शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून मुलींचा जन्मदर घसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:40 IST

जालना येथील महिला रूग्णालयात जन्मलेल्या बालकांपैकी गत पाच वर्षांपासून सध्या दर एक हजार मुलांमागे १०० एवढ्या मुली कमी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंधश्रध्दा, हुंड्याच्या पध्दतीमुळे मुलीचा जन्म पालकांना नकोसा वाटत होता. वंशाचा दिवा ही संकल्पना अद्यापही बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. पित्याचं नाव पुढे चालवणारी पितृसत्ताक कुटुंब पध्दती आजही स्त्रियांना कमी लेखते! परिणामी अनेक कुटुंबांमध्ये अद्यापही मुलींचा जन्म हे संकट मानले जाते. यामुळेच की काय, मागील पाच वर्षांपासून मुलींचा जन्मदर मोठ्या प्रमाणात खालावला आहे. जालना येथील महिला रूग्णालयात जन्मलेल्या बालकांपैकी गत पाच वर्षांपासून सध्या दर एक हजार मुलांमागे १०० एवढ्या मुली कमी आहे.मुले आणि मुली यांच्या जन्मदारात असलेली किंचित नैसर्गिक तफावत स्त्रीभ्रूण हत्येमुळे की काय, २०१२-१३ पूर्वी बºयाच प्रमाणात रूंदावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. यानंतर थेट जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्हाभरातील सोनोग्राफी सेंटरची एकाच वेळी तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. तसेच प्रत्येक सेंटरला कागदपत्रे अद्ययावत करण्याबाबत आदेशित केले होते. यानंतरही निर्देश पायदळी तुडविणाऱ्यांविरुध्द कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. आजही आरोग्य यंत्रणेकडून सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी केली जाते. याच्या जोडीलाच शहरासोबतच ग्रामीण भागातही आरोग्य यंत्रणेकडून जनजागृती करण्यात आली. लिंग निदान कायद्याने गुन्हा असल्याने या वाटेला कोणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मुलगाच वंशाचा दिवा ही संकल्पना काही अंशी का होईना; धूसर झाली होती. परंतु, मागील पाच वर्षांपासून जालना येथील शासकीय रूग्णालयात जन्मलेल्या बालकांपैकी एक हजार मुलांमागे १०० मुली कामी असल्याचे समोर आले आहे.२०१५-१६ साली जिल्हा शासकीय रूग्णालयात ६ हजार ०८१ मुले जन्मली होती. त्यापैकी ३१६४ मुले तर २९१७ मुली जन्मल्या. यावर्षी १ हजार मुलांमागे ९२१ मुली होत्या. तर २०१६-१७ मध्ये ५ हजार ५७२ बालकांपैकी २८९२ मुले तर २६८० मुली जन्मल्या होत्या.यावर्षी मुलींमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. २०१७-१८ मध्ये ५९३२ बालकांपैकी ३०३४ मुले तर २८९८ मुली जन्मल्या. यावर्षांत एक हजार मुलांमागे ९५५ मुली होत्या. २०१८-१९ मध्ये मुलींच्या जन्मदरात चांगलीच घसरण झाली. यावर्षी १ हजार मुलांमागे केवळ ९१० मुलीच जन्मल्या. २०१९ मध्ये एक हजार मुलांमागे केवळ ९०२ मुली जन्मल्या.जिल्ह्यात दिवसेंदिवस मुलींचा जन्मदर घसरत चालला आहे. गत दोन वर्षांपासून या जन्मदरात सतत घट होत आहे. २०१८-१९ यावर्षी १ हजार मुलांमागे ९१० मुली होत्या तर २०१९ मध्ये १ हजार मुलांमागे ९०२ मुली होत्या. त्यामुळे या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात मुलींच्या जन्मदरात घट दिसून आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात मुलींच्या जन्मदारात वाढ करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. जर मुलींचा जन्मदर असाच घटत राहिला तर येणाºया काळात समाजाला याचा परिणाम भोगावा लागणार आहे.

टॅग्स :new born babyनवजात अर्भकSocialसामाजिकFamilyपरिवार