट २०२३ रोजी मराठा समाज एकत्र आला होता. आज वर्षपूर्ती असून यापुढे कितीही मोठे संकट आले तरी एकत्र रहा. कुटुंब एक असेल तर कोणी ते तोडू शकत नाही, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे यांनी मागील वर्षी २९ ऑगस्ट रोजी पैठण फाटा, शहागड येथे जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता. त्याठिकाणी जाऊन जरांगे यांनी मराठा समाज एकत्र झालाय त्याची येथून सुरूवात झाली, असे म्हणत आठवणींना उजाळा दिला. २९ ऑगस्ट २०२३ रोजी मनोज जरांगे यांनी अंतरावली सराटीतून आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात केली होती.त्यांच्या घटनेस आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त आज अंतरवाली सराटीमध्ये छोटीखानी बैठकीच आयोजन करण्यात आला आहे. यावेळी एका वर्षात समाजाने काय मिळवलं, काय मिळवायचे आहे  यावर चर्चा होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. 

राज्यातील मराठा समाज एकत्रित येणे गरजेचे. पावणे दोन कोटी मराठी आज ओबीसी आरक्षणात गेले. माझ्या मराठा समाजाला तळमळीने विनंती आहे, एखादी गोष्ट लगेच नाही मिळाली तर चार दिवस उशिरा मिळेल. विजय तुमच्या पायात येऊन पडणार. मी लढायला खंबीर आहे. गरीब गरीब आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला . त्याला आपण जबाबदार आहोत, असेही म्हणत जरांगे यांनी समाजाचे कान टोचले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना