शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

चार कुटुंबांचा आधार काळाने हिरावला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 12:41 AM

औरंगाबाद जिल्ह्यातील गोलवाडी फाट्याजवळ शनिवारी पहाटे झालेल्या कार अपघातात सेवली (ता. जालना) येथील चौघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मयत चौघेही कुटुंबातील एकुलते एक मुलं होती.

सुभाष शेटे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेवली : आई- बाप नसल्यानं पोराला तळताहाच्या फोडासारखं जपलं... साईबाबांच्या दर्शनाला जाण्याची परवानगी मागितली.. अगोदर जाऊ देऊ नये वाटलं... पण सार्इंचं नाव घेतल्यानं जाऊ दिलं... पण पोरगं देवा घरी गेलं.. असे सांगत मयत आकाश मोरे याचे आजोबा बबनाव मोरे शनिवारी सायंकाळी धायमोकलून रडत होते. औरंगाबाद जिल्ह्यातील गोलवाडी फाट्याजवळ शनिवारी पहाटे झालेल्या कार अपघातात सेवली (ता. जालना) येथील चौघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मयत चौघेही कुटुंबातील एकुलते एक मुलं होती. या मुलांचा अपघातीमृत्यू झाल्याने गावावर एकच शोककळा पसरली आहे.जालना तालुक्यातील सेवली येथील अक्षय सुधाकर शीलवंत (१९), आकाश प्रकाश मोरे (१९), अमोल नंदकिशोर गव्हाळकर (१९), किरण संजय गिरी (१९), संतोष भास्कर राऊत (२०) या पाच युवा मित्रांनी शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जाण्याचा बेत आखला. शुक्रवारी रात्री जायचे आणि शनिवारी रात्रीपर्यंत परत यायचे असे नियोजन या मुलांनी केले होते. नाही- हो करीत पालकांनीही त्यांना परवानगी दिली. गावातीलच कार भाड्याने केली आणि गावातीलच चालक दत्ता वसंतराव डांगे (२३) हा वरील पाच मुलांना घेऊन शुक्रवारी रात्री शिर्डीकडे निघाला. मात्र, शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील गोलवाडी फाट्याजवळ कारला अपघात झाला. या भीषण अपघातात अक्षय शीलवंत, आकाश मोरे, अमोल गव्हाळकर व चालक दत्ता डांगे हे चार युवक ठार झाले. तर किरण गिरी व संतोष राऊत हे जखमी झाले.चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेने अवघे सेवली गाव हळहळले होते. कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांनी एकच टाहो फोडला होता.कार अपघातातील मयत अक्षय शीलवंत हा १२ वी पास आहे. आई-वडिल नसलेल्या अक्षय व त्याची लहान बहीण आजी-आजोबांकडे राहतात. अक्षय चांगल्या प्रकारे मृदंग वाजवित होता. त्याचे काका बांगडीचा व्यवसाय करून त्याला शिक्षण देत होते.आकाश मोरे याच्याही डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरवलेले आहे. तो एका लहान बहिणीसह आजोबा बबनराव मोरे व आजीजवळ राहत होता. आजोबांसोबत बाजारात शेव-चिवडा विकून तो शिक्षण घेत होता. बहिणीलाही शिक्षण देत होता. अक्षयच्या अपघाती निधनाने वृध्द मोरे दाम्पत्याच्या मनावर मोठा आघात झाला आहे.१२ वी पास असलेल्या अमोल नंदकिशोर गव्हाळकर याचे वडील पंक्चरचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दोन बहिणी व तो एकुलता एक मुलगा होता.कार चालक म्हणून काम करणारा दत्ता डांगे याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई मंदिरात पुजारी म्हणून काम करते. दोन बहिणींचे लग्न झालेले आहे. एकुलता एक दत्ता हाच कुटुंबाचा आधार होता. सार्इंच्या दर्शनाला जाताना त्यांना परवानगी द्यावी की न द्यावी या अवस्थेत पालक होते. सार्इंच्या दर्शनाला जाणार असल्याने नकारही दिला नाही. मात्र, शुक्रवारी रात्री ९ वाजता घरातून निघालेल्या मुलांचा शनिवारी पहाटे २ वाजता मृत्यू झाला आणि चारही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.अपघातातील जखमी किरण संजय गिरी याचे वडील शिवणकाम करतात. तर संतोष राऊत यांचे वडील सुतार काम करतात. दोघांच्या माता मजुरीस जातात. त्यांच्या उत्पन्नावरच घर चालते. मात्र, या अपघातात आपली मुलं गंभीर जखमी झाल्याचे कळाल्यानंतर त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली आहे. नातेवाईकांनी तातडीने रूग्णालयात धाव घेतली.एकाच वेळी अंत्ययात्राअपघातातील मयतांचे मृतदेह शनिवारी रात्री गावात आणण्यात आले. युवकांचे मृतदेह येताच नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. मित्रपरिवाराचे डोळेही पाणावले होते. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता. रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी मयतांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू