शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कोरोनाकाळातही जपले माणुसकी, जिव्हाळ्याचे नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST

जालना : कोरोनाने गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजविला आहे अशाही स्थितीत एकमेकांना धीर आणि आधार देऊन कॉलनीतील नागरिकांनी एकमेकांशी ...

जालना : कोरोनाने गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजविला आहे अशाही स्थितीत एकमेकांना धीर आणि आधार देऊन कॉलनीतील नागरिकांनी एकमेकांशी जिव्हाळा ठेवून माणुसकीचे नाते जपल्याचा सूर वृंदावन कॉलनीतील नागरिकांनी आळविला.

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अनेकांना या कोरोनाचा विळखा सहन करावा लागला यात अनेकांनी संकटाशी दोन हात केले. पारिवारिक आणि शेजाऱ्यांनी जी माणुसकी आणि हिंमत दिली त्यातूनच आम्ही सर्वं जणांनी एकत्रित येत कोरोनाला वेशीवर राेखले. या आजाराने एकमेकांपासून दूर असलो तरी सोशल मीडिया आणि सुरक्षित अंतर ठेवून आम्ही एकत्रच होतो.

या काळात कॉलनीतील स्वच्छतेला महत्व दिले. पर्यावरणपूरक उपक्रम राबविले. असे अनेक चांगले अनुभव गुरुवारी वृंदावन कॉलनीत झालेल्या बैठकीत नागरिकांनी सांगितले. श्रीकृष्ण मंदिरात ही बैठक पार पडली. यावेळी अनिल भेरे यांनी उपस्थितांचे आभार मानून एकोप्याबद्दल माहिती दिली. यावेळी संजय कंठाळे यांनीही विचार मांडले. कार्यक्रमास ॲड. बलवंत नाईक, विष्णुपंत कंठाळे, उदय कुलकर्णी, अजित चौधरी, कीर्ती जोशी, छाया नाईक, नलिनी चौधरी, नलिनी जोशी, प्रीती पाठक, योगेश पाठक, निकिता रुद्राक्ष, दिशा डोल्हारकर, सुजाता खंडाळे, विद्या सोरटी, संगीता राख, संगीता कंठाळे, सुमन नामेवार, वैशाली काळे, दीपाली कंडारकर, जानकी रुद्राक्ष, वैशाली उन्हाळे, डॉ. डी. के. भोसले आदींची उपस्थिती होती.

कोरोना काळात आमच्या परिवारातील काही सदस्यांना दोन वेळेला घरले होते. त्यात माझ्यासह सासूबाईंचा समावेश होता. परंतु, कॉलनीतील सर्वांनी साथ दिली त्यामुळे आम्हाला हिंमत मिळाली. शिवभोजन उपक्रमातून गरिबांसाठी जी मदत करता आली त्याचेच आशीर्वाद मिळाले आहेत.

-ॲड. पूनम नाईक

कोरोना काळात मलाही लागण झाली. असे असले तरी आमच्या कॉलनीतील ज्येष्ठ तसेच मुलांनी मला मोठी साथ दिली. मी क्वॉरंनटाइन असली तरी आमच्या कॉलनीतील माझ्या मित्र मैत्री या अंगणात येऊन सुरक्षित अंतर ठेवून संपर्कात होत्या. त्याचा आनंद आहे.

- राजेश्वरी राख

कोरोनाने सर्वांना माणुसकीचे धडे शिकविले. आमच्या कॉलनीमध्ये कुठलाही कार्यक्रम असला तरी तो सर्वजण एकत्रित येऊन साजरा करतात. त्यामुळे जिव्हाळा आणि माणसुकी हे आमच्या कॉलनीचे वैशिष्ट आहे. आणि ते आम्ही पुढेही कायम ठेवणार आहोत.

- ॲड. संजय देशपांडे

गेल्या पंधरा वर्षांपासून आमची कॉलनी नेहमीच एक आदर्श कॉलनी म्हणून ओळखली जाते. युवक-युवती आणि घरातील ज्येष्ठ तसेच महिलांचाही कुठल्याही कार्यक्रमात एकोपा आणि हिरीरी असते. यामुळेच आम्ही कोरोना काळात एकमेकांना मोठी साथ दिली.

- राजेंद्र राख

कोरोनाने सर्वांत मोठे नुकसान हे विद्यार्थ्यांचे झाले आहे. याचा परिणाम त्यांच्या एकूणच जीवनशैलीवर झाला आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून मोठा लाभ झाला आहे. परंतु, जे शाळेत जाऊन शिक्षण मिळते त्याची गुणवत्ता आणि महत्त्व वेगळे असते.

- रूपाली नामेवार