शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

निष्ठेचे पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST

जालन्यात पूर्वी म्हणजे साधारपणे २५ वर्षांपूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते. कै. बाळासाहेब पवार, कै. अंकुशराव टोपे यांच्या रूपाने लोकसभेत नेतृत्व ...

जालन्यात पूर्वी म्हणजे साधारपणे २५ वर्षांपूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते. कै. बाळासाहेब पवार, कै. अंकुशराव टोपे यांच्या रूपाने लोकसभेत नेतृत्व हाेते. तसेच परतूर, भोकरदन व जालन्यातही काँग्रेसचे वर्चस्व होते; परंतु नंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या झंझावातामुळे काँग्रेसची धूळधाण झाली; परंतु अशाही स्थितीत आ. कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या बेधडक वृत्तीमुळे काँग्रेस टिकवूनच ठेवली नव्हे, तर शिवसेनेच्या ताब्यातील पालिका खेचून आणली. तसेच नगराध्यक्षपदाच्या २०१६ मध्ये झालेल्या जनतेतून निवडीमध्येही आ. कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या पत्नीलाच राजकीय मैदानात उतरवून विक्रमी मतांनी विजयी केले.

गोरंट्याल हे पूर्वीपासूनच काँग्रेसशी जोडले गेले आहेत. युवक काँग्रेसपासून त्यांनी राजकारणात एंट्री केली. ती अंकुशराव टोपे यांच्या नेतृत्वाखाली. नंतर त्यांनी पालिकेच्या राजकारणात रस घेत नगराध्यक्षपदही भूषविले. या त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीला काँग्रेसने बळ देत त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. त्यातही त्यांनी चमकदार कामगिरी करीत, युतीची सत्ता असताना आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या अर्जुन खोतकरांना पराभूत करून राज्याच्या राजकारणात प्रवेश केला. त्यांनी विधानसभेत तीनवेळा नेतृत्व केले. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये यावे म्हणून जाळे टाकले होते; परंतु ते त्यातून अलगदपणे बाहेर पडले. त्यांनी काँग्रेसची निष्ठा कायम ठेवत काँग्रेसकडूनच निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांचा अवघ्या २८६ मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांचा विजय झाला होता; परंतु नंतर याच निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुद्द्यावरून हा वाद थेट सुप्रीम कोर्टात गेला होता.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा खोतकरांचा पराभव करून सक्रिय राजकारणात आपला दबदबा कायम राखला. याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना प्रथम राज्यातील विधानसभेतील महत्त्वाच्या असलेल्या आश्वासन समितीचे अध्यक्षपद देऊ केले आणि आता तर त्यांना राज्याच्या कोअर कमिटीत स्थान देऊन राज्याच्या उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जालन्यासाठी ही अभिमानाची बाब असून, एक प्रकारे काँग्रेसला यामुळे जालन्यात संजीवनी मिळेल यात शंका नाही.

मंत्रिपदाची हुलकावणी

आज कैलास गोरंट्याल यांना महत्त्वाची पदे दिली आहेत; परंतु अद्याप त्यांना मंत्रिपद न दिल्याने काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नाराज आहेत. गेल्यावेळच्या निवडणुकीत त्यांच्यापेक्षा कमी वेळा निवडून आलेल्यांना मंत्रिपदाची संधी दिली. परंतु आता ज्यावेळी विस्तार होईल, त्यावेळी मात्र त्यांना निश्चितपणे मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी आशा करणे गैर ठरणार नाही.