शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

उच्चशिक्षित युवकांनी शेतीला दिला उद्योगाचा दर्जा; रोपनिर्मितीतून साधली आर्थिक उन्नती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 15:54 IST

उच्चशिक्षित युवकांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीत केले कष्ट

- अझर शेखवाटूर ( जालना) : परतूर तालुक्यातील वाटूर येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील दोन भावांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेतले. परंतु, नोकरीच्या मागे न लागता घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर वडिलोपार्जित शेतीत  फळे आणि भाजीपाल्याच्या दर्जेदार रोपांची निर्मिती करून त्यांनी स्वत:बरोबर शेकडो शेतकऱ्यांना समृद्ध  केले आहे.   मराठवाडा आणि विदर्भातील  दहा जिल्ह्यात त्यांची राेपे पोहचत आहेत. 

वाटूर येथील गजानन नरहरी माने या युवकाने खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातून बीएसस्सी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर राजेश नरहरी माने यांनी डीटीएडचे शिक्षण घेतले आहे.  शेतीमधून उद्योग व रोजगार उभा करण्याच्या दृष्टीने दोघांनी आठ वर्षांपूर्वी वीस गुंठ्यांत रोपनिर्मिती सुरू केली. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याबरोबरच कोरवाडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही भाजीपाला पिकवता आला पाहिजे, हा त्यांच्या या रोपवाटिकेचा उद्देश होता. जिद्द, मेहनत आणि घेतलेल्या शिक्षणाचा दोघांना फायदा झाला. त्यांनी निर्माण केलेली विविध रोपे शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरली आणि येथूनच त्यांच्या रोपनिर्मिती उद्योगाला चालना मिळाली. रोपवाटिकामधून शेतकऱ्यांचा भरोसा माने बंधूंनी संपादन केला आहे. चांगल्या पद्धतीची रोपे चाळीस दिवसांत तयार करण्याचे तंत्र त्यांना अवगत झाले आहे. शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांबरोबर भाजीपाला निर्मितीतून उत्पन्नाचा स्त्रोत मिळावा, यासाठी माने बंधू विशेष करून भाजीपाल्यांच्या रोपांवर भर देत आहेत. सध्या दिवसाकाठी दहा ते पंधरा हजार रुपयांची रोपे तयार करून त्याची विक्री दोन्ही भावंडे करत आहेत. वर्षाकाठी  लाखो रूपयांची उलाढाल रोपवाटिकेतून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दहा जिल्ह्यात पोहचली वाटूरची ही रोपे माने बंधू बदलत्या काळानुरूप भाजीपाला आणि फळबागांच्या रोप निर्मितीवर भर देत आहे. त्यांच्या रोपवाटिकेत टोमॅटो, मिरची, कोबी, वांगे, सिमला मिरची, टरबूज, खरबूज, सीताफळ, जांभळ, शेवगा आदी भाजीपाला पिकांचे रोपे तयार होतात. सुरूवातीस अर्धा एकरात असलेली रोपवाटिका आता दोन एकरांत विस्तारली आहे. तसेच तयार केलेले रोपे आता घरपोच देण्याची सुविधा शेतकऱ्यांना माने बंधू देत आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये त्यांची रोपे पोहचली आहेत.

विश्वास हीच आमची ओळखकष्टाला जेव्हा विश्वासाची साथ मिळते तेव्हा उत्साह वाढतो. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी निर्माण करता आली याचे समाधान आहे. आम्हाला या रोपांमुळे ओळख मिळाल्याचे माने बंधुनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती