शहरं
Join us  
Trending Stories
1
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
2
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
4
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
5
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
6
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
7
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
8
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
9
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
10
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
11
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
13
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
14
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
15
"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा
16
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
17
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
19
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
20
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता आली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा- आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:05 IST

ते मालक आणि आपण सालगडी असा दृष्टीकोन तयार करून घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : आजची ही निवडणूक ऐतिहासिक आहे. आपण जिंकलो तर राज्याचे राजकारण बदलणार आहे. यासाठी बलुतेदार व आलुतेदार आस लावून बसला आहे. ते मालक आणि आपण सालगडी असा दृष्टीकोन तयार करून घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.घनसावंगी येथे वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी विष्णू दळवी, विष्णू शेळके, दीपक बोराडे, अ‍ॅड. प्रकाश खरात, राजेंद्र मगरे, शिवाजी सवणे, दीपक डोके यांची प्रमुख उपस्थिती होती. आंबेडकर म्हणाले, जनता हुशार झाली आहे. सर्व उपेक्षित समाज वंचिताच्या झेंड्याखाली एक झाला आहे. संघटन झाले आहे. या देशात एका भाकरीवर जगणाऱ्यांच्या हातात सत्ता का येत नाही, असा सवाल उपस्थित करीत गोदामात अन्न सडते मात्र, ते गरिबाला वाटत नाहीत. गरीब गरीबच राहिला पाहिजे, ही मानसिकता काँग्रेस-राष्ट्रवादीची होती व आता भाजप-सेनेची तीच मानसिकता आहे. यामुळे देशात कुपोषण वाढले आहे.कोल्हापूर व सांगलीत पूरग्रस्तांना सत्ताधाºयांनी मदत न करता हेलिकॉप्टरने पिकनिक केली. सेल्फी घेण्यात ते दंग होते. आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर सरकार जागे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात २०० पेक्षा अधिक जागा येणार. ते काय ज्योतिषी आहेत काय, असा सवाल उपस्थित करीत सत्ताधा-यांसह काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवरही आंबेडकर यांनी जोरदार टीका केली.प्रचाराला आता केवळ पाच दिवसच उरले आहेत, कार्यकर्ते, पदाधिका-यांनी जिवाचे रान करून वंचित आघाडीची ध्येय-धोरणे लोकांपर्यंत न्यावीत. ही निवडणूक म्हणजे आपल्यासाठी असलेली मोठी संधी असून, जास्तीत जास्त मतदारांनी आपल्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही जागृत ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आंबेडकर यांच्या सभेस घनसावंगीसह अन्य तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची हजेरी होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ लाख रूपये देणार असल्याचे सांगितले. मात्र, कोणालाही १५ लाख रूपये मिळाले नाहीत.१५ लाख मिळणे सोडा, आता ते आपल्या खात्यातील रक्कमही २४ तारखेनंतर काढून घेणार असल्याची टीका आंबेडकर यांनी यावेळी केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019ghansawangi-acघनसावंगी