शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

गवळी समाजाचा विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:03 AM

अहीर गवळी समाज संचलित अष्टम सामूहिक विवाह समितीच्यावतीने अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील अहीर गवळी समाज संचलित अष्टम सामूहिक विवाह समितीच्यावतीने अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जैन विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या सोहळ्यात ७२ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.समितीच्यावतीने रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. विवाह सोहळ्यांमधील खर्चाला फाटा देत समाजात एकता कायम राहावी या उद्देशाने १९९५ मध्ये पहिला सामुहिक विवाह सोहळा मदन भुरेवाल, पारसनंद यादव, स्व. शंकर खरे, स्व. सूर्यप्रकाश बरेठिये, मदन जटावाले, चंपालाल भगत यांच्या पुढाकाराने घेण्यात आला होता. आतापर्यंत ४२२ जोडपी विवाह बद्ध झाली आहेत. या विवाह सोहळ्यात राज्यभरातील जोडपी विवाह बद्ध होणार आहेत. सोहळ्यास केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळ्या १३ समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती समितीच्या पदाधिका-यांनी दिली.पत्रकार परिषदेस समितीचे अध्यक्ष कचरुलाल भगत, पारसनंद यादव, अभयकुमार यादव, चंपालाल भगत, मनिष नंद, सुनील खरे, अनिल भुरेवाल, कैलास मेघावाले, दीपक भुरेवाल, गंगालाल भुरेवाल, गणेश नंद आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिक