हाच निर्णय शनिवारी घेतला असता तर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST2021-02-16T04:32:19+5:302021-02-16T04:32:19+5:30
जालना ते देऊळगाव मार्गावर गेल्या तीन दिवसांत दोन वेगवेगळे अपघात होऊन चार जणांचा बळी गेला आहे. या सलगच्या अपघातांमुळे ...

हाच निर्णय शनिवारी घेतला असता तर...
जालना ते देऊळगाव मार्गावर गेल्या तीन दिवसांत दोन वेगवेगळे अपघात होऊन चार जणांचा बळी गेला आहे. या सलगच्या अपघातांमुळे परिसरातील नागरिकांमध्येही भीती पसरली आहे. ही विहीर मुख्य मार्गापासून पंधरा ते वीस मीटर अंतरावर आहे. या विहिरीचा कठडा तोडून शुक्रवारी एक कार सायंकाळी विहिरीत पडली होती. त्यात बीडचे दोन युवक ठार झाले होते. शनिवारचा एक दिवस गेला न गेला तोच रविवारी सकाळी औरंगाबादहून वाशिमकडे जाणाऱ्या पांदळे कुटुंबावर काळाने घाला घातला. त्यात आई आणि मुलगी दगावली.
या दोन अपघातांनंतर प्रशासनाने त्या वळण रस्त्यावर आता बॅरिकेट्स बसिवण्याचे काम हाती घेतले आहे. हेच काम त्यांनी शनिवारी केले असते, तर रविवारचा अपघात टळला असता, अशी संतप्त भावना प्रशांत वाढेकर यांनी व्यक्त केली.