शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 12:45 AM

दुष्काळी अनुदानासह पिकविम्याचे वाटप तातडीने करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळी अनुदानासह पिकविम्याचे वाटप तातडीने करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्ह्यात २०१८ मध्ये टाटा इन्शरन्स कंपनीकडे १४२० शेतकऱ्यांनी मोसंबीचा विमा भरला होता. त्याला मंजूरी सुध्दा मिळाली होती. मात्र, दहा महिने उलटूनही संबधीत कंपनीने अद्यापही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली नाही. तसेच आयसीआयसीआय लॉबार्ड कंपनीने खरिप विमा भरुन घेतला. मात्र जालना जिल्ह्यात मूग, बाजरी याच पिकांना विमा मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये ३ लाख शेतक-यांनी संबधीत कंपनीकडे ९ लाख रुपयांचा पीकविम्याचा हप्ता भरला होता. मात्र, बोटावर मोजण्याइतक्याच शेतक-यांना सदर कंपनीने विमा मंजूर केला. इतर शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला. याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी शेतक-यांनी तक्रारी केल्या मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानेच शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहे.प्रधानमंत्री पिकविमा योजना खरिप हंगाम २०१८ च्या शासन निर्णयामध्ये शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीविषयी स्पष्ट उल्लेख आहे. की. गारपीट, वीज कोसळने, चक्रीवादळ, पूर तसेच किडीचा प्रादुर्भाव आदी कारणामुळे पिकाचे नुकसान झाल्यास पीकविमा योजने पासून शेतक-यांना टाळता येणार नाही. असे नमूद आहे. असे असतांना सुध्दा शेतकºयांना याचा फायदा होत नसल्याने नाराजी आहे. यावेळी सुरेश पोटे, वाजेद चाऊस, श्रीराम वराडे, रावसाहेब खोसे, दीपक पोकळे, राजेश चिमनकर, रघुनाथ सोसे, नितीन धांडगे, अशोक सांगळेसह दिडशे शेतकरी सहभागी होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना