शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

बसस्थानक परिसरात धुळीचे लोट; प्रवाशांचे हाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 12:38 AM

औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे बसस्थानक परिसरात मातीच माती झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे बसस्थानक परिसरात मातीच माती झाली आहे. यामुळे बसस्थानक परिसरात धुळीचे लोट उठत असल्याने पाणी मारण्याची मागणी प्रवाशांमधून होत अहे.आठ दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम करणारी खासगी आयआरबी कंपनीने बसस्थानक समोरील शंभर मीटरपर्यंत सर्व्हिस रस्त्याचे काम अर्धवट सोडले आहे. या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली असल्याने बसस्थानकात व परिसरात धुळीचे लोटचे लोट उडत आहेत. यामुळे बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना तसेच परिसरातील व्यावसायिकांना याचा त्रास सहन करावा लागत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बसस्थानकासमोरील सर्व्हिस रस्ता, उड्डाणपुलाखालून असल्याने या रस्त्यावर नियमित वर्दळ राहत आहे. या मार्गावरून खाजगी वाहनांसह महामार्गाचे काम करणारी अवजड वाहने रात्रंदिवस धावत आहेत. यामुळे मोठमोठे धुळीचे लोट सतत उडतात. या लोटांमुळे नागरिकांना श्वसनाशी संबंधित आजार बळकावण्याची शक्यता परिसरातील नागरिकांमधून वर्तवली जात आहे.या सर्व्हिस रस्त्याचे काम महामार्गाचे काम करणारी खासगी आयआरबी कंपनी करत आहे. मात्र, आठ दिवसांपूर्वी सर्व्हिस रस्ता अर्ध्यावर सोडून कंपनीने दुसरे काम हाती घेतले आहे. यामुळे अर्धवट राहिलेल्या या सर्व्हिस रस्त्याचे काम करावे, अन्यथा कच्च्या रस्त्यावर दररोज पाणी मारावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागstate transportराज्य परीवहन महामंडळ