शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

कापसाच्या दरात वाढ होत नसल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

जळगाव सपकाळ : नगदी पीक म्हणून भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती. मात्र, ...

जळगाव सपकाळ : नगदी पीक म्हणून भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती. मात्र, भावात अपेक्षित वाढ न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कापसाची बेभाव विक्री करत आहे.

भोकरदन तालुक्यात यंदा जूनच्या सुरूवातीपासूनच पर्जन्यमान चांगले राहिल्याने एक लाख तीन हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यात ४२ हजार ३०० हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. कपाशीला पाते व बोंड लागण्याच्या काळातच पाऊस झाल्याने पातेगळ झाली. त्यानंतर बोंड अळीचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी औषध फवारणीवर मोठा खर्च करुन रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, परतीच्या पावसाने कापूस घरात येण्याच्या काळातच थैमान घातल्याने उत्पादन घटले. पावसाच्या भीतीने बहुतांश शेतकऱ्यांनी परजिल्ह्यातून मजूर आणून जास्तीची मजुरी देऊन कापूस वेचून घरी आणला. कापसाचे भाव वाढल्यास लागवडीवर झालेला खर्च निघेल, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी घरात कापसाची साठवण केली. सुरुवातीला कापसाला ५४०० ते ५५०० रूपयापर्यंत भाव मिळाला होता. परंतु, त्यानंतर भावात घसरण झाली. सध्या ५ हजार २०० रूपये प्रति क्विंटल भाव आहे. भाव वाढत नसल्याने बहुतांश शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाची विक्री करीत आहे. परंतु, व्यापारी कवडीमोल भावात कापसाची खरेदी करीत आहे. मागील सहा वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करीत आहे. यंदा चांगले उत्पन्न झाल्याने शेतकऱ्यांना चांगल्या उपन्नाची अपेक्षा होती. परंतु, अवेळी पडलेला पाऊस व भावात झालेली घसरण यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच अतिवृष्टीचे अनुदान मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

निसर्गाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक हतबल झाले आहे. दुसरीकडे बाजारपेठेत शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतीसाठी लागवड केलेला खर्च देखील निघत नाही. सध्या व्यापारी कापूस कमी भावात मागत असल्याने ३० क्विंटल कापूस घरात पडून आहे. कापूस विकावा तरी संकट, नाही विकावा तरी संकट.

गणेश मुठ्ठे, शेतकरी.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कपाशीचे गठाण व सरकीलाच अपेक्षित भाव व मागणी नसल्याने कापसाचे दर कोसळले आहे. सध्या शेअर बाजारदेखील कोसळले आहे.

नरेश ताडे, कापूस व्यापारी

रविवारपर्यंत जिनिंग बंद

बहुतांश शेतकरी सीसीआय केंद्राकडे वळाले आहेत. सीसीआय केंद्रात आतापर्यंत एक लाख सोळा हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. सध्या सीसीआय केंद्रात कापूस ठेवण्यास जागा नसल्याने रविवारपर्यंत जिनिंग बंद ठेवण्यात येणार आहे.

दादाराव दळवी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना.