शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

चार जनावरे तलावाच्या गाळात फसल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:50 IST

मच्छिंद्र चिंचोली येथील लघु तलावात शिंदखेड येथील शेतकरी बाळकृष्ण ढेकळे यांची चार जनावरे पाणी पिण्यासाठी गेलेली असताना गाळात फसली. पण, सुदैवाने गावातील युवकांच्या सतर्कतेमुळे ती चारही जनावरे वाचली.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली येथील लघु तलावात शिंदखेड येथील शेतकरी बाळकृष्ण ढेकळे यांची चार जनावरे पाणी पिण्यासाठी गेलेली असताना गाळात फसली. पण, सुदैवाने गावातील युवकांच्या सतर्कतेमुळे ती चारही जनावरे वाचली.ढेकळे यांचा गुराखी नामदेव जाधव याने २० जनावरे पाणी पाजण्यासाठी म. चिंचोली येथील लघु तलावावर बुधवारी दुपारी ३ वाजता आणली. त्यातील दोन गाय व दोन वासरे पाणी पिता- पिता पुढे सरकली असता ती पूर्णपणे गाळात फसली. दरम्यान, अशोक सोळंके व सय्यद केयफ हे युवक आपली जनावरे घेऊन पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांना ही जनावरे फसलेली दिसली. त्यांनी हा प्रकार गावात येऊन सांगितला. यानंतर आस्था तेथील तरुण साहेबराव घोगरे, मच्छिंद्र निवदे, भास्कर पाळीक, विनोद घोगरे, परमेश्वर घोगरे, उमेश रणमाळे, नारायण वर्जे यांनी लघु तलावाकडे धाव घेऊन गाळात फसलेली लाकडी बल्लीने च्या साह्याने जनावरे बाहेर काढली. अन्यथा काही अनुचित प्रकार घडला असता.यापुढे प्रशासनाने तातडीने जनावरांच्या चारा- पाण्याची सोय करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.याच ठिकाणी २०१८ मध्ये धुने धुवायला गेलेल्या सहा मुली गाळात फसल्या होत्या. त्यापैकी तीन मुलींना आपला जीव गमवावा लागला होता.याच ठिकाणी पाणवठा असता तर ही जनावरे फसली नसती व त्या मुलींनीही आपला जीव गमावला नसता या तलावाची निर्मिती १९९४ ला झाली आहे.दुष्काळामुळे यावर्षी पाणी फक्त नदीच्या पात्रात राहिलेले असून पात्रात ५ ते १० फूटापर्यंत गाळ आहे. १९९४ पासून या तलावात आतापर्यंत १२ जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जनावरे ही फसून मेली आहेत.

टॅग्स :cowगायIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीटंचाईSocialसामाजिक