शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

पाच वर्षांपासून मुलींचा जन्मदर घसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:40 IST

जालना येथील महिला रूग्णालयात जन्मलेल्या बालकांपैकी गत पाच वर्षांपासून सध्या दर एक हजार मुलांमागे १०० एवढ्या मुली कमी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंधश्रध्दा, हुंड्याच्या पध्दतीमुळे मुलीचा जन्म पालकांना नकोसा वाटत होता. वंशाचा दिवा ही संकल्पना अद्यापही बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. पित्याचं नाव पुढे चालवणारी पितृसत्ताक कुटुंब पध्दती आजही स्त्रियांना कमी लेखते! परिणामी अनेक कुटुंबांमध्ये अद्यापही मुलींचा जन्म हे संकट मानले जाते. यामुळेच की काय, मागील पाच वर्षांपासून मुलींचा जन्मदर मोठ्या प्रमाणात खालावला आहे. जालना येथील महिला रूग्णालयात जन्मलेल्या बालकांपैकी गत पाच वर्षांपासून सध्या दर एक हजार मुलांमागे १०० एवढ्या मुली कमी आहे.मुले आणि मुली यांच्या जन्मदारात असलेली किंचित नैसर्गिक तफावत स्त्रीभ्रूण हत्येमुळे की काय, २०१२-१३ पूर्वी बºयाच प्रमाणात रूंदावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. यानंतर थेट जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्हाभरातील सोनोग्राफी सेंटरची एकाच वेळी तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. तसेच प्रत्येक सेंटरला कागदपत्रे अद्ययावत करण्याबाबत आदेशित केले होते. यानंतरही निर्देश पायदळी तुडविणाऱ्यांविरुध्द कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. आजही आरोग्य यंत्रणेकडून सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी केली जाते. याच्या जोडीलाच शहरासोबतच ग्रामीण भागातही आरोग्य यंत्रणेकडून जनजागृती करण्यात आली. लिंग निदान कायद्याने गुन्हा असल्याने या वाटेला कोणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मुलगाच वंशाचा दिवा ही संकल्पना काही अंशी का होईना; धूसर झाली होती. परंतु, मागील पाच वर्षांपासून जालना येथील शासकीय रूग्णालयात जन्मलेल्या बालकांपैकी एक हजार मुलांमागे १०० मुली कामी असल्याचे समोर आले आहे.२०१५-१६ साली जिल्हा शासकीय रूग्णालयात ६ हजार ०८१ मुले जन्मली होती. त्यापैकी ३१६४ मुले तर २९१७ मुली जन्मल्या. यावर्षी १ हजार मुलांमागे ९२१ मुली होत्या. तर २०१६-१७ मध्ये ५ हजार ५७२ बालकांपैकी २८९२ मुले तर २६८० मुली जन्मल्या होत्या.यावर्षी मुलींमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. २०१७-१८ मध्ये ५९३२ बालकांपैकी ३०३४ मुले तर २८९८ मुली जन्मल्या. यावर्षांत एक हजार मुलांमागे ९५५ मुली होत्या. २०१८-१९ मध्ये मुलींच्या जन्मदरात चांगलीच घसरण झाली. यावर्षी १ हजार मुलांमागे केवळ ९१० मुलीच जन्मल्या. २०१९ मध्ये एक हजार मुलांमागे केवळ ९०२ मुली जन्मल्या.जिल्ह्यात दिवसेंदिवस मुलींचा जन्मदर घसरत चालला आहे. गत दोन वर्षांपासून या जन्मदरात सतत घट होत आहे. २०१८-१९ यावर्षी १ हजार मुलांमागे ९१० मुली होत्या तर २०१९ मध्ये १ हजार मुलांमागे ९०२ मुली होत्या. त्यामुळे या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात मुलींच्या जन्मदरात घट दिसून आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात मुलींच्या जन्मदारात वाढ करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. जर मुलींचा जन्मदर असाच घटत राहिला तर येणाºया काळात समाजाला याचा परिणाम भोगावा लागणार आहे.

टॅग्स :new born babyनवजात अर्भकSocialसामाजिकFamilyपरिवार