शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दानवेंविरोधात विलास औताडे पहिल्याच बैठकीत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:25 AM

भाजपचे खा. रावसाहेब दानवे यांनी विकास करतांना तो केवळ स्वत:च्या परिवाराचा केला आहे , असा गंभीर आरोप काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विलास औताडे यांनी शनिवारी येथे पक्षाच्या बैठकीत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजपचे खा. रावसाहेब दानवे यांनी विकास करतांना तो केवळ स्वत:च्या परिवाराचा केला आहे. कुठलेही कंत्राट असले की, एक तर चुलत भाऊ अथवा जावई वा अन्य नातेवाईकांनाच दिली आहेत. त्यामुळे विकास करताना त्यांच्या नातेवाईकांचा आर्थिक विकास केला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विलास औताडे यांनी शनिवारी येथे पक्षाच्या बैठकीत केला.यावेळी ते म्हणाले की, दानवे यांना हृदयाचा पत्ता नसून, त्यांची भूमिका शेतकरी विरोधी राहिली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांचा आपण पर्दाफाश करू, विकास म्हणजे केवळ रस्ते तयार करणे नव्हे, त्यातून गोरगरिबांसह शेतकऱ्यांचे समाधान होणे गरजेचे आहे. एकूणच औताडे यांनी त्यांच्या पहिल्याच जालना दौऱ्यात ही आक्रमक भूमिका दानवेंविरोधात घेतल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले होते. सतकर कॉम्प्लेक्स येथे ही बैठक सायंकाळी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, डॉ. संजय लाखे पाटील, शहराध्यक्ष शेख महेमूद, कल्याण दळे, सुदामराव सदाशिवे, अ‍ॅड.विनायक चिटणीस, विजय कामड, बदर चाऊस, राजेंद्र राख, जीवन सले, महावीर ढक्का, विजय चौधरी, दिनकर घेवंदे, तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राम सावंत यांनी केले.आरोपात तथ्य नाहीआपण जालना लोकसभा मतदारसंघात कधी नव्हे एवढा निधी खेचून आणून रस्ते, पूल तसेच अन्य विकास कामांवर तो खर्च केला. या विकास कामांच्या गतीने विरोधक धास्तावले आहेत. त्यामुळे ते माझ्यासह माझ्या कुटुंबियांवर बेछूट आरोप करत आहेत. या आरोपात कुठलेच तथ्य नाही.- खा. रावसाहेब दानवे,जालना

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस