शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर निम्न प्रकल्पातून परभणीकडे झेपावले पाणी; स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 12:37 IST

धरणाचे सहा दरवाजे उघडून नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

परतूर (परभणी) : तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. अखेर बुधवारी दुपारनंतर धरणाचे सहा दरवाजे उघडून नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातीलपाणी परभणीकडे झेपावले आहे. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असताना पाणी सोडल्यामुळे नाराजीचा सूर दिसून येत आहे.

निम्न दुधना प्रकल्पात केवळ आता मृत साठा शिल्लक आहे. या मृत साठ्यातूनच परभणी जिल्ह्यातील जनावरांच्या पिण्याचे पाणी व परिसरातील पाणीटंचाई निवारण्यासाठी धरणातून दुधना नदीच्या पात्रातून बुधवारी दुपारी ३:३० वाजता धरणाचे ६ दरवाजे ०.५० मीटरने उघडून ५ हजार ३४६ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, नदी पात्रात पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांनी जीवित, वित्त हानी होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही सोडले पाणी.धरण मृत साठ्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी पात्रातून पाणी सोडण्यास विरोध केला होता. मात्र, विरोधाला न जुमानता शासनाने आदेश देऊन सदरील पाणी सोडले आहे. पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी युवा नेते नितीन जेथलिया, दादाराव खोसे, बाजीराव खरात, अंशीराम कबाडी, आसाराम लाटे, शिवाजी लाटे, गणेश राजबिंडे, बाबासाहेब लाटे, माउली घेंबड, कैलास बिडवे, हरिभाऊ आकात, आदी शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता.

पाण्याचा अपव्यय होऊ नये - नितीन जेथलियायुवा नेते नितीन जेथलिया म्हणाले की, टंचाई निवारण्यासाठी पाणी सोडण्यासाठी आमचा विरोध नाही. मात्र, नदीपात्रातून सोडण्यात येणारे पाणी हे मोठ्या प्रमाणात वाया जाणार आहे. धरण मृत साठ्यावर गेलेले आहे. त्यामुळे टँकरद्वारे हे पाणी घ्यावे व किमान १ जूनपर्यंत तरी पाणी सोडू नये, अशी आमची मागणी नितीन जेथलिया यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :JalanaजालनाWaterपाणीDamधरणFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र