शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

चार हजार शेतकऱ्यांचे मोफत माती परीक्षण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 1:18 AM

पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी विभागाच्याकडून तब्बल ४ हजार ३९० शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोफत मातीपरीक्षण करुन दिल्याने खरीप पेरणीच्या वेळी शेतक-यांना चांगला फायदा झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाढत्या रासायनिक खताच्या वापरामुळे शेतीचा पोत बिघडला आहे. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी विभागाच्याकडून तब्बल ४ हजार ३९० शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोफत मातीपरीक्षण करुन दिल्याने खरीप पेरणीच्या वेळी शेतक-यांना चांगला फायदा झाला.सलगच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेले आहे. मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करत आहेत. परिणामी दिवसे- दिवस शेतीचे आरोग्य बिघडत चालेले आहे. शेतीत खर्च करुन पुरेशा प्रमाणात उत्पन्न न निघाल्याने अनेक शेतकरी हतबल होतात. यातूनच आत्महत्या सारख्या घटना घडत आहेत. यामुळे शेतक-यामध्ये जनजागृती करुन पेरणीपूर्वी शेतक-यांच्या जमिनीची आरोग्य तपासणी करुन जमिनीत कोण- कोणत्या घटकांची कमतरता आहे. याची माहिती द्यावी, या चांगल्या हेतूने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत २०१९ या आर्थिक वर्षापासून केंद्र आणि राज्यशासनाने पायटल प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतक-यांच्या जमिनीची मोफत आरोग्य तपासणी करण्याचे धोरण आखले आहे. यासाठी जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी विभागाला सूचना करण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यात मृदा परीक्षण विभागाने ४ हजार ३९० शेतक-यांचे मोफत माती परीक्षण करुन दिले.तसेच रासायनिक खताचा वापर थांबवून शेणखताचा वापर शेतात करावा याबाबत शेतक-यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. याचा फायदा शेतक-यांना होत आहे.शेतक-यांच्या शेतातील माती परीक्षणातून स्फुरद, नत्र, आणि जस्त या मूलद्रव्यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्हा मृद विभागाच्या वतीने शेतक-यांना माती परीक्षणासाठी जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाला गती देण्यासाठी यावर्षी केंद्र आणि राज्य शासनाने २०१९ - २०२० या वर्षासाठी पायलट योजनेअंतर्गत शेतक-यांच्या जमिनिचे माती परीक्षण मोफत करण्यात येत आहे.माती परीक्षणाच्या तंत्रात अनेक बदल केले आहेत. पूर्वी १० हेक्टरच्या परिसरातील एका शेतक-याच्या जमिनीत माती नमुन्याची तपासणी करुन परिसरातील दहा शेतक-यांना सारखाचा माती परीक्षणाचा अहवाल देण्यात येत होता. अनेकवेळा यात गफलत होत असल्याने शेतक-यांचे नुकसान व्हायचे यामुळे शासनाने यात बदल करुन आरोग्य पत्रिका वाटप केलेल्या आहेत.प्रत्येक खातेदाराच्या शेतातील माती नमुन्याची तपासणी करण्याचे आदेश शासनाने मृद तपासणी विभागाला दिले होते. यामुळे पहिल्या टप्प्यात जालना तालुक्यातील धावेडी, बदनापूर तालुक्यातील पाडळी भोकरदनमधून सुबानपूर, जाफराबाद मधून पिंपळखुटा, परतूरमधून आनंदगाव, मंठा तालुक्यातून पांगरी खुर्द, अंबड, मार्डी, घनसावंगी तालुक्यातील बाचेगाव आदी गावातील शेतक-यांचे माती परीक्षण करण्यात आले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी