शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठेचे पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST

जालन्यात पूर्वी म्हणजे साधारपणे २५ वर्षांपूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते. कै. बाळासाहेब पवार, कै. अंकुशराव टोपे यांच्या रूपाने लोकसभेत नेतृत्व ...

जालन्यात पूर्वी म्हणजे साधारपणे २५ वर्षांपूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते. कै. बाळासाहेब पवार, कै. अंकुशराव टोपे यांच्या रूपाने लोकसभेत नेतृत्व हाेते. तसेच परतूर, भोकरदन व जालन्यातही काँग्रेसचे वर्चस्व होते; परंतु नंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या झंझावातामुळे काँग्रेसची धूळधाण झाली; परंतु अशाही स्थितीत आ. कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या बेधडक वृत्तीमुळे काँग्रेस टिकवूनच ठेवली नव्हे, तर शिवसेनेच्या ताब्यातील पालिका खेचून आणली. तसेच नगराध्यक्षपदाच्या २०१६ मध्ये झालेल्या जनतेतून निवडीमध्येही आ. कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या पत्नीलाच राजकीय मैदानात उतरवून विक्रमी मतांनी विजयी केले.

गोरंट्याल हे पूर्वीपासूनच काँग्रेसशी जोडले गेले आहेत. युवक काँग्रेसपासून त्यांनी राजकारणात एंट्री केली. ती अंकुशराव टोपे यांच्या नेतृत्वाखाली. नंतर त्यांनी पालिकेच्या राजकारणात रस घेत नगराध्यक्षपदही भूषविले. या त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीला काँग्रेसने बळ देत त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. त्यातही त्यांनी चमकदार कामगिरी करीत, युतीची सत्ता असताना आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या अर्जुन खोतकरांना पराभूत करून राज्याच्या राजकारणात प्रवेश केला. त्यांनी विधानसभेत तीनवेळा नेतृत्व केले. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये यावे म्हणून जाळे टाकले होते; परंतु ते त्यातून अलगदपणे बाहेर पडले. त्यांनी काँग्रेसची निष्ठा कायम ठेवत काँग्रेसकडूनच निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांचा अवघ्या २८६ मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांचा विजय झाला होता; परंतु नंतर याच निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुद्द्यावरून हा वाद थेट सुप्रीम कोर्टात गेला होता.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा खोतकरांचा पराभव करून सक्रिय राजकारणात आपला दबदबा कायम राखला. याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना प्रथम राज्यातील विधानसभेतील महत्त्वाच्या असलेल्या आश्वासन समितीचे अध्यक्षपद देऊ केले आणि आता तर त्यांना राज्याच्या कोअर कमिटीत स्थान देऊन राज्याच्या उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जालन्यासाठी ही अभिमानाची बाब असून, एक प्रकारे काँग्रेसला यामुळे जालन्यात संजीवनी मिळेल यात शंका नाही.

मंत्रिपदाची हुलकावणी

आज कैलास गोरंट्याल यांना महत्त्वाची पदे दिली आहेत; परंतु अद्याप त्यांना मंत्रिपद न दिल्याने काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नाराज आहेत. गेल्यावेळच्या निवडणुकीत त्यांच्यापेक्षा कमी वेळा निवडून आलेल्यांना मंत्रिपदाची संधी दिली. परंतु आता ज्यावेळी विस्तार होईल, त्यावेळी मात्र त्यांना निश्चितपणे मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी आशा करणे गैर ठरणार नाही.