शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
4
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
5
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
6
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
7
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
8
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
9
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
10
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
11
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
12
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
13
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
14
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
15
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
16
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
17
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
18
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
19
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
20
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, आता या 'दगाबाज' सरकारचाच 'पंचनामा' करा! उद्धव ठाकरेंचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:40 IST

'कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत मतबंदी!' उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौऱ्यातून सरकारवर हल्ला

परतूर/ढेंगळी पिंपळगाव (जालना/परभणी): अतिवृष्टीमुळे आयुष्य संपले अशा स्थितीत असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "शेतकऱ्यांवर झालेले कर्ज आणि नुकसानीमुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. या 'दगाबाज' राज्य सत्कारचा पंचनामा करा आणि जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत 'मतबंदी' करा," असे आक्रमक आवाहन ठाकरे यांनी केले.

परतूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले, "शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात माल विकल्याशिवाय या सरकारला खरेदी केंद्र सुरू करता येत नाही. सरकारने आकर्षक शब्दांत पॅकेज घोषित केले, पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. 'नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी केवायसी करा' असे सांगून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. पीक विमा ही शेतकऱ्यांची मोठी थट्टा आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत, अधिकारी त्यांना मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहेत. अधिकारी दगाबाजपणे वागत असतील, तर शिवसैनिकांनी त्यांना थेट मुख्यमंत्री यांच्याकडे घेऊन जावे लागेल." असा इशारा ठाकरे यांनी दिला.

मुख्यमंत्री बिहारमध्ये, शेतकऱ्यांशी माणुसकीने वागा!ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. "मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांच्या व्यथा कशा कळणार? ते तर बिहारमध्ये प्रचार करण्यात व्यस्त आहेत. मी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून तुमच्या सोबत संवाद साधायला आलो आहे, माझ्या हातात काहीही नसतानासुद्धा! शेतकऱ्यांच्या हितासाठी माणुसकी म्हणून हा लढा उभा करणार आहे." 

'भाजपने पाठीत खंजीर खुपसला!'ढेंगळी पिंपळगाव (परभणी) येथे बोलताना ठाकरे यांनी भाजपने पाठीत खंजीर खुपसल्याची आठवण करून दिली. "लॉकडाउनमध्ये जगाचा पोशिंदा काम करत होता, म्हणून आर्थिक चक्र सुरू राहिले. आता शेतकरी हक्काचे मागतोय, तर त्याला अडवले जात आहे."

... म्हणून अजित पवार मजेत आहेतशेतकरी हात-पाय हलवतोय म्हणून अजित पवार (उपमुख्यमंत्री) मजेत आहेत. शेतकऱ्यांनी वठणीवर आणल्याशिवाय कर्जमुक्ती होणार नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत मतबंदीचे होर्डिंग्ज लावा आणि या दगाबाज सरकारला घरी बसवा," असे आक्रमक आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray urges farmers to oust 'treacherous' government, demand loan waivers.

Web Summary : Uddhav Thackeray criticized the state government for neglecting farmers affected by heavy rains. He called for a 'vote ban' until loan waivers are granted. He accused the government of empty promises and harassing farmers with KYC requirements. He also criticized the Chief Minister's absence.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस