शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

उच्चशिक्षित युवकांनी शेतीला दिला उद्योगाचा दर्जा; रोपनिर्मितीतून साधली आर्थिक उन्नती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 15:54 IST

उच्चशिक्षित युवकांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीत केले कष्ट

- अझर शेखवाटूर ( जालना) : परतूर तालुक्यातील वाटूर येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील दोन भावांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेतले. परंतु, नोकरीच्या मागे न लागता घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर वडिलोपार्जित शेतीत  फळे आणि भाजीपाल्याच्या दर्जेदार रोपांची निर्मिती करून त्यांनी स्वत:बरोबर शेकडो शेतकऱ्यांना समृद्ध  केले आहे.   मराठवाडा आणि विदर्भातील  दहा जिल्ह्यात त्यांची राेपे पोहचत आहेत. 

वाटूर येथील गजानन नरहरी माने या युवकाने खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातून बीएसस्सी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर राजेश नरहरी माने यांनी डीटीएडचे शिक्षण घेतले आहे.  शेतीमधून उद्योग व रोजगार उभा करण्याच्या दृष्टीने दोघांनी आठ वर्षांपूर्वी वीस गुंठ्यांत रोपनिर्मिती सुरू केली. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याबरोबरच कोरवाडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही भाजीपाला पिकवता आला पाहिजे, हा त्यांच्या या रोपवाटिकेचा उद्देश होता. जिद्द, मेहनत आणि घेतलेल्या शिक्षणाचा दोघांना फायदा झाला. त्यांनी निर्माण केलेली विविध रोपे शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरली आणि येथूनच त्यांच्या रोपनिर्मिती उद्योगाला चालना मिळाली. रोपवाटिकामधून शेतकऱ्यांचा भरोसा माने बंधूंनी संपादन केला आहे. चांगल्या पद्धतीची रोपे चाळीस दिवसांत तयार करण्याचे तंत्र त्यांना अवगत झाले आहे. शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांबरोबर भाजीपाला निर्मितीतून उत्पन्नाचा स्त्रोत मिळावा, यासाठी माने बंधू विशेष करून भाजीपाल्यांच्या रोपांवर भर देत आहेत. सध्या दिवसाकाठी दहा ते पंधरा हजार रुपयांची रोपे तयार करून त्याची विक्री दोन्ही भावंडे करत आहेत. वर्षाकाठी  लाखो रूपयांची उलाढाल रोपवाटिकेतून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दहा जिल्ह्यात पोहचली वाटूरची ही रोपे माने बंधू बदलत्या काळानुरूप भाजीपाला आणि फळबागांच्या रोप निर्मितीवर भर देत आहे. त्यांच्या रोपवाटिकेत टोमॅटो, मिरची, कोबी, वांगे, सिमला मिरची, टरबूज, खरबूज, सीताफळ, जांभळ, शेवगा आदी भाजीपाला पिकांचे रोपे तयार होतात. सुरूवातीस अर्धा एकरात असलेली रोपवाटिका आता दोन एकरांत विस्तारली आहे. तसेच तयार केलेले रोपे आता घरपोच देण्याची सुविधा शेतकऱ्यांना माने बंधू देत आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये त्यांची रोपे पोहचली आहेत.

विश्वास हीच आमची ओळखकष्टाला जेव्हा विश्वासाची साथ मिळते तेव्हा उत्साह वाढतो. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी निर्माण करता आली याचे समाधान आहे. आम्हाला या रोपांमुळे ओळख मिळाल्याचे माने बंधुनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती