शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

सत्ता आली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा- आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:05 IST

ते मालक आणि आपण सालगडी असा दृष्टीकोन तयार करून घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : आजची ही निवडणूक ऐतिहासिक आहे. आपण जिंकलो तर राज्याचे राजकारण बदलणार आहे. यासाठी बलुतेदार व आलुतेदार आस लावून बसला आहे. ते मालक आणि आपण सालगडी असा दृष्टीकोन तयार करून घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.घनसावंगी येथे वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी विष्णू दळवी, विष्णू शेळके, दीपक बोराडे, अ‍ॅड. प्रकाश खरात, राजेंद्र मगरे, शिवाजी सवणे, दीपक डोके यांची प्रमुख उपस्थिती होती. आंबेडकर म्हणाले, जनता हुशार झाली आहे. सर्व उपेक्षित समाज वंचिताच्या झेंड्याखाली एक झाला आहे. संघटन झाले आहे. या देशात एका भाकरीवर जगणाऱ्यांच्या हातात सत्ता का येत नाही, असा सवाल उपस्थित करीत गोदामात अन्न सडते मात्र, ते गरिबाला वाटत नाहीत. गरीब गरीबच राहिला पाहिजे, ही मानसिकता काँग्रेस-राष्ट्रवादीची होती व आता भाजप-सेनेची तीच मानसिकता आहे. यामुळे देशात कुपोषण वाढले आहे.कोल्हापूर व सांगलीत पूरग्रस्तांना सत्ताधाºयांनी मदत न करता हेलिकॉप्टरने पिकनिक केली. सेल्फी घेण्यात ते दंग होते. आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर सरकार जागे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात २०० पेक्षा अधिक जागा येणार. ते काय ज्योतिषी आहेत काय, असा सवाल उपस्थित करीत सत्ताधा-यांसह काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवरही आंबेडकर यांनी जोरदार टीका केली.प्रचाराला आता केवळ पाच दिवसच उरले आहेत, कार्यकर्ते, पदाधिका-यांनी जिवाचे रान करून वंचित आघाडीची ध्येय-धोरणे लोकांपर्यंत न्यावीत. ही निवडणूक म्हणजे आपल्यासाठी असलेली मोठी संधी असून, जास्तीत जास्त मतदारांनी आपल्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही जागृत ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आंबेडकर यांच्या सभेस घनसावंगीसह अन्य तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची हजेरी होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ लाख रूपये देणार असल्याचे सांगितले. मात्र, कोणालाही १५ लाख रूपये मिळाले नाहीत.१५ लाख मिळणे सोडा, आता ते आपल्या खात्यातील रक्कमही २४ तारखेनंतर काढून घेणार असल्याची टीका आंबेडकर यांनी यावेळी केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019ghansawangi-acघनसावंगी