शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
5
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
6
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
7
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
8
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
9
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
10
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
11
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
12
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
13
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
14
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
15
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
16
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
17
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
18
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
19
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
20
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक

शेतकऱ्यांनो, आता या 'दगाबाज' सरकारचाच 'पंचनामा' करा! उद्धव ठाकरेंचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:40 IST

'कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत मतबंदी!' उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौऱ्यातून सरकारवर हल्ला

परतूर/ढेंगळी पिंपळगाव (जालना/परभणी): अतिवृष्टीमुळे आयुष्य संपले अशा स्थितीत असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "शेतकऱ्यांवर झालेले कर्ज आणि नुकसानीमुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. या 'दगाबाज' राज्य सत्कारचा पंचनामा करा आणि जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत 'मतबंदी' करा," असे आक्रमक आवाहन ठाकरे यांनी केले.

परतूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले, "शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात माल विकल्याशिवाय या सरकारला खरेदी केंद्र सुरू करता येत नाही. सरकारने आकर्षक शब्दांत पॅकेज घोषित केले, पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. 'नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी केवायसी करा' असे सांगून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. पीक विमा ही शेतकऱ्यांची मोठी थट्टा आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत, अधिकारी त्यांना मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहेत. अधिकारी दगाबाजपणे वागत असतील, तर शिवसैनिकांनी त्यांना थेट मुख्यमंत्री यांच्याकडे घेऊन जावे लागेल." असा इशारा ठाकरे यांनी दिला.

मुख्यमंत्री बिहारमध्ये, शेतकऱ्यांशी माणुसकीने वागा!ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. "मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांच्या व्यथा कशा कळणार? ते तर बिहारमध्ये प्रचार करण्यात व्यस्त आहेत. मी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून तुमच्या सोबत संवाद साधायला आलो आहे, माझ्या हातात काहीही नसतानासुद्धा! शेतकऱ्यांच्या हितासाठी माणुसकी म्हणून हा लढा उभा करणार आहे." 

'भाजपने पाठीत खंजीर खुपसला!'ढेंगळी पिंपळगाव (परभणी) येथे बोलताना ठाकरे यांनी भाजपने पाठीत खंजीर खुपसल्याची आठवण करून दिली. "लॉकडाउनमध्ये जगाचा पोशिंदा काम करत होता, म्हणून आर्थिक चक्र सुरू राहिले. आता शेतकरी हक्काचे मागतोय, तर त्याला अडवले जात आहे."

... म्हणून अजित पवार मजेत आहेतशेतकरी हात-पाय हलवतोय म्हणून अजित पवार (उपमुख्यमंत्री) मजेत आहेत. शेतकऱ्यांनी वठणीवर आणल्याशिवाय कर्जमुक्ती होणार नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत मतबंदीचे होर्डिंग्ज लावा आणि या दगाबाज सरकारला घरी बसवा," असे आक्रमक आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray urges farmers to oust 'treacherous' government, demand loan waivers.

Web Summary : Uddhav Thackeray criticized the state government for neglecting farmers affected by heavy rains. He called for a 'vote ban' until loan waivers are granted. He accused the government of empty promises and harassing farmers with KYC requirements. He also criticized the Chief Minister's absence.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस