शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

उन्हाने फुलशेती कोमेजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:45 AM

दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असल्याने फुलेही कासावीस झाली असून ‘फुलशेती’ अडचणीत आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असल्याने फुलेही कासावीस झाली असून ‘फुलशेती’ अडचणीत आली आहे.तालुक्यात ‘फुलशेती’ करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या ठिकाणाहून फुले हैदराबाद, औरंगाबाद, जालनासह अन्य मोठमोठ्या शहरांत जातात. तालुुक्यातील वलखेड, चिंचोली, सालगाव, उस्मानपूर, बाबई, वरफळ, बामणीसह काही गावात फुलांची शेती शेतकरी करतात. यामध्ये गुलाब, निशिगंध, शेवंती, गलांडा, मोगरा, काकडा या फुलांची प्रामुख्याने शेती केली जाते. यातून शेतकऱ्यांना नगदी पैसा मिळण्याबरोबरच शेतीला जोड धंदाही होतो. सध्या सर्वच फुलांना चांगला भाव आहे. दीडपट भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.या फुलांच्या व्यवसायातून शेतक-यांना पैसाही मिळत आहे. मात्र, यावर्षी पाऊसच कमी झाल्याने जल साठ्यांनी तळ गाठला आहे. बोअर, विहिरी आटत आहेत. कधीच न आटणारे बोअर या वर्षी हबकले आहेत. यामुळे पिके तर सोडाच; पण जनावरे व माणसांना पाणी मिळणे अवघड होण्याची भीती आहे. यामुळे तालुक्यात असलेली फुलशेतीही शेवटच्या घटका मोजत आहे. फूल झाडांची महागाची आणून लावलेली रोपे व लगडलेली फुले करपून माना टाकू लागली आहेत. उन्हाची वाढती तीव्रता व पाण्याची अडचण यामुळे फूलशेती धोक्यात आली आहे. सद्या फुलाला चांगला भाव मिळत असला तरी, उन्हाने ती करपत आहे. त्यामुळे फुलांची प्रत खराब होण्याबरोबच उत्पन्नातही घट होत आहे. उन्हाच्या चटक्याने व शुष्क झालेल्या वातावरणाने फुले सुकली आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळFarmerशेतकरी