शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

शेतकऱ्यांनी शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:59 AM

कमी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे, याचा परिणाम म्हणून घाम गाळून अडीअडचणीच्या वेळी कामाला येणारी गुंतणूक मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कमी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे, याचा परिणाम म्हणून घाम गाळून अडीअडचणीच्या वेळी कामाला येणारी गुंतणूक मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकट्या जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चित्र गंभीर स्वरूपाचे असून, या बँकेच्या ठेवी तीन महिन्यात ३७५ कोटी रूपयांवरून थेट २७४ कोटींवर येऊन ठेपल्या आहेत.गेल्या चार वर्षापासून जालना जिल्हा दुष्काळाच्या झळा सहन करत आहे, याचा परिणाम एकूणच जिल्ह्यातील शेतीचे उत्पादन घटण्यावर झाला आहे. उत्पादन घटल्याने शेतक-यांच्या हातात खेळणारा पैसा झपाट्याने कमी झाला आहे. या ठेवी मोडण्याची वेळ शेतकºयांवर का आली, याची विचारणा बँकेत केली असता, अनेकांनी आपल्या मुलींचा विवाह तसेच शेतीच्या कामासाठी ठेवी मोडल्याचे सांगण्यात आले. जालना जिल्हा बँकेतून शंभर कोटीच्या ठेवी मोडल्याचे समोर आले असले तरी, जिल्ह्यातील अन्य सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकेतूनही अनेक शेतक-यांनी त्यांच्या संचित निधीला धक्का लावल्याचे सांगण्यात आले.एकूण जालना जिल्ह्यातून जवळपास ५०० कोटी पेक्षा अधिक ठेवी विविध बँकांतून शेतकºयांनी काढल्या असाव्यात असा अंदाज बँक अधिका-यांनी वर्तविला आहे.ठेवी ठेवतांनाच शेतक-यांना पैशांची जमवाजमव करावी लागते. त्यातच त्या ठेवी या दूरवरचा विचार करून ठेवल्या जातात. एकीकडे ठेवी मोडण्याची वेळ शेतक-यांवर आली असतानाच पीककर्ज मिळत नसल्याने देखील ठेवी मोडल्याचे शेतक-यांनी नमूद केले. एकूणच अनेक शेतक-यांनी आपल्या ठेवी कायम ठेवत खाजगी सावकारांच्या दारात जाऊन पेरणीसह अन्य कामांसाठी कर्ज काढल्याचे दिसून आले. जालना जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या ही ११० एवढी असल्याचे सांगण्यात आले.आम्ही आशावादी आहोतआज जरी शेतक-याने त्यांच्या ठेवी मोठ्या प्रमाणावर मोडल्या आहेत, हे वास्तव आहे. परंतु शेतक-यांला चांगले उत्पादन झाल्यास तो थोडी-थोडी बचत करून पुन्हा ठेवी जमा करेल असा आमचा अनुभव आणि विश्वास आहे. परंतु यंदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर ठेवी मोडण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी, असा आपला अंदाज आहे. - आशुतोष देशमुख,व्यवस्थापकीय संचालक, मध्यवती बँक

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीInvestmentगुंतवणूकdroughtदुष्काळ