शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

आचारसंहितेच्या कालावधीत १०८ जणांवर गुन्हे, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:46 AM

आचारसंहितेच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १०८ दारुड्यांवर गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये ६२ वार, ४६ बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर ६३ आरोपींना अटक करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १०८ दारुड्यांवर गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये ६२ वार, ४६ बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर ६३ आरोपींना अटक करण्यात आली.२३ एप्रिल रोजी जालना लोकसभा मतदार संघाची निवडणूक होत आहे. यासाठी जवळपास महिनाभरापूर्वीपासूनच जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली होती. आचार संहितेमध्ये दारुची वाहतूक करण्यास बंदी असते. आचारसंहितेच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम राबवत जिल्हाभरातील १०८ जणांवर कारवाई केली आहे.यात ६२ वारस, ४६ बेवारस गुन्ह्यांची नोंद करण्यात असून, ६३ आरोपींना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ७४२ लि. गावठी दारू, १३०१८ लि. गूळमिश्रित रसायन, ४१५.८६ लि. देशी दारु, १०० लि. विदेशी दारु, २४. ३० लि. परराज्यातील विदेशी दारु, २३.४ लि. बीअर आणि एकूण १४ वाहनांचा समावेश असून, १४ लाख २४ हजार ९२५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तीन दिवसांत तीन कारवायाराज्य उत्पादन शुल्क विभागाने १८ ते २० एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील तीन ठिकाणी कारवाया केल्या आहेत. यात भोकरदन येथे बेकायदेशीररीत्या देशी दारुची वाहतूक करताना एका दुचाकी चालकाला पकडण्यात आले. त्याच्याकडून ३८ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर अंबड व जालना शहरात ३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये गावठी, देशी दारु तसेच १ दुचाकी जप्त करण्यात आली. असा एकूण ४० हजार ७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर तिसरी कारवाई घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील एका हॉटेलवर छापा मारुन ६० हजार ०५६ रुपयांची दारु जप्त करण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाCrime Newsगुन्हेगारी