शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

उंच माझा झोका गं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:45 IST

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून मंगळवारी इयत्ता बारवीचा निकाल जाहीर केला. त्यात यंदाही मुलांच्या तुलनेने मुलींनी बाजी मारली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून मंगळवारी इयत्ता बारवीचा निकाल जाहीर केला. त्यात यंदाही मुलांच्या तुलनेने मुलींनी बाजी मारली आहे. जालना जिल्ह्यात एकूण ९ हजार २८५ विद्यार्र्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून, ज्याची टक्केवारी ९०. ८७ टक्के येते. जालना जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८७.१२ टक्के लागला आहे. यात विज्ञान शाखेचा ९४.७५, कला शाखेचा ७९.५७ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ८९.५० टक्के लागला आहे.विज्ञान शाखेसाठी एकूण १२ हजार ४४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात विशेष प्राविण्यासह ८६२, प्रथम श्रेणीत ६६७०, द्वितीय श्रेणीत ४१९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेत विशेष प्राविण्यात ५६८, प्रथम श्रेणीत ६ हजार २८, द्वितीय श्रेणीत ३ हजार ८९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेत ३१९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, प्रथम श्रेणीत ९५७, द्वितीय श्रेणीत ७५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.व्यावसायिक अभ्यासक्रमात ३७९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून, ३३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २२४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जालना जिल्ह्याचा निकाला यंदा थेट ८७ टक्के लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये सर्वत्र उत्साही आणि आनंदाचे वातावरण दिसून आले. निकाला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शहरातील विविध नेट कॅफेवर गर्दी केली होती. दरम्यान काही काळ बोर्डाची वेबसाईट ही जाम झाली होती. त्यामुळे एक ते दोन वाजेच्या दरम्यान निकाल कळण्यास विलंब झाला. नंतर मात्र, ही वेबसाईट पूर्ववत सुरू झाल्याने निकालाची सत्यप्रत काढण्यासाठी गर्दी झाली होती.भोकरदन तालुक्याचा सर्वाधिक ९४ टक्के निकालजालना तालुक्याचा एकूण निकाल ८६.७६, बदनापूर तालुका ८०.०६, अंबड तालुका ८६.८९, परतूर तालुका ८०.०६, घनसावंगी तालुका ६६.५४, मंठा तालुका ८२.१४, भोकरदन तालुका ९४.६५, जाफराबाद तालुका ८७.४६ टकके निकाल लागला आहे. विज्ञान शाखेने यंदा निकालात अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचे कारण शिक्षण तज्ज्ञांकडे विचारले असता, विज्ञान शाखेला प्रॅक्टिलचे गुण हे सहज उपलब्ध होत असल्याने विज्ञान शाखेचे टक्केवारी नेहमीच वाढलेली असते.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालWomenमहिलाEducationशिक्षणStudentविद्यार्थी