शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

निष्ठेचे पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST

जालन्यात पूर्वी म्हणजे साधारपणे २५ वर्षांपूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते. कै. बाळासाहेब पवार, कै. अंकुशराव टोपे यांच्या रूपाने लोकसभेत नेतृत्व ...

जालन्यात पूर्वी म्हणजे साधारपणे २५ वर्षांपूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते. कै. बाळासाहेब पवार, कै. अंकुशराव टोपे यांच्या रूपाने लोकसभेत नेतृत्व हाेते. तसेच परतूर, भोकरदन व जालन्यातही काँग्रेसचे वर्चस्व होते; परंतु नंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या झंझावातामुळे काँग्रेसची धूळधाण झाली; परंतु अशाही स्थितीत आ. कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या बेधडक वृत्तीमुळे काँग्रेस टिकवूनच ठेवली नव्हे, तर शिवसेनेच्या ताब्यातील पालिका खेचून आणली. तसेच नगराध्यक्षपदाच्या २०१६ मध्ये झालेल्या जनतेतून निवडीमध्येही आ. कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या पत्नीलाच राजकीय मैदानात उतरवून विक्रमी मतांनी विजयी केले.

गोरंट्याल हे पूर्वीपासूनच काँग्रेसशी जोडले गेले आहेत. युवक काँग्रेसपासून त्यांनी राजकारणात एंट्री केली. ती अंकुशराव टोपे यांच्या नेतृत्वाखाली. नंतर त्यांनी पालिकेच्या राजकारणात रस घेत नगराध्यक्षपदही भूषविले. या त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीला काँग्रेसने बळ देत त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. त्यातही त्यांनी चमकदार कामगिरी करीत, युतीची सत्ता असताना आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या अर्जुन खोतकरांना पराभूत करून राज्याच्या राजकारणात प्रवेश केला. त्यांनी विधानसभेत तीनवेळा नेतृत्व केले. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये यावे म्हणून जाळे टाकले होते; परंतु ते त्यातून अलगदपणे बाहेर पडले. त्यांनी काँग्रेसची निष्ठा कायम ठेवत काँग्रेसकडूनच निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांचा अवघ्या २८६ मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांचा विजय झाला होता; परंतु नंतर याच निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुद्द्यावरून हा वाद थेट सुप्रीम कोर्टात गेला होता.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा खोतकरांचा पराभव करून सक्रिय राजकारणात आपला दबदबा कायम राखला. याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना प्रथम राज्यातील विधानसभेतील महत्त्वाच्या असलेल्या आश्वासन समितीचे अध्यक्षपद देऊ केले आणि आता तर त्यांना राज्याच्या कोअर कमिटीत स्थान देऊन राज्याच्या उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जालन्यासाठी ही अभिमानाची बाब असून, एक प्रकारे काँग्रेसला यामुळे जालन्यात संजीवनी मिळेल यात शंका नाही.

मंत्रिपदाची हुलकावणी

आज कैलास गोरंट्याल यांना महत्त्वाची पदे दिली आहेत; परंतु अद्याप त्यांना मंत्रिपद न दिल्याने काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नाराज आहेत. गेल्यावेळच्या निवडणुकीत त्यांच्यापेक्षा कमी वेळा निवडून आलेल्यांना मंत्रिपदाची संधी दिली. परंतु आता ज्यावेळी विस्तार होईल, त्यावेळी मात्र त्यांना निश्चितपणे मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी आशा करणे गैर ठरणार नाही.