शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

"मी जातीवादी नसून आरक्षणवादी"; मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त जरांगेंचा संदेश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 12:20 IST

मराठा समाज एकत्र करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण आता माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे.: मनोज जरांगे

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : ''श्रीमंत मराठापासून ते गरीब मराठा एकमेकांना सहकार्य करू लागलेत. तुम्ही एकत्र आल्यामुळे मराठा समाजाकडे अख्ख जग पाहतेय. मराठा समाज एकत्र करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण आता माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे. त्यांनी दिलेले योगदान वायाला जाऊ देणार नाही. सर्व असेच एक रहा'', असा संदेश मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त मनोज जरांगे यांनी समाजाला दिला. वर्षभरात काय मिळाले, काही बाकी आहे याबाबत चिंतन करण्यासाठी आज फक्त छोटी बैठक आहे. कोणीही काम बुडवून इकडे येऊ नका, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले. तसेच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर पुढील भूमिका मांडू, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. ते आज सकाळी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. 

मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षापूर्तीनिमित्त मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर जरांगे म्हणाले, यापूर्वी मराठा समाज एकत्र होत नाही असं बोललं जायचं. यामुळे माझ्या समाजाकडे तिरस्काराने बघितले जायचे. पण मागील वर्षीची २९ तारीख अशी उजडली, समाजाने डरकाळी फोडली.  त्याचा संबंध महाराष्ट्रभर आवाज गेला. २९ ऑगस्ट २०२३ रोजी मराठा समाज एकत्र आला होता. आज वर्षपूर्ती असून यापुढे कितीही मोठे संकट आले तरी एकत्र रहा. कुटुंब एक असेल तर कोणी ते तोडू शकत नाही, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे यांनी मागील वर्षी २९ ऑगस्ट रोजी पैठण फाटा, शहागड येथे जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता. त्याठिकाणी जाऊन जरांगे यांनी मराठा समाज एकत्र झालाय त्याची येथून सुरूवात झाली, असे म्हणत आठवणींना उजाळा दिला. २९ ऑगस्ट २०२३ रोजी मनोज जरांगे यांनी अंतरावली सराटीतून आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात केली होती.त्यांच्या घटनेस आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त आज अंतरवाली सराटीमध्ये छोटीखानी बैठकीच आयोजन करण्यात आला आहे. यावेळी एका वर्षात समाजाने काय मिळवलं, काय मिळवायचे आहे  यावर चर्चा होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. 

राज्यातील मराठा समाज एकत्रित येणे गरजेचे. पावणे दोन कोटी मराठी आज ओबीसी आरक्षणात गेले. माझ्या मराठा समाजाला तळमळीने विनंती आहे, एखादी गोष्ट लगेच नाही मिळाली तर चार दिवस उशिरा मिळेल. विजय तुमच्या पायात येऊन पडणार. मी लढायला खंबीर आहे. गरीब गरीब आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला . त्याला आपण जबाबदार आहोत, असेही म्हणत जरांगे यांनी समाजाचे कान टोचले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना